शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२७७ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:21 IST

पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा परिणाम : २६ जनावरांचा मृत्यू, नागरिक झाले बेघर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरत यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासून पावसाचा जोर सुरू आहे. अधूनमधून अतिवृष्टीही होत आहे. त्याचबरोबर धरणांचे पाणी सोडल्यानंतर नद्यांची पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण होते. याचा फटका नदी जवळच्या गावांना बसला. मागील २० दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे घरांची पडझड होण्याचे प्रमाण वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश घरे कौलारू व मातीचे आहेत. यातील काही घरे जुनी असल्याने त्यांचे छत गळते. सातत्याने पाऊस सुरू असल्याने मातीच्या भिंतींमध्ये ओलावा निर्माण होते व काही दिवसानंतर भिंत कोसळते. पावसाळ्यापासून २२ जुलैपर्यंत सुमारे २७७ घरांची पडझड झाली आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये सहा गोठे व तीन झोपड्यांचा समावेश आहे. महसूल विभागाने संबंधित घरांचे पंचनामे केले आहेत. ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने संबंधित कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी विजेचा धक्का, वीज पडणे यासारख्या घटनांमध्ये २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.अनेक शेतकºयांनी धान पिकाची रोवणी करण्यासाठी पैसे गोळा करून ठेवले. सदर पैसे घराच्या डागडुजीवर खर्च करावे लागत आहेत. ज्या शेतकºयांचे बैल मरण पावले. अशा शेतकºयांना वेळेवर २५ ते ३० हजार रूपये खर्चून बैल खरेदी करावे लागणार आहेत. अन्यथा शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस पडत आहे. पावणे दोन महिन्यांच्या कालावधीत वार्षिक सरासरीच्या अर्धा पाऊस पडला आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आणखी घर कोसळण्याच्या, वीज पडण्याच्या घटन घडून जीवित व वित्तहानी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.कोसरीत घर पडलेआरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोसरी येथील निरींगशहा जग्गू किरंगे यांचे मातीचे घर संततधार पावसामुळे रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कोसळले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरातील सर्व वस्तूंची नासाडी झाली.