शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

२०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २० गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. याबद्दल गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात शुक्रवारी ...

सरपंच व सचिवांचा सत्कार : गडचिरोलीत आत्मसन्मान कार्यशाळा; मान्यवरांनी केले मार्गदर्शनगडचिरोली : २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २० गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. याबद्दल गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात शुक्रवारी आयोजित आत्मसन्मान कार्यशाळेदरम्यान संबंधित ग्राम पंचायतीचे सरपंच, सचिव व संवर्ग विकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, परिक्षाविधीन आयएफएस अधिकारी टी. ब्युला एलिल मनी, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, पद्माकर मानकर, कारू रापंजी, सुनंदा आतला, सुखमा जांगधुर्वे, होमराज आलाम आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद गडचिरोली विभागाच्या वतीने जास्तीत गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याअंतर्गत जास्तीत जास्त शौचालय बांधकामासाठी निधी वितरित केला जात आहे. २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील लेखा, आरमोरी तालुक्यातील कोचबी, देऊळगाव, बोरीचक, वैरागड, मुलचेरा तालुक्यातील लगाम, देसाईगंज तालुक्यातील एकलपूर, पोटगाव, गडचिरोली तालुक्यातील मुडझा, काटली, अडपल्ली, गोगाव, सिरोंचा तालुक्यातील वडधम, कुरखेडा तालुक्यातील अंगारा, पलसगड, कोरची तालुक्यातील जांभळी, बेडगाव, बेतकाठी, सातपुती, अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द या २० ग्राम पंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यानिमित्त तेथील सरपंच, सचिव व बीडीओ यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील ३९ गावे हागणदारीमुक्त झाली होती. यावर्षीचे २० असे एकूण जिल्ह्यातील ५९ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. संचालन गडचिरोलीचे पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे तर आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणूसमारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सदानंद धुडसे, केवळ करकाडे, नितीन भोले, एकनाथ सेलोटे, प्रफुल मडावी, शैलेश धवट, नादीया शेख यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठीही प्रयत्नकेंद्र शासनाने निर्मल ग्राम पुरस्कार देणे यावर्षीपासून बंद केले आहे. त्यामुळे या गावांना आत्मसन्मान पुरस्कार देऊन जिल्हास्तरावर सन्मानित करण्यात येत आहे. जी गावे हागणदारीमुक्त झाली आहेत, अशा ५९ गावांमध्ये आता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे या गावात पूर्णपणे स्वच्छता राहण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण घातले गेल्यामुळे पर्यावरण संतुलीत राहण्यासही फारमोठी मदत होणार आहे.