शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

जिल्ह्यात अतिवृष्टीने ६९ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:15 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली.

ठळक मुद्देपिकांचीही झाली हानी : १० नागरिकांचा गेला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली. अगदी सुरूवातीपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. अधूनमधून अतिवृष्टीसुध्दा होत आहे. अतिवृष्टीमुळे अनेकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सखल भागात वास्तव्यास असलेल्या गावांना या पुराचा फटका बसला आहे. यावर्षी विशेष करून दक्षिणेकडील अहेरी, भामरागड व मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यांना सर्वाधिक झळ सहन करावी त्यातही अहेरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे १० नागरिकांचा मृत्यू झाला. प्रत्येक व्यक्तीला शासनाकडून चार लाख रूपयांची मदत दिली जाते. ८२ लहान जनावरे मृत्यूमुखी पडले. यामुळे २ लाख ५८ हजारांची नुकसान झाले. मोठी १६५ जनावरे मृत्यूमुखी पडली. यामुळे २० लाख ७१ हजारांचे नुकसान झाले. १ हजार ८९ शेळ्या मरण पावल्या. १ हजार ५९३ घरांचे अंशत: नुकसान झाले. यामुळे ४० लाख रूपयांचे नुकसान झाले. तर ५५ घरे पूर्णपणे कोसळली आहेत. यामुळे ५ लाख २० हजारांचे नुकसान झाले. गुरांचे ६७ गोठे कोसळले. यामुळे ८१ हजार २०० रूपयांचे नुकसान झाले.पावसाळ्याच्या सुरूवातीपासून यावर्षी पाऊस कोसळत आहे. एक-दोन दिवसानंतर पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी आठ दिवस पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर आता गुरूवारपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पाऊस आणखी काही दिवस थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.संततधार पावसाने जनजीवन विकस्ळीतमागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस पडत आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे गडचिरोली शहरातील बाजारपेठ शुकशुकाट दिसून येत होता. शासकीय कार्यालयांमध्येही नागरिक येत नसल्याने कर्मचारी आपल्या मर्जीने खुर्च्या लाऊन बसल्याचे चित्र दिसून येत होते. यावर्षीच्या पावसाने धानपीक डोलत आहे. मात्र कापूस, सोयाबिन, तूर या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. या पिकांना पाण्याची कमी गरज राहते. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओलिचिंब आहे. परिणामी या पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सोयाबिन, कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस