शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अतिवृष्टीने ६९ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:15 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली.

ठळक मुद्देपिकांचीही झाली हानी : १० नागरिकांचा गेला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली. अगदी सुरूवातीपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. अधूनमधून अतिवृष्टीसुध्दा होत आहे. अतिवृष्टीमुळे अनेकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सखल भागात वास्तव्यास असलेल्या गावांना या पुराचा फटका बसला आहे. यावर्षी विशेष करून दक्षिणेकडील अहेरी, भामरागड व मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यांना सर्वाधिक झळ सहन करावी त्यातही अहेरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे १० नागरिकांचा मृत्यू झाला. प्रत्येक व्यक्तीला शासनाकडून चार लाख रूपयांची मदत दिली जाते. ८२ लहान जनावरे मृत्यूमुखी पडले. यामुळे २ लाख ५८ हजारांची नुकसान झाले. मोठी १६५ जनावरे मृत्यूमुखी पडली. यामुळे २० लाख ७१ हजारांचे नुकसान झाले. १ हजार ८९ शेळ्या मरण पावल्या. १ हजार ५९३ घरांचे अंशत: नुकसान झाले. यामुळे ४० लाख रूपयांचे नुकसान झाले. तर ५५ घरे पूर्णपणे कोसळली आहेत. यामुळे ५ लाख २० हजारांचे नुकसान झाले. गुरांचे ६७ गोठे कोसळले. यामुळे ८१ हजार २०० रूपयांचे नुकसान झाले.पावसाळ्याच्या सुरूवातीपासून यावर्षी पाऊस कोसळत आहे. एक-दोन दिवसानंतर पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी आठ दिवस पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर आता गुरूवारपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पाऊस आणखी काही दिवस थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.संततधार पावसाने जनजीवन विकस्ळीतमागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस पडत आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे गडचिरोली शहरातील बाजारपेठ शुकशुकाट दिसून येत होता. शासकीय कार्यालयांमध्येही नागरिक येत नसल्याने कर्मचारी आपल्या मर्जीने खुर्च्या लाऊन बसल्याचे चित्र दिसून येत होते. यावर्षीच्या पावसाने धानपीक डोलत आहे. मात्र कापूस, सोयाबिन, तूर या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. या पिकांना पाण्याची कमी गरज राहते. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओलिचिंब आहे. परिणामी या पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सोयाबिन, कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस