शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

३२५ आदिवासी शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:21 IST

आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्यांचा लाभ देण्यासाठी शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली ......

ठळक मुद्दे५० विहिरींच्या खोदकामास प्रारंभ : बिरसामुंडा कृषी क्रांती योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्यांचा लाभ देण्यासाठी शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ३२५ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुमारे ८ कोटी ७० लाख रूपये मंजूर केले आहेत. यातील क्षेत्रांतर्गतच्या शेतकऱ्यांसाठी ८ कोटी २१ लाख व क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांसाठी ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला विहीर बांधकामासाठी २.५० लाख, इनवेल बोअरसाठी २० हजार, वीज जोडणी आकारासाठी १० हजार, तुषार सिंचनसाठी २५ हजार, ठिबक सिंचनसाठी ५० हजार व जुनी विहीर दुरूस्तीसाठी ५० हजार रूपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने सुरूवातीला जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली होती. अनेक शेतकऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी अर्ज केला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता. ही बाब शासानाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती मागे घेतली व अर्ज करण्यास मुदतवाढ दिली.२२ जानेवारीला अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कामाला गती देत सुमारे २०० लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर बांधकामाचे आदेश दिले आहेत. त्यापैकी ५० विहिरींच्या खोदकामाला सुरूवात झाली आहे. विहीर बांधकामामुळे शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.अनुसूचित जातीसाठी २ कोटींचा निधीअनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना विहीर व इतर शेतीउपयोगी साहित्याचा लाभ देण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी शासनाने जिल्हा परिषदेला सुमारे २ कोटी १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून ६९ विहिरी मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ५० विहीर लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पैकी ८ विहिरींच्या कामाला सुरूवात झाली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यात १३, आरमोरी १६, देसाईगंज ८, कुरखेडा ५, कोरची २, धानोरा २, चामोर्शी ८, मुलचेरा २, अहेरी ९, एटापल्ली २, भामरागड १, सिरोंचा तालुक्यात ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.