शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

२५ हजार आजी-आजोबा साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:42 IST

Gadchiroli : शिक्षण विभागामार्फत साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन केला जाणार गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नवभारत साक्षता अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार ७८७ निरक्षरांनी परीक्षा दिली होती. त्यात बहुतांश वयस्क नागरिकांचा समावेश होता. त्यातील २४ हजार ६४४ जण परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 

शिक्षण विभाग (योजना) अंतर्गत त्यांना लवकरच साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. निरक्षरता हा व्यक्तीच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा आहे. अशा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती जास्त शिकला नसला तरी किमान त्याला अक्षर ओळख असावी, यासाठी केंद्र शासनामार्फत प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे केंद्र शासनाने नवभारत साक्षर अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत सर्वप्रथम निरक्षर नागरिकांचा जिल्हा परिषद शिक्षकांमार्फत शोध घेण्यात आला. जिल्ह्यात ६१ हजार ९२८ नागरिक निरक्षर आढळून आले. गावातील काही व्यक्ती स्वयंसेवक म्हणून काम करीत या निरक्षर नागरिकांना शिकवले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली. ३३ हजार ७८७ नागरिकांनी परीक्षा दिली. त्यापैकी २४ हजार ६४४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ९ हजार १४३ परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांची सप्टेंबर महिन्यात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा देणाऱ्या काही नागरिकांनी तर वयाची ७५ वर्षे पार केले होते.

९ हजार १४३ जणांना सुधारणेची गरजपरीक्षा दिलेल्यांपैकी ९ हजार १४३ जणांनी आवश्यक तेवढे गुण मिळवू शकले नाही. त्यांना 'सुधारणेची गरज असा शेरा देण्यात आला आहे. त्यांना शिकवण्याचे काम अजूनही सुरूच आहे. त्यांची सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाणार आहे. यावेळेस उत्तीर्ण झाल्यास त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल.

शिकण्याला वयाचे बंधन नसतेचव्यक्ती लहान असल्यापासून तर मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासाठी केवळ संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. हीच बाब नवसाक्षरतेची परीक्षा देणाऱ्यांबाबत घडला आहे. हाताला लकवा मारला असतानाही त्यांनी बाराखडी शिकली. एवढेच नाही, तर परीक्षा उत्तीर्ण केली. म्हणजेच शिकण्याला वयाचे बंधन नाही हे सिद्ध करून दाखवले आहे.

जे नागरिक उत्तीर्ण झाले त्यांना शासनाच्या आदेशानुसार साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल. जे नागरिकांना सुधारणेची गरजआहे, असा शेरा दिला आहे. त्यांची सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाईल. सर्वेक्षणात निरक्षर आढळलेल्यांपेकी ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांना पुन्हा शिकवून त्यांना परीक्षा देण्यास प्रोत्साहित केले जाईल.- वैभव बारेकर, शिक्षणाधिकारी (योजना) 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रGadchiroliगडचिरोली