शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

ट्रॅक्टर उलटल्याने २५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धावत्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिकच्या गिअरवर पाय बसल्याने ट्रॉली उलटून २५ जण जखमी झाल्याची घटना रांगीपासून १ किमी अंतरावर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.रांगी येथील श्यामराव ताडाम यांच्या घरी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील गहानगट्टा येथील नागरिक आले होते. रांगीपासून १ किमी ...

ठळक मुद्देरांगीजवळ अपघात : हायड्रॉलिकच्या गीअरवर पडला पाय

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धावत्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिकच्या गिअरवर पाय बसल्याने ट्रॉली उलटून २५ जण जखमी झाल्याची घटना रांगीपासून १ किमी अंतरावर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.रांगी येथील श्यामराव ताडाम यांच्या घरी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील गहानगट्टा येथील नागरिक आले होते. रांगीपासून १ किमी अंतर असताना ट्रॅक्टरवर बसलेल्या एका व्यक्तीचा पाय नकळत हायड्रॉलिकच्या गिअरवर पडला. त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली धावत असतानाच वर उचलल्या गेली. त्यामुळे काही नागरिक ट्रॅक्टर धावत असतानाच ट्रॉलीमधून खाली पडले. ट्रॅक्टरमध्ये ३५ पेक्षा अधिक नागरिक बसले होते. त्यापैकी २५ जण जखमी झाले. जखमींमध्ये विजया हलामी (३५), गिरजा कुमोटी (४०), शारदा हलामी (३२), लालसू हलामी (४०), रामसू हलामी (४५), मुंगीबाई दुग्गा (५०), सुमित्रा (१२), रसिका नैताम (३०), मनीबाई दुग्गा (४०), सीता नैताम (३५), सुगन हलामी (४२), अजित हलामी (१५), रखमा धुर्वे (४०), मिनकोबाई कल्लो (४७), लालसू हलामी (५०) सर्व रा. रामनगट्टा अशी गंभीर जखमी झालेल्या नागरिकांची नावे आहेत.रांगी येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना मिळेल त्या वाहनाने रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. त्यानंतर गडचिरोली येथून तीन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले.तब्बल एका तासानंतर पोहोचले रांगीचे डॉक्टररांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र अपघात घडला त्यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नव्हता. हातपाय तुटलेले रुग्ण असह्य वेदनांनी तडफडत होते. गावातील नागरिकांनी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून बोलविले. त्यावेळी एका तासानंतर डॉ. सयाम हे दवाखान्यात आले. याचा अर्थ ते मुख्यालयी नव्हते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रांगी येथील नागरिकांनी केली आहे.रांगी येथील दवाखान्यात पिण्यासाठी पाणी नव्हते. पंखे बंद होते. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. दवाखान्याची अशी स्थिती असतानाही या रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार या दवाखान्याला मिळाला कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात