शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

२७७ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:21 IST

पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा परिणाम : २६ जनावरांचा मृत्यू, नागरिक झाले बेघर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरत यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासून पावसाचा जोर सुरू आहे. अधूनमधून अतिवृष्टीही होत आहे. त्याचबरोबर धरणांचे पाणी सोडल्यानंतर नद्यांची पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण होते. याचा फटका नदी जवळच्या गावांना बसला. मागील २० दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे घरांची पडझड होण्याचे प्रमाण वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश घरे कौलारू व मातीचे आहेत. यातील काही घरे जुनी असल्याने त्यांचे छत गळते. सातत्याने पाऊस सुरू असल्याने मातीच्या भिंतींमध्ये ओलावा निर्माण होते व काही दिवसानंतर भिंत कोसळते. पावसाळ्यापासून २२ जुलैपर्यंत सुमारे २७७ घरांची पडझड झाली आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये सहा गोठे व तीन झोपड्यांचा समावेश आहे. महसूल विभागाने संबंधित घरांचे पंचनामे केले आहेत. ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने संबंधित कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी विजेचा धक्का, वीज पडणे यासारख्या घटनांमध्ये २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.अनेक शेतकºयांनी धान पिकाची रोवणी करण्यासाठी पैसे गोळा करून ठेवले. सदर पैसे घराच्या डागडुजीवर खर्च करावे लागत आहेत. ज्या शेतकºयांचे बैल मरण पावले. अशा शेतकºयांना वेळेवर २५ ते ३० हजार रूपये खर्चून बैल खरेदी करावे लागणार आहेत. अन्यथा शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस पडत आहे. पावणे दोन महिन्यांच्या कालावधीत वार्षिक सरासरीच्या अर्धा पाऊस पडला आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आणखी घर कोसळण्याच्या, वीज पडण्याच्या घटन घडून जीवित व वित्तहानी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.कोसरीत घर पडलेआरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोसरी येथील निरींगशहा जग्गू किरंगे यांचे मातीचे घर संततधार पावसामुळे रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कोसळले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरातील सर्व वस्तूंची नासाडी झाली.