शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

मानव विकासच्या ४९ बसेस शालेय मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:08 IST

गडचिराेली : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनींची गरज लक्षात घेऊन गडचिराेली ...

गडचिराेली : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनींची गरज लक्षात घेऊन गडचिराेली आगारामार्फत मानव विकास मिशनच्या ४९ बसेस शालेय मार्गावर साेडल्या जात आहेत. ३० जानेवारीपर्यंत गडचिराेली आगाराअंतर्गत येत असलेल्या सात तालुक्यांमधील १ हजार ४९ विद्यार्थिनींना पासचे वाटप करण्यात आले आहे.

पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी शासनामार्फत गडचिराेली आगाराला ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस विद्यार्थ्यांच्या मार्गावर त्यांच्या शाळेच्या वेळेत साेडणे अपेक्षित आहे. काेराेनामुळे वर्षभरापासून शाळा बंद हाेत्या. २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे व २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवित आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या माेफत प्रवासासाठी शासनामार्फत अहिल्याबाई हाेळकर याेजना व मानव विकास मिशन या दाेन याेजना राबविल्या जातात. शाळा सुरू हाेताच विद्यार्थिनींना पास देण्यास सुरुवात झाली आहे. मुख्याध्यापकांनी कळविलेल्या शाळेच्या वेळेनुसार बसेस साेडल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींचा शालेय प्रवास सुकर हाेण्यास मदत हाेत आहे.

बाॅक्स....

सावलीसाठी स्वतंत्र बसेस

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली हा तालुका मानव विकास याेजनेअंतर्गत येतो. या तालुक्यातील सावली, व्याहाड, हिरापूर, साेनापूर, माेखाळा, सामदा, चकपिरंजी आदी गावांमधील शेकडाे विद्यार्थिनी गडचिराेली येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थिनींसाठी दरदिवशी बसेस साेडल्या जात आहेत.

काेट...

गडचिराेली आगारात मानव विकास मिशनच्या ४९ बसेस आहेत. मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार या बसेस संबंधित मार्गावर व त्यांच्या वेळेनुसार साेडल्या जात आहेत. मानव विकास मिशनच्या बसेसबाबत काही तक्रारी असल्यास पालक, मुख्याध्यापक किंवा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे सादर कराव्यात. त्यांच्या सूचनांनुसार याेग्य ताे बदल केला जाईल.

- मंगेश पांडे, आगारप्रमुख, गडचिराेली

काेट....

१ जानेवारीपर्यंत मानव विकास मिशनच्या बसेस वेळेवर येत नव्हत्या. आता मात्र वेळेवर येत आहेत. मानव विकास मिशनच्या बसेसमुळे विद्यार्थिनींची साेय झाली आहे.

- आचल झाेडगे, विद्यार्थिनी

बाॅक्स....

१०७२

जिल्ह्यात सुरू असलेल्या शाळा

..................

विद्यार्थिनींची संख्या

१२६५०

पाचवी ते आठवी

..............

११५२४

नववी ते बारावी