शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटअभावी ३७ दुचाकीस्वारांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अपघातांविषयी आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत.

ठळक मुद्दे७ महिन्यात जिल्ह्यात ६३ अपघाती मृत्यू : दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जानेवारी ते जुलै या ७ महिन्याच्या कालावधीत रस्ते अपघातात गडचिरोली जिल्ह्यात ६३ जणांनी प्राण गमावले. त्यातील ३७ मृत्यू हे दुचाकीस्वारांचे आहेत. त्या सर्वांनी हेल्मेट घातलेले नव्हते हे विशेष. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचलेही असते. मंगळवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हा मुद्दा गांभिर्याने घेत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आता दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे करा, असे निर्देश दिले.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अपघातांविषयी आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत.मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांपैकी कोणत्याही व्यक्तीने डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. यापुढे दुचाकीस्वारांचे अपघात झाल्यास प्राणहाणी टाळता यावी म्हणून प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करण्याबाबत प्रक्रिया राबवा, त्यासाठी जनजागृती करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक व पोलीस विभागाला दिल्या.हेल्मेटसक्ती करताना सुरूवातीला एक महिना वाहनधारकांची जनजागृती केली जाईल. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाºयांनी बैठकीत सांगितले.या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे, गडचिरोली वाहतूक शाखेच्या प्रभारी पुनम गोरे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.जयंत पर्वते आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) गोरख गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात'जास्त वेगाने दुचाकी चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे ही या अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले. यापुढे प्रत्येक अपघाताचे सूक्ष्म विश्लेषण करून अहवाल तयार करावा, जेणेकरून त्यावरून ब्लॅक स्पॉट (वारंवार अपाघाताचे ठिकाण) ठरविण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचविले. तसेच अपघातांच्या विश्लेषणावरून नेमक्या चुका कोणत्या आहेत व त्यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास करणे सोपे होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.जनजागृतीसाठी स्वेच्छेने काम करणाऱ्यांना संधीअपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक गाव, शहरांमध्ये जनजागृती कार्यक्र मांचे आयोजन करा, त्यासाठी स्वच्छेने काम करणात्र्या संस्था किंवा व्यक्तींना संधी देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यासाठी इच्छुकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली येथे संपर्कसाधावा असे आवाहन करण्यात आले. चौकांमध्ये वाहन चालकांशी संवाद साधणे, पत्रके तयार करणे, बॅनर लावणे अशा घटकांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :Accidentअपघात