शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रबीसाठी सहा कोटींचे कर्ज

By admin | Updated: January 24, 2015 22:54 IST

रबी हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी ८९९ शेतकऱ्यांना सहा कोटी ४५ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

गडचिरोली : रबी हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी ८९९ शेतकऱ्यांना सहा कोटी ४५ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. खरीप हंगामाबरोबरच बहुतांश शेतकरी रबी पिकांचेही उत्पादन घेतात. यावर्षी जवळपास ५० हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने नियोजन केले होते. त्याचबरोबर आरमोरी, देसाईगंज या तालुक्यांमध्ये इटीयाडोह तलावाचे पाणी येत असल्याने या तालुक्यांमध्ये उन्हाळी धानपिकाचेही उत्पादन घेतले जाते. याशिवाय रबी हंगामामध्ये सूर्यफूल, सोयाबीन, गहू, हरभरा, तूर, लाखोळी, पोपट, उळीद, मूग आदी पिकांचेही उत्पादन घेतले जाते. धानपीक निघण्यापूर्वीच रबी पिकांची लागवड करण्यात येते. या कालावधीत बहुतांश शेतकऱ्यांकडे पैसाच राहत नाही. त्यामुळे बँकांकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. सावकाराच्या तुलनेत बँका अत्यंत कमी दराने कर्जाचा पुरवठा करतात. त्यामुळे शेतकरीही बँकेकडूनच कर्ज घेण्यास पसंती दर्शवितात. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीयकृत ६१ व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५० अशा एकूण १११ शाखा आहेत. चालू वर्षी प्रतिएकरी १२ हजार रूपये कर्ज देण्याची मर्यादा ठरविण्यात आली होती. त्याचबरोबर सर्वच बँकांना मिळून १४ कोटी ८७ लाख रूपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त राष्ट्रीयकृत बँकांनी ६ कोटी ४५ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. या कर्जावर सहा टक्के व्याजदर आकारला जातो. मात्र ही सर्व रक्कम काही कालावधीनंतर शासनाकडून बँकांना मिळत असल्याने सदर रक्कम नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के नागरिक शेती हाच व्यवसाय करतात. बहुतांश शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी येणारा खर्च कर्ज घेऊन भागविल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे शेतकरी बँकांकडे कर्जाची मागणी करतात. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत बँकांची संख्या अत्यंत कमी आहे. १० ते २० किमी अंतर पार करून बँकेमध्ये जावे लागते. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना बँक सवलतीच्या दरात कर्ज देते, हे सुद्धा माहित नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या सुविधेपासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. सावकार बँकांच्या तुलनेत दोन ते तीनपटीने अधिक व्याजदराची आकारणी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात बँकांचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)