शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

जिल्ह्यात अतिवृष्टीने ६९ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:15 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली.

ठळक मुद्देपिकांचीही झाली हानी : १० नागरिकांचा गेला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली. अगदी सुरूवातीपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. अधूनमधून अतिवृष्टीसुध्दा होत आहे. अतिवृष्टीमुळे अनेकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सखल भागात वास्तव्यास असलेल्या गावांना या पुराचा फटका बसला आहे. यावर्षी विशेष करून दक्षिणेकडील अहेरी, भामरागड व मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यांना सर्वाधिक झळ सहन करावी त्यातही अहेरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे १० नागरिकांचा मृत्यू झाला. प्रत्येक व्यक्तीला शासनाकडून चार लाख रूपयांची मदत दिली जाते. ८२ लहान जनावरे मृत्यूमुखी पडले. यामुळे २ लाख ५८ हजारांची नुकसान झाले. मोठी १६५ जनावरे मृत्यूमुखी पडली. यामुळे २० लाख ७१ हजारांचे नुकसान झाले. १ हजार ८९ शेळ्या मरण पावल्या. १ हजार ५९३ घरांचे अंशत: नुकसान झाले. यामुळे ४० लाख रूपयांचे नुकसान झाले. तर ५५ घरे पूर्णपणे कोसळली आहेत. यामुळे ५ लाख २० हजारांचे नुकसान झाले. गुरांचे ६७ गोठे कोसळले. यामुळे ८१ हजार २०० रूपयांचे नुकसान झाले.पावसाळ्याच्या सुरूवातीपासून यावर्षी पाऊस कोसळत आहे. एक-दोन दिवसानंतर पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी आठ दिवस पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर आता गुरूवारपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पाऊस आणखी काही दिवस थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.संततधार पावसाने जनजीवन विकस्ळीतमागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस पडत आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे गडचिरोली शहरातील बाजारपेठ शुकशुकाट दिसून येत होता. शासकीय कार्यालयांमध्येही नागरिक येत नसल्याने कर्मचारी आपल्या मर्जीने खुर्च्या लाऊन बसल्याचे चित्र दिसून येत होते. यावर्षीच्या पावसाने धानपीक डोलत आहे. मात्र कापूस, सोयाबिन, तूर या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. या पिकांना पाण्याची कमी गरज राहते. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओलिचिंब आहे. परिणामी या पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सोयाबिन, कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस