शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

पाणलोट विकासाचे २.३१ कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:32 IST

सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.

ठळक मुद्देकेवळ ४२ लाख रूपये खर्च : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपये झाले होते मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. धान शेतीला अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत जलसिंचनाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून बोडी नुतनीकरण, नाला बांधकाम, वळण बंधारा आदी कामे करायची होती. त्यापैकी वर्षभरात १८ कामे हाती घेऊन त्यावर ४१ लाख ९१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया उशीरा झाल्याने ही कामे होऊ शकली नाही. परिणामी एकूण प्राप्त निधीपैकी २ कोटी ३१ लाख ६७ हजार रूपयांचा निधी शिल्लक राहिला आहे. शिल्लक राहिलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडे समर्पीत करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे संरक्षीत जंगल असल्याने मोठा सिंचन प्रकल्प बांधणे आता शक्य सुध्दा नाही. त्यामुळे लहान प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. मात्र निधीअभावी सिंचनाची कामे रखडली असल्याचे दिसून येते. मात्र दुसरीकडे गतिमान पाणलोट विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला असताना त्यापैकी सुमारे २ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी खर्च झाला नाही. परिणामी सदर निधी समर्पीत करावा लागला. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक कामेपाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली तालुक्यासाठी १९.५२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. वर्षाअखेर सर्वच निधी खर्च झाला आहे. धानोरा तालुक्यासाठी १९.९२ लाख रूपये मंजूर होते. त्यापैकी १७ लाख ४९ हजार रूपये खर्च झाले आहेत. आरमोरी तालुक्यात १४.९७ लाखापैकी दोन लाख रूपये, कुरखेडा तालुक्यात १६.९२ लाखांपैकी २ लाख ९० हजार रूपये खर्च झाले आहेत. कोरची तालुक्यासाठी २६ लाख ३४ हजार, अहेरी तालुक्यासाठी ६० लाख ५५ हजार, एटापल्ली ३६ लाख ६४ हजार, भामरागड ५७.६१ लाख, सिरोंचा २१.११ लाख रूपयांचा निधी मंजूर होत. मात्र यापैकी एकही निधी खर्च झाला नाही. 

टॅग्स :Waterपाणी