लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : चंद्रपूर व गडचिराेली या दाेन जिल्ह्यासाठी असलेल्या गाेंडवाना विद्यापीठात संशाेधन करून आचार्य पदवी मिळविण्यासाठी ३२ विषयात संधी आहे. विद्यापीठ निर्मितीपासून तर गेल्या पाच वर्षात या विद्यापीठातून वेगवेगळ्या विषयात तब्बल २२८ प्रज्ञावंत संशाेधकांनी आचार्य पदवी मिळविली आहे. विशेष म्हणजे संशाेधनासाठी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयाला अधिक पसंती असल्याचे दिसून येते.
पीएचडीचा प्रबंध सादर करून पदवी मिळविण्यासाठी साधारणत: साडेचार ते पाच वर्षे लागतात. महिला व दिव्यांग उमेदवार २८० दिवसांची मुदत मागू शकतात. गाेंडवाना विद्यापीठ गडचिराेलीमधून विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतून गेल्या पाच वर्षात ९१ उमेदवारांनी आचार्य पदवी मिळविली आहे. मानव विद्या शाखेतून ६६, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून आतापर्यंत १८ जणांनी पीएचडी प्राप्त केली आहे. अंत:विषय अभ्यास शाखेतून ५३ जणांनी पीएचडी प्राप्त केली आहे. यामध्ये शिक्षण, शारीरिक शिक्षण, ग्रंथालय, विज्ञान व समाजकार्य आदी विषयांचा समावेश आहे. विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र विषयाला पीएचडीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.
बाॅक्स...
विषयानुसार असे झाले आचार्य
- विज्ञान शाखेत गेल्या पाच वर्षात ९१ जणांनी पीएचडी प्राप्त केली. यामध्ये गणित १५, रसायनशास्त्र १७, भाैतिकशास्त्र ८, कॅम्पुटर सायन्स ८, इलेक्ट्राॅनिक इंजिनिअरिंग १, प्राणीशास्त्र १६, पर्यावरण २, मायक्राेबायलाॅजी ८, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ३, बाॅटनी ९, मायनिंग इंजिनिअरिंगच्या ४ जणांचा समावेश आहे.
- मानव विद्या शाखेतील भूगाेल ६, राज्यशास्त्र ९, अर्थशास्त्र ८, समाजशास्त्र ६, मराठी १०, इंग्रजी १४, हिंदी २, विधी ४, मास कम्युनिकेशन १, इतिहास ४, पाॅली २ तसेच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील १८ तसेच अंत:विषय अभ्यास शाखेतील ५३ जणांनी पीएचडी प्राप्त केली आहे.
काेट...
गाेंडवाना विद्यापीठाकडे आपण रितसर नाेंदणी करून प्राणीशास्त्र विषयात पीएचडी मिळविण्यासाठी अभ्यास व संशाेधन सुरू आहे. विद्यापीठ व तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळाेवेळी लाभत असल्याने सध्या काेणतीही अडचण जाणवत नाही. जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जाेरावर आपण यशस्वीरित्या पीएचडी मिळवू.
- सचिन येनगंधलवार, प्राध्यापक
...............
गाेंडवाना विद्यापीठाकडे पीएचडीसीठी नाेंदणी केली असून संशाेधन सुरू आहे. राज्यशास्त्र विषयात हे काम सुरू असून गडचिराेली येथील तज्ज्ञ प्राध्यापक माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडून आपणाला वेळाेवेळी मार्गदर्शन मिळत आहे. शंकांचे निरसन हाेत आहे.
- बुलबुल वाळके, प्राध्यापक
.................
स्थानिकस्तरावर विद्यापीठ झाल्यामुळे पीएचडी करणे साेपे झाले आहे. नाेंदणी केल्यानंतर संशाेधन व अभ्यासाला सुरूवात केली जाते. तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून आवश्यक ते मार्गदर्शन घेऊन आपण सातत्याने त्या दिशेने प्रयत्न करीत आहे. अध्यापनासाेबतच संशाेधनाकडे आपले पूर्ण लक्ष आहे.
- लाेमेश बावनकुळे, प्राध्यापक