शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

रबीसाठी सहा कोटींचे कर्ज

By admin | Updated: January 24, 2015 22:54 IST

रबी हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी ८९९ शेतकऱ्यांना सहा कोटी ४५ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

गडचिरोली : रबी हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी ८९९ शेतकऱ्यांना सहा कोटी ४५ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. खरीप हंगामाबरोबरच बहुतांश शेतकरी रबी पिकांचेही उत्पादन घेतात. यावर्षी जवळपास ५० हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने नियोजन केले होते. त्याचबरोबर आरमोरी, देसाईगंज या तालुक्यांमध्ये इटीयाडोह तलावाचे पाणी येत असल्याने या तालुक्यांमध्ये उन्हाळी धानपिकाचेही उत्पादन घेतले जाते. याशिवाय रबी हंगामामध्ये सूर्यफूल, सोयाबीन, गहू, हरभरा, तूर, लाखोळी, पोपट, उळीद, मूग आदी पिकांचेही उत्पादन घेतले जाते. धानपीक निघण्यापूर्वीच रबी पिकांची लागवड करण्यात येते. या कालावधीत बहुतांश शेतकऱ्यांकडे पैसाच राहत नाही. त्यामुळे बँकांकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. सावकाराच्या तुलनेत बँका अत्यंत कमी दराने कर्जाचा पुरवठा करतात. त्यामुळे शेतकरीही बँकेकडूनच कर्ज घेण्यास पसंती दर्शवितात. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीयकृत ६१ व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५० अशा एकूण १११ शाखा आहेत. चालू वर्षी प्रतिएकरी १२ हजार रूपये कर्ज देण्याची मर्यादा ठरविण्यात आली होती. त्याचबरोबर सर्वच बँकांना मिळून १४ कोटी ८७ लाख रूपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त राष्ट्रीयकृत बँकांनी ६ कोटी ४५ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. या कर्जावर सहा टक्के व्याजदर आकारला जातो. मात्र ही सर्व रक्कम काही कालावधीनंतर शासनाकडून बँकांना मिळत असल्याने सदर रक्कम नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के नागरिक शेती हाच व्यवसाय करतात. बहुतांश शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी येणारा खर्च कर्ज घेऊन भागविल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे शेतकरी बँकांकडे कर्जाची मागणी करतात. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत बँकांची संख्या अत्यंत कमी आहे. १० ते २० किमी अंतर पार करून बँकेमध्ये जावे लागते. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना बँक सवलतीच्या दरात कर्ज देते, हे सुद्धा माहित नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या सुविधेपासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. सावकार बँकांच्या तुलनेत दोन ते तीनपटीने अधिक व्याजदराची आकारणी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात बँकांचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)