शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पाणलोट विकासाचे २.३१ कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:32 IST

सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.

ठळक मुद्देकेवळ ४२ लाख रूपये खर्च : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपये झाले होते मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. धान शेतीला अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत जलसिंचनाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून बोडी नुतनीकरण, नाला बांधकाम, वळण बंधारा आदी कामे करायची होती. त्यापैकी वर्षभरात १८ कामे हाती घेऊन त्यावर ४१ लाख ९१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया उशीरा झाल्याने ही कामे होऊ शकली नाही. परिणामी एकूण प्राप्त निधीपैकी २ कोटी ३१ लाख ६७ हजार रूपयांचा निधी शिल्लक राहिला आहे. शिल्लक राहिलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडे समर्पीत करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे संरक्षीत जंगल असल्याने मोठा सिंचन प्रकल्प बांधणे आता शक्य सुध्दा नाही. त्यामुळे लहान प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. मात्र निधीअभावी सिंचनाची कामे रखडली असल्याचे दिसून येते. मात्र दुसरीकडे गतिमान पाणलोट विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला असताना त्यापैकी सुमारे २ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी खर्च झाला नाही. परिणामी सदर निधी समर्पीत करावा लागला. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक कामेपाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली तालुक्यासाठी १९.५२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. वर्षाअखेर सर्वच निधी खर्च झाला आहे. धानोरा तालुक्यासाठी १९.९२ लाख रूपये मंजूर होते. त्यापैकी १७ लाख ४९ हजार रूपये खर्च झाले आहेत. आरमोरी तालुक्यात १४.९७ लाखापैकी दोन लाख रूपये, कुरखेडा तालुक्यात १६.९२ लाखांपैकी २ लाख ९० हजार रूपये खर्च झाले आहेत. कोरची तालुक्यासाठी २६ लाख ३४ हजार, अहेरी तालुक्यासाठी ६० लाख ५५ हजार, एटापल्ली ३६ लाख ६४ हजार, भामरागड ५७.६१ लाख, सिरोंचा २१.११ लाख रूपयांचा निधी मंजूर होत. मात्र यापैकी एकही निधी खर्च झाला नाही. 

टॅग्स :Waterपाणी