शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

खरीपात ६० टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

यावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँका माघारल्या : जिल्हा बँकेने गाठले ९२.९० टक्के उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सहकार विभागाने ठरवून दिलेले पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात बँकांना यश आले. ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपाचे केवळ ४०.४० टक्के उद्दिष्ट गाठले तर जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक ९२.९० टक्के कर्जवाटप करून याही वर्षी आघाडी घेतली आहे.यावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले. हे कर्ज १६ हजार ५३ शेतकऱ्यांना देण्यात आले.राष्ट्रीयीकृत बँकांना ७७ कोटी ६७ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ३१ कोटी ७१ लाख वाटप झाले. हे कर्ज ५३६८ शेतकºयांना देण्यात आले. अ‍ॅक्सिस व आयसीआयसीआय या खासगी बँकांनी तर शेतकऱ्यांना जेमतेम १६.१६ टक्केच कर्जवाटप केले. त्यांनी अवघ्या सात शेतकऱ्यांना ३२ लाखांचे पीक कर्ज दिले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १८३५ शेतकºयांना ११ कोटी ६९ लाखांचे कर्जवाटप करत ५३.६९ टक्के उद्दीष्ट गाठले आहे.रबी हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यातील सर्व बँकांना मिळून २३ कोटी १८ लाखांचे उद्दीष्ट दिले आहे. हे उद्दीष्ट कोणत्या बँका किती प्रमाणात गाठतात याकडे शेतकरी व सहकार विभागाचे लक्ष लागले आहे.पाच हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतकर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्षे झाली तरी अजून ५ हजार पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जिल्ह्यात ४० हजार ४०० शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविले आहे. त्यापैकी ३५ हजार ३३१ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकरी प्रतीक्षेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, कर्जमाफीसाठी पुरेसा निधी सध्या सरकारकडे नाही. बँकांनी त्यासंबंधीचे पत्र सरकारकडे पाठविले आहे. परंतू निधीअभावी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही.गेल्यावर्षीपेक्षा कर्जवाटपात घटगेल्यावर्षीच्या कर्जमाफीनंतर यावर्षी कर्जाचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी झाले. कर्जवाटपाचे लक्ष्यच कमी देण्यात आल्याने वाटपही घटले. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामासाठी २०२ कोटी ९१ लाख कर्जवाटपाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ५२.५६ टक्के उद्दीष्ट गाठत २५ हजार ५४१ शेतकऱ्यांना १०६ कोटी ६४ लाखांचे कृषी कर्ज वाटण्यात आले.यावर्षी मात्र कर्जवाटपाचे लक्ष्य घटवून १५७ कोटी ७० लाख केले होते. त्यापैकी ६०.३६ टक्के लक्ष्य गाठत ९५ कोटी १९ लाखांचे कर्ज वाटण्यात आले. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमी होऊन २३ हजार २५६ वर आली आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी