शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

२७७ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:21 IST

पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा परिणाम : २६ जनावरांचा मृत्यू, नागरिक झाले बेघर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरत यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासून पावसाचा जोर सुरू आहे. अधूनमधून अतिवृष्टीही होत आहे. त्याचबरोबर धरणांचे पाणी सोडल्यानंतर नद्यांची पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण होते. याचा फटका नदी जवळच्या गावांना बसला. मागील २० दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे घरांची पडझड होण्याचे प्रमाण वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश घरे कौलारू व मातीचे आहेत. यातील काही घरे जुनी असल्याने त्यांचे छत गळते. सातत्याने पाऊस सुरू असल्याने मातीच्या भिंतींमध्ये ओलावा निर्माण होते व काही दिवसानंतर भिंत कोसळते. पावसाळ्यापासून २२ जुलैपर्यंत सुमारे २७७ घरांची पडझड झाली आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये सहा गोठे व तीन झोपड्यांचा समावेश आहे. महसूल विभागाने संबंधित घरांचे पंचनामे केले आहेत. ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने संबंधित कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी विजेचा धक्का, वीज पडणे यासारख्या घटनांमध्ये २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.अनेक शेतकºयांनी धान पिकाची रोवणी करण्यासाठी पैसे गोळा करून ठेवले. सदर पैसे घराच्या डागडुजीवर खर्च करावे लागत आहेत. ज्या शेतकºयांचे बैल मरण पावले. अशा शेतकºयांना वेळेवर २५ ते ३० हजार रूपये खर्चून बैल खरेदी करावे लागणार आहेत. अन्यथा शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस पडत आहे. पावणे दोन महिन्यांच्या कालावधीत वार्षिक सरासरीच्या अर्धा पाऊस पडला आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आणखी घर कोसळण्याच्या, वीज पडण्याच्या घटन घडून जीवित व वित्तहानी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.कोसरीत घर पडलेआरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोसरी येथील निरींगशहा जग्गू किरंगे यांचे मातीचे घर संततधार पावसामुळे रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कोसळले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरातील सर्व वस्तूंची नासाडी झाली.