शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार आजी-आजोबा साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:42 IST

Gadchiroli : शिक्षण विभागामार्फत साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन केला जाणार गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नवभारत साक्षता अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार ७८७ निरक्षरांनी परीक्षा दिली होती. त्यात बहुतांश वयस्क नागरिकांचा समावेश होता. त्यातील २४ हजार ६४४ जण परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 

शिक्षण विभाग (योजना) अंतर्गत त्यांना लवकरच साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. निरक्षरता हा व्यक्तीच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा आहे. अशा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती जास्त शिकला नसला तरी किमान त्याला अक्षर ओळख असावी, यासाठी केंद्र शासनामार्फत प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे केंद्र शासनाने नवभारत साक्षर अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत सर्वप्रथम निरक्षर नागरिकांचा जिल्हा परिषद शिक्षकांमार्फत शोध घेण्यात आला. जिल्ह्यात ६१ हजार ९२८ नागरिक निरक्षर आढळून आले. गावातील काही व्यक्ती स्वयंसेवक म्हणून काम करीत या निरक्षर नागरिकांना शिकवले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली. ३३ हजार ७८७ नागरिकांनी परीक्षा दिली. त्यापैकी २४ हजार ६४४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ९ हजार १४३ परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांची सप्टेंबर महिन्यात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा देणाऱ्या काही नागरिकांनी तर वयाची ७५ वर्षे पार केले होते.

९ हजार १४३ जणांना सुधारणेची गरजपरीक्षा दिलेल्यांपैकी ९ हजार १४३ जणांनी आवश्यक तेवढे गुण मिळवू शकले नाही. त्यांना 'सुधारणेची गरज असा शेरा देण्यात आला आहे. त्यांना शिकवण्याचे काम अजूनही सुरूच आहे. त्यांची सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाणार आहे. यावेळेस उत्तीर्ण झाल्यास त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल.

शिकण्याला वयाचे बंधन नसतेचव्यक्ती लहान असल्यापासून तर मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासाठी केवळ संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. हीच बाब नवसाक्षरतेची परीक्षा देणाऱ्यांबाबत घडला आहे. हाताला लकवा मारला असतानाही त्यांनी बाराखडी शिकली. एवढेच नाही, तर परीक्षा उत्तीर्ण केली. म्हणजेच शिकण्याला वयाचे बंधन नाही हे सिद्ध करून दाखवले आहे.

जे नागरिक उत्तीर्ण झाले त्यांना शासनाच्या आदेशानुसार साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल. जे नागरिकांना सुधारणेची गरजआहे, असा शेरा दिला आहे. त्यांची सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाईल. सर्वेक्षणात निरक्षर आढळलेल्यांपेकी ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांना पुन्हा शिकवून त्यांना परीक्षा देण्यास प्रोत्साहित केले जाईल.- वैभव बारेकर, शिक्षणाधिकारी (योजना) 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रGadchiroliगडचिरोली