शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

पाणलोट विकासाचे २.३१ कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:32 IST

सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.

ठळक मुद्देकेवळ ४२ लाख रूपये खर्च : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपये झाले होते मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. धान शेतीला अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत जलसिंचनाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून बोडी नुतनीकरण, नाला बांधकाम, वळण बंधारा आदी कामे करायची होती. त्यापैकी वर्षभरात १८ कामे हाती घेऊन त्यावर ४१ लाख ९१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया उशीरा झाल्याने ही कामे होऊ शकली नाही. परिणामी एकूण प्राप्त निधीपैकी २ कोटी ३१ लाख ६७ हजार रूपयांचा निधी शिल्लक राहिला आहे. शिल्लक राहिलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडे समर्पीत करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे संरक्षीत जंगल असल्याने मोठा सिंचन प्रकल्प बांधणे आता शक्य सुध्दा नाही. त्यामुळे लहान प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. मात्र निधीअभावी सिंचनाची कामे रखडली असल्याचे दिसून येते. मात्र दुसरीकडे गतिमान पाणलोट विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला असताना त्यापैकी सुमारे २ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी खर्च झाला नाही. परिणामी सदर निधी समर्पीत करावा लागला. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक कामेपाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली तालुक्यासाठी १९.५२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. वर्षाअखेर सर्वच निधी खर्च झाला आहे. धानोरा तालुक्यासाठी १९.९२ लाख रूपये मंजूर होते. त्यापैकी १७ लाख ४९ हजार रूपये खर्च झाले आहेत. आरमोरी तालुक्यात १४.९७ लाखापैकी दोन लाख रूपये, कुरखेडा तालुक्यात १६.९२ लाखांपैकी २ लाख ९० हजार रूपये खर्च झाले आहेत. कोरची तालुक्यासाठी २६ लाख ३४ हजार, अहेरी तालुक्यासाठी ६० लाख ५५ हजार, एटापल्ली ३६ लाख ६४ हजार, भामरागड ५७.६१ लाख, सिरोंचा २१.११ लाख रूपयांचा निधी मंजूर होत. मात्र यापैकी एकही निधी खर्च झाला नाही. 

टॅग्स :Waterपाणी