शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

३ हजार १४२ प्रकरणे मंजूर

By admin | Updated: May 30, 2014 23:43 IST

विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यात विधवा, अपंग, वृध्द व निराधार लाभार्थ्यांची ३ हजार १४२ प्रकरणे मंजूर करून २0१३-१४ व २0१४-१५ या वर्षात लाभ देण्यात आला.

चामोर्शी तालुका : विधवा, अपंग, वृध्दापकाळ नवृत्ती वेतन योजनाचामोर्शी : विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यात विधवा, अपंग, वृध्द व निराधार लाभार्थ्यांची ३ हजार १४२ प्रकरणे मंजूर करून २0१३-१४ व २0१४-१५ या वर्षात लाभ देण्यात आला. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अथवा कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यास विशेष अर्थसहाय्य योजनेतर्फे लाभ दिला जातो. संजय गांधी निराधार योजना समिती चामोर्शीच्यावतीने अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली.दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ या वयोगटातील व्यक्ती मयत झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत २0 हजार रूपये मंजूर करण्यात येते. मे २0१४ मध्ये चामोर्शी तालुक्यातील १३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. २0१३-१४-१५ या वर्षात संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ४३१ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ३६३ प्रकरणे मंजूर तर ६८ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजनेंतर्गत एकूण ५१ प्रकरणे प्राप्त झाली व ही सर्व प्रकरणे मंजूर करण्यात आली.  इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन योजनेंतर्गत एकूण प्राप्त ११ प्रकरणो निकाली काढण्यात आली. o्रावण सेवा राज्य नवृत्ती वेतन योजना (नॉन बीपीएल) योजनेची २ हजार १४३ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी १ हजार ४५३ प्रकरणे मंजूर तर ६९0 प्रकरणे नामंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ नवृत्ती वेतन योजनेची (बीपीएल) एकूण १ हजार ६६८ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी १ हजार १५७ प्रकरणे मंजूर तर ४९१ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची १११ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी १0७ प्रकरणे मंजूर तर ४ प्रकरणे नामंजूर करण्यात आली.  विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत एकूण ४ हजार ३९५ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी ३ हजार १४२ प्रकरणे मंजूर तर १ हजार २५३ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत तालुक्यातील तुमडी येथील डाळंबा देवेंद्र गलबले व विष्णुपूर येथील रीना रतन शाकारी यांना प्रत्येकी २0 हजार रूपयाच्या आर्थिक मदतीचे धनादेश चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी तहसीलदार सिध्दार्थ खंडारे, नायब तहसीलदार देवेंद्र दहीकर आदी उपस्थित होते. विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मदत केली जात आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी महसूल यंत्रणेमार्फत विशेष दक्षता घेतली जात आहे. विशेष अर्थसाहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित गावच्या तलाठय़ाकडे विहित नमुन्यातील अर्ज भरून सादर करावे व  शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सिध्दार्थ खंडारे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)