शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

५५ नवीन बाधित तर २६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या २६ रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १४, चामोर्शी १, भामरागड १, कोरची ३, अहेरी २ आणि देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ५५ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, देसाईगंज येथील ७, चामोर्शी २, आरमोरी ३, धानोरा २, कोरची २, मुलचेरा १, कुरखेडा २, सिरोंचा ४, अहेरी २ आणि एटापल्लीतील ६ जणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देदेसाईगंजमधील एकाचा मृत्यू : एकूण बाधित झाले १ हजार ८९६, सर्वाधिक गडचिरोलीतील

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आज २६ जण कोरोनामुक्त झाले असताना नवीन ५५ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनारुग्णांची संख्या ५६५ झाली आहे. देसाईगंज येथील एका महिला कोरोनारुग्णाच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी घेण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्यूसंख्या ८ वर पोहोचली आहे.आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९६ वर गेली असून पुढील दोन दिवसात दोन हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी १ हजार ३२३ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या २६ रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १४, चामोर्शी १, भामरागड १, कोरची ३, अहेरी २ आणि देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ५५ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, देसाईगंज येथील ७, चामोर्शी २, आरमोरी ३, धानोरा २, कोरची २, मुलचेरा १, कुरखेडा २, सिरोंचा ४, अहेरी २ आणि एटापल्लीतील ६ जणांचा समावेश आहे.नवीन बाधित गडचिरोलीच्या रुग्णांमध्ये सोनापूर कॉम्प्लेक्सचे ३, गोकुळनगर ३, धुंडेशिवणी, पार्डी कुपी, हनुमान वार्ड, सुयोगनगर नवेगाव, रामपुरी वार्ड, महिला महाविद्यालय, सी-६० जवान, वनश्री कॉलनी, जिल्हा रूग्णालय, रामनगर वार्ड नं.८, सद्गुरू नगर नगर परिषदजवळ, आनंद नगर, सेमाना रस्ता, तसेच ब्रह्मपुरी व मूल येथील रुग्ण आहेत. देसाईगंज येथील ७ जणांमध्ये एसआरपीएफ ७, अहेरी २, सिरोंचा ४ यात आरोग्य कर्मचारी २, इतर २, आरमोरी ३, चामोर्शी २, हनुमान वार्ड १, येनापूर १, धानोरा येथील सीआरपीएफ २, एटापल्लीच्या ६ मध्ये सीआरपीएफ ४, आरोग्य कर्मचारी १, तसेच कोरची येथील २, मुलचेरा १ व कुरखेडा येथील २ जणांचा समावेश आहे.७३ टक्के पुरूष तर २७ टक्के महिला बाधितजिल्ह्यात आतापर्यंत प्रतिलक्ष ३ हजार ९९७ तपासण्या केल्या गेल्या. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट ४.२९ टक्के तर निगेटिव्ह रेट ९४.७१ टक्के आहे. पुरुष ७३ टक्के तर महिलांचे प्रमाण २७ टक्के आहे. सद्या ५३७ क्रियाशिल रुग्ण असून त्यांची टक्केवारी एकूण बाधितांच्या २९ टक्के आहे. मृत्यू ८ असून त्याची टक्केवारी ०.४३ म्हणजे आर्ध्या टक्क्याहून कमी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी मृत्यूदर गडचिरोलीत आहे. चाचण्यांच्या बाबतीतही जिल्हा आघाडीवर आहे. डबलिंग रेट जिल्ह्यात १७.९ असून या महिन्यात रुग्ण वाढल्याने प्रतिदिन ४० च्या प्रमाणात संख्या वाढत आहे.जनता कर्फ्यू करणार की नाही?जिल्ह्याच्या सर्व भागात नाही तरी किमान शहराच्या हद्दीत ‘जनता कर्फ्यू’ पाळून कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याची गरज आहे. अनेक दुकानदार त्याबाबतची प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यासाठी कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. काही व्यापाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मात्र अद्याप जनता कर्फ्यूसंदर्भात निर्णय झालेला नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू