शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

६५.९४ कोटींचा जिल्हा विकासावर खर्च

By admin | Updated: January 16, 2016 01:55 IST

जिल्ह्यातील विविध योजनांवर निधी खर्च करण्याकरिता २०१५-१६ चा सर्वसाधारण आराखडा १५६ कोटी ५८ लाख रूपयांचा नियोजनाच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता.

२०१५-१६ आर्थिक वर्ष : वितरित तरतुदींपैकी ७० टक्के रक्कम खर्च; ५६ कोटी रूपये तरतुदींचे वाटप नाहीगडचिरोली : जिल्ह्यातील विविध योजनांवर निधी खर्च करण्याकरिता २०१५-१६ चा सर्वसाधारण आराखडा १५६ कोटी ५८ लाख रूपयांचा नियोजनाच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता. यापैकी ९५ कोटी ८० लाख रूपयांची तरतूद वितरित करण्यात आली. एकूण निधीपैकी ६५.९४ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. डिसेंबर २०१५ अखेर एकूण वितरित तरतुदीपैकी ७० टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. चालू वर्षातील नियोजन आराखड्यातील ५६ कोटी रूपये तरतुदींचे वाटप अद्यापही करण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.२०१५-१६ साठी सर्वसाधारण आराखड्यात काही विभागातील संपूर्ण निधीचा खर्च करण्यात आला. तर काही विभागाने केवळ २० टक्केच निधी खर्च केलेले आहे. एकूण योजनांच्या निधीच्या खर्चाचे प्रमाण ६८.८३ टक्के आहे. तर कृषी व संलग्न सेवांमध्ये फलोत्पादनासाठी ६७ लाख रूपयांचा निधी मंजूर करून ५२ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. त्यापैकी केवळ २ लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. एकूण पाटबंधारे व पूर नियंत्रण विभागासाठी वितरित ९८९.५७ निधीपैैकी ६६९.०७ निधी खर्च करण्यात आला आहे. याची टक्केवारी ६७.६१ टक्के आहे. एकूण गाभा व बिगर गाभा क्षेत्रात केवळ ६९.८२ टक्केच निधी खर्च झाला आहे. एकूण उद्योग क्षेत्रात एकूण खर्चाची टक्केवारी केवळ ४९.२५ टक्के आहे. संपूर्ण क्षेत्र उपक्षेत्रांमधील एकूण ९५८०.९० वितरित निधीपैकी ६५९४.१८ निधी खर्च झाला आहे. याची टक्केवारी ६८.८३ टक्के आहे. अनेक विभाग निधी खर्च करण्यात चालू वर्षात माघारल्याचेही दिसून येत आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अत्यल्प अवधी असतानाही अनेक विभागाचा ५० ते ७० टक्के निधी अखर्चित असल्याने या विभागांसमोर योजनांवर १०० टक्के निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. खर्च करण्यासाठी प्रत्येक विभागाने लगबग करण्यास सुरूवात केली असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)दोन विभागाने गाठली खर्चात शंभरीचालू आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण आराखड्यात एकूणच अनेक विभागांनी ५० टक्क्याहून खर्चाचे उद्दिष्ट गाठले असले तरी अनेक विभाग केवळ २० व त्याहून अधिक टक्के निधी खर्च करण्यात यश मिळविले आहे. मात्र ग्रामविकास विभागाने वितरित केलेल्या एकूण तरतुदींपैकी १०० टक्के खर्च केला आहे. या विभागाचा मंजूर नियतव्यय १०८२.७८ आहे. ४२२.१५ वितरित निधीपैकी संपूर्ण निधी खर्च करण्यात आला आहे. ऊर्जा विभागाने ५००.०० मंजूर नियतव्ययपैकी संपूर्ण प्राप्त निधी खर्च केला आहे. केवळ दोन विभागाने निधी खर्चाच्या टक्केवारीत शंभरी गाठली आहे.