शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पाणलोट विकासाचे २.३१ कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:32 IST

सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.

ठळक मुद्देकेवळ ४२ लाख रूपये खर्च : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपये झाले होते मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. धान शेतीला अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत जलसिंचनाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून बोडी नुतनीकरण, नाला बांधकाम, वळण बंधारा आदी कामे करायची होती. त्यापैकी वर्षभरात १८ कामे हाती घेऊन त्यावर ४१ लाख ९१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया उशीरा झाल्याने ही कामे होऊ शकली नाही. परिणामी एकूण प्राप्त निधीपैकी २ कोटी ३१ लाख ६७ हजार रूपयांचा निधी शिल्लक राहिला आहे. शिल्लक राहिलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडे समर्पीत करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे संरक्षीत जंगल असल्याने मोठा सिंचन प्रकल्प बांधणे आता शक्य सुध्दा नाही. त्यामुळे लहान प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. मात्र निधीअभावी सिंचनाची कामे रखडली असल्याचे दिसून येते. मात्र दुसरीकडे गतिमान पाणलोट विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला असताना त्यापैकी सुमारे २ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी खर्च झाला नाही. परिणामी सदर निधी समर्पीत करावा लागला. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक कामेपाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली तालुक्यासाठी १९.५२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. वर्षाअखेर सर्वच निधी खर्च झाला आहे. धानोरा तालुक्यासाठी १९.९२ लाख रूपये मंजूर होते. त्यापैकी १७ लाख ४९ हजार रूपये खर्च झाले आहेत. आरमोरी तालुक्यात १४.९७ लाखापैकी दोन लाख रूपये, कुरखेडा तालुक्यात १६.९२ लाखांपैकी २ लाख ९० हजार रूपये खर्च झाले आहेत. कोरची तालुक्यासाठी २६ लाख ३४ हजार, अहेरी तालुक्यासाठी ६० लाख ५५ हजार, एटापल्ली ३६ लाख ६४ हजार, भामरागड ५७.६१ लाख, सिरोंचा २१.११ लाख रूपयांचा निधी मंजूर होत. मात्र यापैकी एकही निधी खर्च झाला नाही. 

टॅग्स :Waterपाणी