शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

३२५ आदिवासी शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:21 IST

आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्यांचा लाभ देण्यासाठी शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली ......

ठळक मुद्दे५० विहिरींच्या खोदकामास प्रारंभ : बिरसामुंडा कृषी क्रांती योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्यांचा लाभ देण्यासाठी शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ३२५ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुमारे ८ कोटी ७० लाख रूपये मंजूर केले आहेत. यातील क्षेत्रांतर्गतच्या शेतकऱ्यांसाठी ८ कोटी २१ लाख व क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांसाठी ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला विहीर बांधकामासाठी २.५० लाख, इनवेल बोअरसाठी २० हजार, वीज जोडणी आकारासाठी १० हजार, तुषार सिंचनसाठी २५ हजार, ठिबक सिंचनसाठी ५० हजार व जुनी विहीर दुरूस्तीसाठी ५० हजार रूपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने सुरूवातीला जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली होती. अनेक शेतकऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी अर्ज केला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता. ही बाब शासानाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती मागे घेतली व अर्ज करण्यास मुदतवाढ दिली.२२ जानेवारीला अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कामाला गती देत सुमारे २०० लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर बांधकामाचे आदेश दिले आहेत. त्यापैकी ५० विहिरींच्या खोदकामाला सुरूवात झाली आहे. विहीर बांधकामामुळे शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.अनुसूचित जातीसाठी २ कोटींचा निधीअनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना विहीर व इतर शेतीउपयोगी साहित्याचा लाभ देण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी शासनाने जिल्हा परिषदेला सुमारे २ कोटी १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून ६९ विहिरी मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ५० विहीर लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पैकी ८ विहिरींच्या कामाला सुरूवात झाली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यात १३, आरमोरी १६, देसाईगंज ८, कुरखेडा ५, कोरची २, धानोरा २, चामोर्शी ८, मुलचेरा २, अहेरी ९, एटापल्ली २, भामरागड १, सिरोंचा तालुक्यात ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.