शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

५२ टक्के वृक्ष जिवंत

By admin | Updated: October 25, 2014 22:38 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी हरितसेनेच्या शिक्षक

तपाासणीचा अंतिम अहवाल : वृक्ष संगोपनात देसाईगंज तालुका यशस्वीगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी हरितसेनेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली. तपासणीच्या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यातील तीनही वर्षांतील जीवंत रोपांची टक्केवारी ५२.१२ इतकी आहे. देसाईगंज तालुक्याची तीनही वर्षाची जीवंत रोपट्यांची सरासरी टक्केवारी ७० पेक्षा अधिक असल्याने वृक्ष संगोपनात देसाईगंज तालुका यशस्वी झाला असल्याचे दिसून येते. राज्य शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत गावपरिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येते. सदर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दरवर्षी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबविला जातो. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवडीची तपासणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेने तयार केलेल्या तपासणी अहवालात पूर्णत: तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे शासनाने निरपेक्ष विशेष वृक्ष लागवड तपासणी मोहीम हाती घेतली. शासनाच्या निर्णयानुसार हरित संरक्षक गटांमार्फत ग्रा.पं.च्या वृक्ष लागवडीच्या तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. सदर वृक्ष लागवड तपासणी मोहीम हरित सेनेचे शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुटीच्या दिवशी वृक्ष लागवडीची तपासणी करून अंतिम अहवाल जि. प. प्रशासनाकडे सादर केलेला आहे. सादर करण्यात आलेल्या या अंतिम अहवालानुसार सन २०११-१२ या वर्षातील जिवंत वृक्षांची टक्केवारी ५७.१९ आहे. यात धानोरा तालुक्याची टक्केवारी २४.८४, कुरखेडा ५७.६६, देसाईगंज ७६.१३, सिरोंचा ३४.५७ टक्के आहे. सन २०१२-१३ या वर्षात बाराही तालुक्यात ४ लाख ३७ हजार ५५३ वृक्षांची ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आली होती. यापैकी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अंतिम तपासणी अहवालानुसार जिवंत रोपट्यांची संख्या २ लाख ९० हजार ६१२ इतकी असून याची टक्केवारी ६६.४१ आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील जिवंत वृक्षांची टक्केवारी ४५.५६ टक्के आहे. आरमोरी ४८ टक्के, चामोर्शी २८.७४ टक्के, धानोरा ५२.६३ टक्के, एटापल्ली ४६.९१ टक्के, गडचिरोली ५९.२४ टक्के, कोरची ७९.६२ टक्के, कुरखेडा ५८ टक्के, मुलचेरा ४५.६० टक्के, देसाईगंज ६५.८१ टक्के व सिरोंचा तालुक्यातील जिवंत वृक्षांची टक्केवारी २६.१३ आहे.सन २०१३-१४ या वर्षात बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत एकूण ६ लाख ६३ हजार ७३१ वृक्ष लागवड करण्यात आली. यापैकी नुकताच करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत २ लाख ८२ हजार ६१८ जिवंत वृक्ष असल्याचे आढळून आले. या वर्षातील जीवंत वृक्षाची टक्केवारी ४२.५८ आहे. (स्थानिक प्रतिनिधी)