शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

२० हजार बॅग तेंदूपत्ता संकलन

By admin | Updated: May 23, 2015 01:54 IST

पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांमधून १६ हजार २७८ व पेसा क्षेत्राबाहेरच्या युनिटमधून ३ हजार ७३९ असे एकूण सुमारे २० हजार १७ बॅग तेंदूपत्ता संकलन १७ मे पर्यंत करण्यात आले आहे.

गडचिरोली : पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांमधून १६ हजार २७८ व पेसा क्षेत्राबाहेरच्या युनिटमधून ३ हजार ७३९ असे एकूण सुमारे २० हजार १७ बॅग तेंदूपत्ता संकलन १७ मे पर्यंत करण्यात आले आहे. राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र तेंदूपत्ता संकलन व त्याची विक्रीही अत्यंत किचकट बाब असून त्यासाठी लाखो रूपयांच्या भांडवलाची गरज असल्याने काही गावांनी वन विभागाचे सहकार्य घेतले आहे. या गावातील १३८ युनिटपैकी १२८ युनिटचा लिलाव झाला. १० युनिटची विक्रीच झाली नाही. या युनिटमधून २०१५ च्या हंगामात २ लाख ११ हजार ९४० बॅग तेंदूपत्ता संकलन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मागील १५ दिवसांपासून संकलनास सुरूवात झाली आहे. या युनिटमध्ये १७ मे पर्यंत १६ हजार २७८ बॅग तेंदूपत्ता संकलन करण्यात आला आहे. वन विभागाने ठरविलेल्या उद्दिष्टाच्या हे प्रमाण ७.६८ टक्के एवढे आहे. पेसा क्षेत्राबाहेर असलेल्या युनिटमध्ये पूर्वी प्रमाणेच वन विभाग स्वत: तेंदूपत्ता संकलन करीत आहे. पेसा क्षेत्राबाहेरचे एकूण ४३ युनिट विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ १० युनिटची विक्री झाली. या युनिटमधून १६ हजार ३९० बॅग तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट वन विभागाने ठेवले होते. त्यापैकी ३ हजार ७३९ बॅग तेंदूपत्ता संकलन झाले आहे. हे प्रमाण उद्दिष्टाच्या २२.८१ टक्के एवढे आहे. मागील आठवड्यापासून तेंदूपत्ता संकलनाला जोर आला असल्याने या आठवड्यात सर्वाधिक तेंदूपत्ता संकलन होण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून या आठवड्यात जवळपास ६० ते ७० टक्के उद्दिष्ट गाठता येणार आहे. (नगर प्रतिनिधी)प्रती शेकडा २३७ रूपये ५० पैसे दरशासनाने तेंदूपत्ता संकलनाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत १२ रूपये ५० पैसे एवढे वाढविले आहे. मागील वर्षी प्रती शेकडा २२५ रूपये भाव दिला जात होता. यावर्षी वाढ करून २३७ रूपये ५० पैसे एवढा भाव दिला जाणार आहे. हा शासकीय दर असला तरी जास्तीत जास्त प्रमाणात तेंदूपत्ता संकलन व्हावे यासाठी तेंदूपत्ता कंत्राटदार यापेक्षा जास्त दर देत आहेत.