शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

रस्त्यांमुळे एसटीचे 25 % शेड्युल्ड रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 22:46 IST

गडचिराेली-आलापल्ली-सिराेंचा हा जिल्ह्यातील मुख्य मार्ग आहे. आष्टी ते सिराेंचा या मार्गाला शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. मागील वर्षीही या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले हाेते. मात्र, दुरूस्ती झाली नाही. दरवर्षी खड्ड्यांचा आकार वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे. या मार्गांवरून वाहन नेणे कठीण झाले आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील रस्त्यांची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एका खड्ड्यातून वाहन निघताच दुसऱ्या खड्ड्यात पडत आहे. त्यामुळे एसटीची गती मंदावली आहे. तसेच २५ टक्के शेड्युल्ड बंद झाले आहेत. केवळ मानव विकास मिशनच्या बसेस चालविण्यावर जाेर दिला जात आहे. गडचिराेली-आलापल्ली-सिराेंचा हा जिल्ह्यातील मुख्य मार्ग आहे. आष्टी ते सिराेंचा या मार्गाला शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. मागील वर्षीही या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले हाेते. मात्र, दुरूस्ती झाली नाही. दरवर्षी खड्ड्यांचा आकार वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे. या मार्गांवरून वाहन नेणे कठीण झाले आहे. एसटी हे प्रवासी वाहन आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी सांभाळत एसटी बसेस चालवाव्या लागत आहेत. मात्र, नाईलाजास्तव काही शेड्युल्ड व फेऱ्या रद्द कराव्या लागत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी केवळ मानव विकास मिशनच्या बसेस किंवा त्या मार्गावरील फेऱ्या चालविल्या जात आहेत. 

दुसऱ्या विभागाच्या बसेस येतच नाहीत-   पूर्वी अहेरी आगारात नागपूर, सावनेर, वर्धा या आगारांच्या बसेस येत हाेत्या. रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने संबंधित आगारांनी अहेरीला बसेस पाठविणेच बंद केले आहे. 

-   अहेरी आगारामार्फत नागपूर, वर्धा या लांब पल्ल्याच्या बसेस चालविल्या जात हाेत्या. मात्र, या बसेस रात्री उशिरा पाेहाेचत असल्याने प्रवासी मिळत नाहीत. परिणामी लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून केवळ चंद्रपूरपर्यंत बसेस चालविल्या जात आहेत. 

सिराेंचा मार्गावर २५ टक्केच फेऱ्या अहेरी ते  सिराेंचा या मार्गाचीही माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर केवळ २५ टक्केच बसेस चालविल्या जात आहेत. त्यातही केवळ विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठीच प्राधान्य दिले जात आहे.

कमाईपेक्षा ताेटाच अधिक-    रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने एसटीचे स्प्रिंग, खिडक्या, दरवाजे, पत्रे तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. स्टेअरिंग जाम हाेत आहेत.-    सायंकाळी बस आगारात आल्यानंतर तिला दुरूस्त केल्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यावर अतिरिक्त खर्च हाेत आहे. -    अतिशय कमी वेगाने बस चालविली जात असल्याने डिझेलचा खर्चसुद्धा वाढला आहे. 

बसला उशीर हाेण्यास चालक जबाबदार असताे का?मानव विकास मिशनच्या बसेस वेळेवर पाेहाेचत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाेहाेचण्यास उशीर हाेते. तर शाळा सुटल्यावर बस येण्यास उशीर हाेत असल्याने बसस्थानकावरच अंधार पडत आहे. यासाठी बस चालकाला किंवा एसटी प्रशासानाला जबाबदार धरले जात आहे. विद्यार्थी आंदाेलनही करीत आहेत. मात्र, यासाठी चालकच जबाबदार आहे काय हा प्रश्न आहे. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे एका तासात जेवढे अंतर पूर्वी बस कापत हाेती तेवढे अंतर कापण्यासाठी आता दीड तासाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे बसला उशीर हाेत आहे. 

 

टॅग्स :state transportएसटीroad safetyरस्ते सुरक्षा