शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

ट्रॅक्टर उलटल्याने २५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धावत्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिकच्या गिअरवर पाय बसल्याने ट्रॉली उलटून २५ जण जखमी झाल्याची घटना रांगीपासून १ किमी अंतरावर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.रांगी येथील श्यामराव ताडाम यांच्या घरी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील गहानगट्टा येथील नागरिक आले होते. रांगीपासून १ किमी ...

ठळक मुद्देरांगीजवळ अपघात : हायड्रॉलिकच्या गीअरवर पडला पाय

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धावत्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिकच्या गिअरवर पाय बसल्याने ट्रॉली उलटून २५ जण जखमी झाल्याची घटना रांगीपासून १ किमी अंतरावर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.रांगी येथील श्यामराव ताडाम यांच्या घरी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील गहानगट्टा येथील नागरिक आले होते. रांगीपासून १ किमी अंतर असताना ट्रॅक्टरवर बसलेल्या एका व्यक्तीचा पाय नकळत हायड्रॉलिकच्या गिअरवर पडला. त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली धावत असतानाच वर उचलल्या गेली. त्यामुळे काही नागरिक ट्रॅक्टर धावत असतानाच ट्रॉलीमधून खाली पडले. ट्रॅक्टरमध्ये ३५ पेक्षा अधिक नागरिक बसले होते. त्यापैकी २५ जण जखमी झाले. जखमींमध्ये विजया हलामी (३५), गिरजा कुमोटी (४०), शारदा हलामी (३२), लालसू हलामी (४०), रामसू हलामी (४५), मुंगीबाई दुग्गा (५०), सुमित्रा (१२), रसिका नैताम (३०), मनीबाई दुग्गा (४०), सीता नैताम (३५), सुगन हलामी (४२), अजित हलामी (१५), रखमा धुर्वे (४०), मिनकोबाई कल्लो (४७), लालसू हलामी (५०) सर्व रा. रामनगट्टा अशी गंभीर जखमी झालेल्या नागरिकांची नावे आहेत.रांगी येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना मिळेल त्या वाहनाने रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. त्यानंतर गडचिरोली येथून तीन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले.तब्बल एका तासानंतर पोहोचले रांगीचे डॉक्टररांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र अपघात घडला त्यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नव्हता. हातपाय तुटलेले रुग्ण असह्य वेदनांनी तडफडत होते. गावातील नागरिकांनी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून बोलविले. त्यावेळी एका तासानंतर डॉ. सयाम हे दवाखान्यात आले. याचा अर्थ ते मुख्यालयी नव्हते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रांगी येथील नागरिकांनी केली आहे.रांगी येथील दवाखान्यात पिण्यासाठी पाणी नव्हते. पंखे बंद होते. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. दवाखान्याची अशी स्थिती असतानाही या रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार या दवाखान्याला मिळाला कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात