शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३२५ आदिवासी शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:21 IST

आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्यांचा लाभ देण्यासाठी शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली ......

ठळक मुद्दे५० विहिरींच्या खोदकामास प्रारंभ : बिरसामुंडा कृषी क्रांती योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्यांचा लाभ देण्यासाठी शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ३२५ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना विहीर व इतर शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुमारे ८ कोटी ७० लाख रूपये मंजूर केले आहेत. यातील क्षेत्रांतर्गतच्या शेतकऱ्यांसाठी ८ कोटी २१ लाख व क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांसाठी ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला विहीर बांधकामासाठी २.५० लाख, इनवेल बोअरसाठी २० हजार, वीज जोडणी आकारासाठी १० हजार, तुषार सिंचनसाठी २५ हजार, ठिबक सिंचनसाठी ५० हजार व जुनी विहीर दुरूस्तीसाठी ५० हजार रूपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने सुरूवातीला जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली होती. अनेक शेतकऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी अर्ज केला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता. ही बाब शासानाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती मागे घेतली व अर्ज करण्यास मुदतवाढ दिली.२२ जानेवारीला अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कामाला गती देत सुमारे २०० लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर बांधकामाचे आदेश दिले आहेत. त्यापैकी ५० विहिरींच्या खोदकामाला सुरूवात झाली आहे. विहीर बांधकामामुळे शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.अनुसूचित जातीसाठी २ कोटींचा निधीअनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना विहीर व इतर शेतीउपयोगी साहित्याचा लाभ देण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी शासनाने जिल्हा परिषदेला सुमारे २ कोटी १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून ६९ विहिरी मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ५० विहीर लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पैकी ८ विहिरींच्या कामाला सुरूवात झाली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यात १३, आरमोरी १६, देसाईगंज ८, कुरखेडा ५, कोरची २, धानोरा २, चामोर्शी ८, मुलचेरा २, अहेरी ९, एटापल्ली २, भामरागड १, सिरोंचा तालुक्यात ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.