शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

४५२ गावांत गेली स्कूलबस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:09 IST

जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सुरू असलेल्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात २०१८-१९ या वर्षात खर्च केलेल्या १५ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीपैकी सर्वाधिक निधी (५ कोटी ३५ लाख रुपये) विद्यार्थिनींना शाळेपर्यंत आणि शाळेतून गावापर्यंत सोडणाऱ्या स्कूल बसेसवर खर्च झाला आहे.

ठळक मुद्दे१८८ शाळांचा समावेश : वर्षभरात ५९७८ विद्यार्थिनींचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सुरू असलेल्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात २०१८-१९ या वर्षात खर्च केलेल्या १५ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीपैकी सर्वाधिक निधी (५ कोटी ३५ लाख रुपये) विद्यार्थिनींना शाळेपर्यंत आणि शाळेतून गावापर्यंत सोडणाऱ्या स्कूल बसेसवर खर्च झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ४५२ गावांमधील ५९७८ विद्यार्थिनींनी एसटी महामंडळाच्या त्या स्कूल बसेसचा वापर केल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेने घेतली आहे.जिल्ह्यात देसाईगंज वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रम राबविला जात आहे. यातून रोजगार निर्मितीला चालना देणारे प्रशिक्षण, साहित्य पुरवठ्यासारख्या योजना, शेतकऱ्यांना कृषीपयोगी साहित्य वाटप, आरोग्यविषयक शिबिरे यासह विद्यार्थिनींना शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या निळ्या रंगाच्या स्कूल बसची सुविधा देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक गावात माध्यमिक शाळा नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी वरच्या वर्गाची सोय असणाºया जवळच्या किंवा तालुक्याच्या गावात जाण्यासाठी प्रशासनाकडून मानव विकासच्या निधीतून एसटी महामंडळाच्या निळ्या गाड्यांच्या विशेष फेºया शाळेच्या वेळेवर सोडल्या जातात.या बसेसमध्ये विद्यार्थिनींना शाळेपर्यंत मोफत प्रवास करता येतो. गेल्या आर्थिक वर्षात १८८ शाळांच्या ५९७८ विद्यार्थिनींनी या सुविधेचा लाभ घेतला.२९१८ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटपजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बस जाण्याइतपत मार्गच नाही. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमातील स्कूल बसेसमधून प्रवास करणे त्या गावातील विद्यार्थिनींना शक्य होत नाही. अशा स्थितीत सायकलने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मार्च २०१९ अखेर मानव विकास कार्यक्रमातून २९१८ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यात १२६ शाळांमधील विद्यार्थिनी असून त्यांच्या सायकलींवर ८७ लाख ५४ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेत विद्यार्थिनींनी आधी सायकल विकत घेऊन त्याचे बिल सादर करायचे होते. त्यानुसार सायकल विकत घेणाºया प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यात ३ हजार रुपये टाकण्यात आले. 

 

टॅग्स :Schoolशाळा