शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

खरीपात ६० टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 6:00 AM

यावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँका माघारल्या : जिल्हा बँकेने गाठले ९२.९० टक्के उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सहकार विभागाने ठरवून दिलेले पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात बँकांना यश आले. ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपाचे केवळ ४०.४० टक्के उद्दिष्ट गाठले तर जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक ९२.९० टक्के कर्जवाटप करून याही वर्षी आघाडी घेतली आहे.यावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले. हे कर्ज १६ हजार ५३ शेतकऱ्यांना देण्यात आले.राष्ट्रीयीकृत बँकांना ७७ कोटी ६७ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ३१ कोटी ७१ लाख वाटप झाले. हे कर्ज ५३६८ शेतकºयांना देण्यात आले. अ‍ॅक्सिस व आयसीआयसीआय या खासगी बँकांनी तर शेतकऱ्यांना जेमतेम १६.१६ टक्केच कर्जवाटप केले. त्यांनी अवघ्या सात शेतकऱ्यांना ३२ लाखांचे पीक कर्ज दिले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १८३५ शेतकºयांना ११ कोटी ६९ लाखांचे कर्जवाटप करत ५३.६९ टक्के उद्दीष्ट गाठले आहे.रबी हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यातील सर्व बँकांना मिळून २३ कोटी १८ लाखांचे उद्दीष्ट दिले आहे. हे उद्दीष्ट कोणत्या बँका किती प्रमाणात गाठतात याकडे शेतकरी व सहकार विभागाचे लक्ष लागले आहे.पाच हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतकर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्षे झाली तरी अजून ५ हजार पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जिल्ह्यात ४० हजार ४०० शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविले आहे. त्यापैकी ३५ हजार ३३१ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकरी प्रतीक्षेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, कर्जमाफीसाठी पुरेसा निधी सध्या सरकारकडे नाही. बँकांनी त्यासंबंधीचे पत्र सरकारकडे पाठविले आहे. परंतू निधीअभावी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही.गेल्यावर्षीपेक्षा कर्जवाटपात घटगेल्यावर्षीच्या कर्जमाफीनंतर यावर्षी कर्जाचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी झाले. कर्जवाटपाचे लक्ष्यच कमी देण्यात आल्याने वाटपही घटले. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामासाठी २०२ कोटी ९१ लाख कर्जवाटपाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ५२.५६ टक्के उद्दीष्ट गाठत २५ हजार ५४१ शेतकऱ्यांना १०६ कोटी ६४ लाखांचे कृषी कर्ज वाटण्यात आले.यावर्षी मात्र कर्जवाटपाचे लक्ष्य घटवून १५७ कोटी ७० लाख केले होते. त्यापैकी ६०.३६ टक्के लक्ष्य गाठत ९५ कोटी १९ लाखांचे कर्ज वाटण्यात आले. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमी होऊन २३ हजार २५६ वर आली आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी