शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

२७७ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:21 IST

पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा परिणाम : २६ जनावरांचा मृत्यू, नागरिक झाले बेघर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरत यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासून पावसाचा जोर सुरू आहे. अधूनमधून अतिवृष्टीही होत आहे. त्याचबरोबर धरणांचे पाणी सोडल्यानंतर नद्यांची पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण होते. याचा फटका नदी जवळच्या गावांना बसला. मागील २० दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे घरांची पडझड होण्याचे प्रमाण वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश घरे कौलारू व मातीचे आहेत. यातील काही घरे जुनी असल्याने त्यांचे छत गळते. सातत्याने पाऊस सुरू असल्याने मातीच्या भिंतींमध्ये ओलावा निर्माण होते व काही दिवसानंतर भिंत कोसळते. पावसाळ्यापासून २२ जुलैपर्यंत सुमारे २७७ घरांची पडझड झाली आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये सहा गोठे व तीन झोपड्यांचा समावेश आहे. महसूल विभागाने संबंधित घरांचे पंचनामे केले आहेत. ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने संबंधित कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी विजेचा धक्का, वीज पडणे यासारख्या घटनांमध्ये २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.अनेक शेतकºयांनी धान पिकाची रोवणी करण्यासाठी पैसे गोळा करून ठेवले. सदर पैसे घराच्या डागडुजीवर खर्च करावे लागत आहेत. ज्या शेतकºयांचे बैल मरण पावले. अशा शेतकºयांना वेळेवर २५ ते ३० हजार रूपये खर्चून बैल खरेदी करावे लागणार आहेत. अन्यथा शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस पडत आहे. पावणे दोन महिन्यांच्या कालावधीत वार्षिक सरासरीच्या अर्धा पाऊस पडला आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आणखी घर कोसळण्याच्या, वीज पडण्याच्या घटन घडून जीवित व वित्तहानी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.कोसरीत घर पडलेआरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोसरी येथील निरींगशहा जग्गू किरंगे यांचे मातीचे घर संततधार पावसामुळे रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कोसळले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरातील सर्व वस्तूंची नासाडी झाली.