शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर उलटल्याने २५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धावत्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिकच्या गिअरवर पाय बसल्याने ट्रॉली उलटून २५ जण जखमी झाल्याची घटना रांगीपासून १ किमी अंतरावर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.रांगी येथील श्यामराव ताडाम यांच्या घरी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील गहानगट्टा येथील नागरिक आले होते. रांगीपासून १ किमी ...

ठळक मुद्देरांगीजवळ अपघात : हायड्रॉलिकच्या गीअरवर पडला पाय

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धावत्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिकच्या गिअरवर पाय बसल्याने ट्रॉली उलटून २५ जण जखमी झाल्याची घटना रांगीपासून १ किमी अंतरावर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.रांगी येथील श्यामराव ताडाम यांच्या घरी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील गहानगट्टा येथील नागरिक आले होते. रांगीपासून १ किमी अंतर असताना ट्रॅक्टरवर बसलेल्या एका व्यक्तीचा पाय नकळत हायड्रॉलिकच्या गिअरवर पडला. त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली धावत असतानाच वर उचलल्या गेली. त्यामुळे काही नागरिक ट्रॅक्टर धावत असतानाच ट्रॉलीमधून खाली पडले. ट्रॅक्टरमध्ये ३५ पेक्षा अधिक नागरिक बसले होते. त्यापैकी २५ जण जखमी झाले. जखमींमध्ये विजया हलामी (३५), गिरजा कुमोटी (४०), शारदा हलामी (३२), लालसू हलामी (४०), रामसू हलामी (४५), मुंगीबाई दुग्गा (५०), सुमित्रा (१२), रसिका नैताम (३०), मनीबाई दुग्गा (४०), सीता नैताम (३५), सुगन हलामी (४२), अजित हलामी (१५), रखमा धुर्वे (४०), मिनकोबाई कल्लो (४७), लालसू हलामी (५०) सर्व रा. रामनगट्टा अशी गंभीर जखमी झालेल्या नागरिकांची नावे आहेत.रांगी येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना मिळेल त्या वाहनाने रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. त्यानंतर गडचिरोली येथून तीन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले.तब्बल एका तासानंतर पोहोचले रांगीचे डॉक्टररांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र अपघात घडला त्यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नव्हता. हातपाय तुटलेले रुग्ण असह्य वेदनांनी तडफडत होते. गावातील नागरिकांनी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून बोलविले. त्यावेळी एका तासानंतर डॉ. सयाम हे दवाखान्यात आले. याचा अर्थ ते मुख्यालयी नव्हते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रांगी येथील नागरिकांनी केली आहे.रांगी येथील दवाखान्यात पिण्यासाठी पाणी नव्हते. पंखे बंद होते. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. दवाखान्याची अशी स्थिती असतानाही या रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार या दवाखान्याला मिळाला कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात