शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

४५ टक्के विद्यार्थी गणितात कच्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:30 IST

डीआयईसीपीडी अंतर्गत घेण्यात आलेल्या अध्ययनस्तर निश्चिती चाचणीत ४५ टक्के विद्यार्थी गणितात कच्चे असल्याचे दिसून आले आहे. ५७ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचता येत असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देतिसरी अध्ययनस्तर निश्चिती : ५७ टक्के विद्यार्थी भाषेत उत्तम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डीआयईसीपीडी अंतर्गत घेण्यात आलेल्या अध्ययनस्तर निश्चिती चाचणीत ४५ टक्के विद्यार्थी गणितात कच्चे असल्याचे दिसून आले आहे. ५७ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचता येत असल्याचे दिसून आले.जिल्हाभरातील विद्यार्थ्यांची इयत्तेनुसार शैक्षणिक प्रगती कळावी, यासाठी अध्ययनस्तर निश्चिती हा उपक्रम घेतला जातो. या उपक्रमांतर्गत भाषा व गणित या दोन विषयांची चाचणी घेतली जाते. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील तिसरी अध्ययनस्तर निष्पत्ती चाचणी १० ते १५ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली.जिल्हाभरात पहिली ते आठवीचे एकूण १ लाख २९ हजार २२२ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १ लाख २६ हजार ९८९ विद्यार्थ्यांनी अध्ययनस्तर निष्पत्तीची चाचणी दिली. भाषा विषयाची चाचणी घेताना भाषण, संभाषण, शब्द वाचन, वाक्य वाचन, समजपूर्वक उतारा वाचन घेतले जाते. भाषा विषयाच्या चाचणीत ५७ टक्के विद्यार्थी त्या-त्या वर्गानुसार कौशल्य प्राप्त केले असल्याचे दिसून आले. उर्वरित ४३ टक्के विद्यार्थी भाषा विषयाचे काही कौशल्य प्राप्त केले नसल्याचे दिसून आले. गणित विषयामध्ये संख्याज्ञान, बेरीजस्तर, वजाबाकी स्तर, गुणाकार स्तर, भागाकार या चाचण्या घेतल्या जातात. यामध्ये ५५ टक्के विद्यार्थ्यांनी गणिताचे कौशल्य आत्मसात केले आहे. मात्र ४५ टक्के विद्यार्थी मागे असल्याचे दिसून आले आहे.जिल्हाभरातील व राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा अध्ययनस्तर निश्चितीच्या माध्यमातून कळत असल्याने या चाचणीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील, या उद्देशाने शाळेकडून प्रयत्न केले जातात. पहिलीचे विद्यार्थी सर्वाधिक मागे असल्याचे दिसून येते. वाढत्या वर्गाबरोबरच त्यांच्यामध्ये भाषा व गणित या दोन्ही विषयांमध्ये त्यांनी प्रगती केली असल्याचे दिसून येते.भाषण, संभाषणात विद्यार्थी पुढेभाषा विषयामध्ये भाषण, संभाषण कौशल्याची चाचणी घेतली जाते. या कौशल्यात बहुतांश विद्यार्थी पुढे आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. शब्द वाचनमध्ये जवळपास ८० ते ९० च्या दरम्यान गुण प्राप्त आहेत. तर वाक्य वाचनमध्येही ७० ते ८० च्या दरम्यान गुण मिळाले आहेत. संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या कौशल्यांमध्ये विद्यार्थ्यांना ८० ते ९० च्या दरम्यान गुण मिळाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील स्थिती चांगली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी