शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

जिल्ह्यातील २० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

२०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २० गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. याबद्दल गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात शुक्रवारी ...

सरपंच व सचिवांचा सत्कार : गडचिरोलीत आत्मसन्मान कार्यशाळा; मान्यवरांनी केले मार्गदर्शनगडचिरोली : २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २० गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. याबद्दल गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात शुक्रवारी आयोजित आत्मसन्मान कार्यशाळेदरम्यान संबंधित ग्राम पंचायतीचे सरपंच, सचिव व संवर्ग विकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, परिक्षाविधीन आयएफएस अधिकारी टी. ब्युला एलिल मनी, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, पद्माकर मानकर, कारू रापंजी, सुनंदा आतला, सुखमा जांगधुर्वे, होमराज आलाम आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद गडचिरोली विभागाच्या वतीने जास्तीत गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याअंतर्गत जास्तीत जास्त शौचालय बांधकामासाठी निधी वितरित केला जात आहे. २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील लेखा, आरमोरी तालुक्यातील कोचबी, देऊळगाव, बोरीचक, वैरागड, मुलचेरा तालुक्यातील लगाम, देसाईगंज तालुक्यातील एकलपूर, पोटगाव, गडचिरोली तालुक्यातील मुडझा, काटली, अडपल्ली, गोगाव, सिरोंचा तालुक्यातील वडधम, कुरखेडा तालुक्यातील अंगारा, पलसगड, कोरची तालुक्यातील जांभळी, बेडगाव, बेतकाठी, सातपुती, अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द या २० ग्राम पंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यानिमित्त तेथील सरपंच, सचिव व बीडीओ यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील ३९ गावे हागणदारीमुक्त झाली होती. यावर्षीचे २० असे एकूण जिल्ह्यातील ५९ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. संचालन गडचिरोलीचे पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे तर आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणूसमारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सदानंद धुडसे, केवळ करकाडे, नितीन भोले, एकनाथ सेलोटे, प्रफुल मडावी, शैलेश धवट, नादीया शेख यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठीही प्रयत्नकेंद्र शासनाने निर्मल ग्राम पुरस्कार देणे यावर्षीपासून बंद केले आहे. त्यामुळे या गावांना आत्मसन्मान पुरस्कार देऊन जिल्हास्तरावर सन्मानित करण्यात येत आहे. जी गावे हागणदारीमुक्त झाली आहेत, अशा ५९ गावांमध्ये आता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे या गावात पूर्णपणे स्वच्छता राहण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण घातले गेल्यामुळे पर्यावरण संतुलीत राहण्यासही फारमोठी मदत होणार आहे.