शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी विधानसभेसाठी २९० केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची व्होटर स्लिप ही पांढºया रंगाच्या कोºया कागदावर असावी, या स्लिपवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवाराचे नाव, वॉटर मार्क नसावे, वोटर स्लिप प्रिंडेट किंवा झेरॉक्स असू शकते.

ठळक मुद्देनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती : खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रात २९० मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. या मतदान विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ३६ हजार २८६ मतदार आहेत, अशी माहिती अहेरीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी मनिष लोणारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची व्होटर स्लिप ही पांढºया रंगाच्या कोºया कागदावर असावी, या स्लिपवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवाराचे नाव, वॉटर मार्क नसावे, वोटर स्लिप प्रिंडेट किंवा झेरॉक्स असू शकते. मतदार ओळखपत्र असणे म्हणजे मतदाराला मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. तर त्यासाठी मतदार यादीत त्या मतदाराचे नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल तर निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ११ पैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर केल्यास मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. मतदान केंद्रांवर पाणी, वीज, रॅम्प उपलब्ध राहतील. प्रत्येक केंद्रावर बीएलओ राहतील. मतदानापूर्वी मॉकपोल घेण्यात येईल.निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी-व्हीजील अ‍ॅप, वोटर हेल्पलाईन अ‍ॅप, पीडब्ल्यूडी अ‍ॅप, कॅन्डीडेट सुविधा अ‍ॅप, एनजीएसपी, वोटर टीमोट अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत.खर्चासाठी उमेदवाराकडे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये देण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून खर्चाचा हिशोब दुपारी २ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. अंतिम हिशोब उमेदवार निवडून आल्यानंतर ३० दिवसांत दाखल करणे बंधनकारक राहील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीष लोणारकर यांनी दिली.दुपारपर्यंत स्वीकारणार निमनिर्देशन पत्र२७ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत कार्यालयीन दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. २८ तारखेला चौथा शनिवार, २९ ला रविवार असल्याने या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत. ५ आॅक्टोबर रोेजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. ७ आॅक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक असेल. २१ आॅक्टोबर रोजी मतदान होईल. मतदानाच्या दिवसाच्या ४८ तासांच्या अगोदर प्रचार बंद करण्यात येईल.नवीन अधिकाºयासाठी आव्हानात्मक कामविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून मनिष लोणारकर दोन दिवसांपूर्वी रुजू झाले. गडचिरोली जिल्ह्यात हा उपविभाग आणि अहेरी मतदार संघ नक्षलदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशिल भाग आहे. या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळताना लोणारकर यांना पोलीस विभागाशी समन्वय ठेवत ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत या उपविभागात नक्षल्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणले तरी या भागात सर्वाधिक मतदान झाले होते हे विशेष.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019