शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

रस्त्यांमुळे एसटीचे 25 % शेड्युल्ड रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 22:46 IST

गडचिराेली-आलापल्ली-सिराेंचा हा जिल्ह्यातील मुख्य मार्ग आहे. आष्टी ते सिराेंचा या मार्गाला शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. मागील वर्षीही या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले हाेते. मात्र, दुरूस्ती झाली नाही. दरवर्षी खड्ड्यांचा आकार वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे. या मार्गांवरून वाहन नेणे कठीण झाले आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील रस्त्यांची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एका खड्ड्यातून वाहन निघताच दुसऱ्या खड्ड्यात पडत आहे. त्यामुळे एसटीची गती मंदावली आहे. तसेच २५ टक्के शेड्युल्ड बंद झाले आहेत. केवळ मानव विकास मिशनच्या बसेस चालविण्यावर जाेर दिला जात आहे. गडचिराेली-आलापल्ली-सिराेंचा हा जिल्ह्यातील मुख्य मार्ग आहे. आष्टी ते सिराेंचा या मार्गाला शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. मागील वर्षीही या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले हाेते. मात्र, दुरूस्ती झाली नाही. दरवर्षी खड्ड्यांचा आकार वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे. या मार्गांवरून वाहन नेणे कठीण झाले आहे. एसटी हे प्रवासी वाहन आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी सांभाळत एसटी बसेस चालवाव्या लागत आहेत. मात्र, नाईलाजास्तव काही शेड्युल्ड व फेऱ्या रद्द कराव्या लागत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी केवळ मानव विकास मिशनच्या बसेस किंवा त्या मार्गावरील फेऱ्या चालविल्या जात आहेत. 

दुसऱ्या विभागाच्या बसेस येतच नाहीत-   पूर्वी अहेरी आगारात नागपूर, सावनेर, वर्धा या आगारांच्या बसेस येत हाेत्या. रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने संबंधित आगारांनी अहेरीला बसेस पाठविणेच बंद केले आहे. 

-   अहेरी आगारामार्फत नागपूर, वर्धा या लांब पल्ल्याच्या बसेस चालविल्या जात हाेत्या. मात्र, या बसेस रात्री उशिरा पाेहाेचत असल्याने प्रवासी मिळत नाहीत. परिणामी लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून केवळ चंद्रपूरपर्यंत बसेस चालविल्या जात आहेत. 

सिराेंचा मार्गावर २५ टक्केच फेऱ्या अहेरी ते  सिराेंचा या मार्गाचीही माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर केवळ २५ टक्केच बसेस चालविल्या जात आहेत. त्यातही केवळ विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठीच प्राधान्य दिले जात आहे.

कमाईपेक्षा ताेटाच अधिक-    रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने एसटीचे स्प्रिंग, खिडक्या, दरवाजे, पत्रे तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. स्टेअरिंग जाम हाेत आहेत.-    सायंकाळी बस आगारात आल्यानंतर तिला दुरूस्त केल्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यावर अतिरिक्त खर्च हाेत आहे. -    अतिशय कमी वेगाने बस चालविली जात असल्याने डिझेलचा खर्चसुद्धा वाढला आहे. 

बसला उशीर हाेण्यास चालक जबाबदार असताे का?मानव विकास मिशनच्या बसेस वेळेवर पाेहाेचत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाेहाेचण्यास उशीर हाेते. तर शाळा सुटल्यावर बस येण्यास उशीर हाेत असल्याने बसस्थानकावरच अंधार पडत आहे. यासाठी बस चालकाला किंवा एसटी प्रशासानाला जबाबदार धरले जात आहे. विद्यार्थी आंदाेलनही करीत आहेत. मात्र, यासाठी चालकच जबाबदार आहे काय हा प्रश्न आहे. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे एका तासात जेवढे अंतर पूर्वी बस कापत हाेती तेवढे अंतर कापण्यासाठी आता दीड तासाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे बसला उशीर हाेत आहे. 

 

टॅग्स :state transportएसटीroad safetyरस्ते सुरक्षा