शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३४५ नव्या गावांचा होणार उदय

By admin | Updated: July 5, 2014 23:33 IST

जिल्ह्यातील अनेक वस्त्या पेसा, अनुसूचित विस्तार कार्यक्रम कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वस्त्या, वाड्या व टोल्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश राज्याच्या ग्राम विकास

पेसा कायदा : वाड्या, वस्त्या व टोल्यांना मिळणार स्वतंत्र ओळखदिलीप दहेलकर -गडचिरोलीजिल्ह्यातील अनेक वस्त्या पेसा, अनुसूचित विस्तार कार्यक्रम कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वस्त्या, वाड्या व टोल्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश राज्याच्या ग्राम विकास विभागाने दिले आहे. यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये एकूण ३४५ नव्या गावांचा उदय होणार असून या गावांना स्वतंत्र ओळखही मिळणार आहे. ४ मार्च २०१४ च्या शासनाच्या अधिसूचनेनुसार जि.प.च्या पंचायत विभागाने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेत बैठक बोलाविली. तसेच ग्रामसभेचे प्रस्तावही मागितले. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेकडे ११ तालुक्यातील ३४५ पैकी एकूण २९२ प्रस्ताव प्राप्त झाले आहे. यात गडचिरोली ३, आरमोरी १५, कुरखेडा ४३, धानोरा ४९, चामोर्शी १५, अहेरी ०, एटापल्ली ११२, कोरची २५ व मुलचेरा तालुक्यातील १२, भामरागड १२, सिरोंचा तालुक्यातील ६ ग्रामसभेच्या प्रस्तावांचा समावेश आहे. ग्रामसभेची मंजुरी एकूण मतदाराच्या ५० टक्के उपस्थितीत वाड्या, वस्त्या व टोल्यांना गावांचा दर्जा देण्यासाठी पेसा कायद्यांतर्गत आवश्यक आहे. जि.प.ने सदर प्रस्ताव संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविले. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी जिल्हाधिकारी देतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर वाड्या व वस्त्यांना स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ३४५ वस्त्या, वाड्या व टोल्यांना गावाचा दर्जा मिळण्यासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. उर्वरित ५३ ग्रामसभेचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश सीईओंनी दिले.गावांची संख्या वाढणारजिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतींतर्गत एकूण १ हजार ६८१ गावे आहेत. आता ३४५ वाड्या, वस्त्या व टोल्यांना पेसा कायद्यांतर्गत स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या २ हजार २६ पर्यंत पोहोचणार आहे. पेसा कायद्याने आदिवासी वसाहतींना विशेष अधिकार दिले आहे. यामुळे जिल्ह्यात नव्या गावांची निर्मिती होणार आहे. पेसा कायद्यांतर्गत सर्वाधिक एटापल्ली तालुक्यात ११२ वाड्या, वस्त्या, टोल्यांना स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. या कामी जिल्हा परिषद प्रशासन झपाट्याने लागले आहे.नव्या गावांचा विकास होणारपेसा कायद्यांतर्गत जिल्ह्यात एकूण ३४५ वाड्या, वस्त्या व टोल्यांना स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. या वाड्या, वस्त्या व टोल्यातील नागरिकांना राज्य घटनेनुसार मतदानाचा अधिकार मिळाला आहे. मात्र गावांचा दर्जा मिळाला नसल्याने संबंधित ग्रामपंचायत या वाड्या, वस्त्या व टोल्यांचा विकास करण्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे या वाड्या, वस्त्या व टोल्यांमध्ये अद्यापही अनेक मुलभूत समस्या कायम आहेत. सदर वस्त्या मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. या वस्त्यांना पेसा कायद्यांतर्गत गावांचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाचा निधी प्राप्त होऊन विकास होणार आहे.