शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांमुळे एसटीचे 25 % शेड्युल्ड रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 22:46 IST

गडचिराेली-आलापल्ली-सिराेंचा हा जिल्ह्यातील मुख्य मार्ग आहे. आष्टी ते सिराेंचा या मार्गाला शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. मागील वर्षीही या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले हाेते. मात्र, दुरूस्ती झाली नाही. दरवर्षी खड्ड्यांचा आकार वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे. या मार्गांवरून वाहन नेणे कठीण झाले आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील रस्त्यांची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एका खड्ड्यातून वाहन निघताच दुसऱ्या खड्ड्यात पडत आहे. त्यामुळे एसटीची गती मंदावली आहे. तसेच २५ टक्के शेड्युल्ड बंद झाले आहेत. केवळ मानव विकास मिशनच्या बसेस चालविण्यावर जाेर दिला जात आहे. गडचिराेली-आलापल्ली-सिराेंचा हा जिल्ह्यातील मुख्य मार्ग आहे. आष्टी ते सिराेंचा या मार्गाला शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. मागील वर्षीही या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले हाेते. मात्र, दुरूस्ती झाली नाही. दरवर्षी खड्ड्यांचा आकार वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे. या मार्गांवरून वाहन नेणे कठीण झाले आहे. एसटी हे प्रवासी वाहन आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी सांभाळत एसटी बसेस चालवाव्या लागत आहेत. मात्र, नाईलाजास्तव काही शेड्युल्ड व फेऱ्या रद्द कराव्या लागत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी केवळ मानव विकास मिशनच्या बसेस किंवा त्या मार्गावरील फेऱ्या चालविल्या जात आहेत. 

दुसऱ्या विभागाच्या बसेस येतच नाहीत-   पूर्वी अहेरी आगारात नागपूर, सावनेर, वर्धा या आगारांच्या बसेस येत हाेत्या. रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने संबंधित आगारांनी अहेरीला बसेस पाठविणेच बंद केले आहे. 

-   अहेरी आगारामार्फत नागपूर, वर्धा या लांब पल्ल्याच्या बसेस चालविल्या जात हाेत्या. मात्र, या बसेस रात्री उशिरा पाेहाेचत असल्याने प्रवासी मिळत नाहीत. परिणामी लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून केवळ चंद्रपूरपर्यंत बसेस चालविल्या जात आहेत. 

सिराेंचा मार्गावर २५ टक्केच फेऱ्या अहेरी ते  सिराेंचा या मार्गाचीही माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर केवळ २५ टक्केच बसेस चालविल्या जात आहेत. त्यातही केवळ विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठीच प्राधान्य दिले जात आहे.

कमाईपेक्षा ताेटाच अधिक-    रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने एसटीचे स्प्रिंग, खिडक्या, दरवाजे, पत्रे तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. स्टेअरिंग जाम हाेत आहेत.-    सायंकाळी बस आगारात आल्यानंतर तिला दुरूस्त केल्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यावर अतिरिक्त खर्च हाेत आहे. -    अतिशय कमी वेगाने बस चालविली जात असल्याने डिझेलचा खर्चसुद्धा वाढला आहे. 

बसला उशीर हाेण्यास चालक जबाबदार असताे का?मानव विकास मिशनच्या बसेस वेळेवर पाेहाेचत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाेहाेचण्यास उशीर हाेते. तर शाळा सुटल्यावर बस येण्यास उशीर हाेत असल्याने बसस्थानकावरच अंधार पडत आहे. यासाठी बस चालकाला किंवा एसटी प्रशासानाला जबाबदार धरले जात आहे. विद्यार्थी आंदाेलनही करीत आहेत. मात्र, यासाठी चालकच जबाबदार आहे काय हा प्रश्न आहे. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे एका तासात जेवढे अंतर पूर्वी बस कापत हाेती तेवढे अंतर कापण्यासाठी आता दीड तासाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे बसला उशीर हाेत आहे. 

 

टॅग्स :state transportएसटीroad safetyरस्ते सुरक्षा