शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तीन वर्षात १९ हजार हेक्टर जंगलाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८७ हजार ६०२ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. दुर्गम भागात मोहाची व तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन झाडांच्या भरवशावर दुर्गम भागातील नागरिकांना जवळपास चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. एकूण उत्पन्नात या दोन घटकांचा वाटा जवळपास निम्मा आहे. मार्च महिन्यापासून मोहफूल पडण्यास सुरूवात होतात.

ठळक मुद्देवनविभाग सतर्क : २०१९ मध्ये सर्वाधिक घटना, यावर्षीही फायरलाईनवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलांना आगी लागू नये यासाठी वनविभागामार्फत अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी उन्हाळ्यात आगी लागतातच. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत ४ हजार ७५० आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १८ हजार ६७२ हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी सापडले.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८७ हजार ६०२ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. दुर्गम भागात मोहाची व तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन झाडांच्या भरवशावर दुर्गम भागातील नागरिकांना जवळपास चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. एकूण उत्पन्नात या दोन घटकांचा वाटा जवळपास निम्मा आहे. मार्च महिन्यापासून मोहफूल पडण्यास सुरूवात होतात. मोहफूल पडण्यापूर्वी मोहाच्या झाडाची तसेच इतर झाडांची पाने गळतात. त्यामुळे झाडाखाली मोठ्या प्रमाणात सुकलेल्या पानांचा खच जमा होतो.पालापाचोळ्यामुळे मोहफूल वेचने कठीण होत असल्याने पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावली जाते. मात्र आगीवर कुणाचेही नियंत्रण राहात नाही. पुढे ही आग जंगलात पसरून उग्ररूप धारण करते. तेंदूपत्त्याच्या हंगामाला मे महिन्यात सुरूवात होते. तेंदूपत्त्याची पाने चांगली येण्याच्या उद्देशाने गावकरी किंवा कंत्राटदार जंगलांना आगी लावत असल्याचे दिसून येते. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात ऊन असल्याने आग लवकरच उग्ररूप धारण करते.२०१७ मध्ये आग लागल्याच्या ९३७ घटना घडल्या. त्यामध्ये १ हजार ८२९ हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले. २०१८ मध्ये १ हजार ३४२ आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये २ हजार ६८३ हेक्टर क्षेत्र जळाले तर २०१९ मध्ये सर्वाधिक २ हजार ४७१ घटनांमध्ये १४ हजार १६० हेक्टर क्षेत्रावरील जंगल जळाले आहे.आगीच्या घटनांमुळे जंगल व जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे आगीच्या घटना घडू नये यासाठी वनविभाग सतर्क आहे. ग्रामीण भागात कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. तसेच आगी न लावण्याचे आवाहन केले जात आहेत. फायरलाईन आखली जात आहे.मार्च व एप्रिल महिन्यात लागतात जास्त आगीफेब्रुवारी ते जून या कालावधीत उन्हाळा राहते. तसेच मार्च महिन्यात मोहफूल पडण्यास सुरूवात होते. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोह संकलन करीत असतात. मोहफूल वेचण्यासाठी मोहफुलाच्या झाडाखाली आग लावली जात असल्याने मार्च व एप्रिल महिन्यात सर्वाधिक आगी लागत असल्याचे दिसून येते. २०१७ मध्ये मार्च महिन्यात आग लागण्याच्या ४०९ तर एप्रिल महिन्यात ४९३ घटना घडल्या आहेत. २०१८ मध्ये मार्च महिन्यात ९१८ व एप्रिल महिन्यात ३८०, तर २०१९ मध्ये मार्च महिन्यात १ हजार २९२ आणि एप्रिल महिन्यात ९६० घटना घडल्या आहेत.सॅटेलाईटमुळे कळते वेळीच माहितीजंगलात लागणाऱ्या प्रत्येक आगीची घटना सॅटेलाईटमार्फत फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडियाला कळते. सदर विभाग जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना याची माहिती पोहोचविते. नेमकी कोणत्या बिटमध्ये आग लागली याबाबतचा संदेश पाठविला जाते. सदर संदेश संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षक, वनपाल यांना पाठवून सतर्क केले जाते. त्याचवेळी वनरक्षक त्या ठिकाणी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करते. मात्र गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासीबहुल आहे. तसेच अतिशय घनदाट जंगल आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी आग लागल्याचे माहित झाले तरी त्या ठिकाणी पोहोचणे कठीण होत असल्याने काहीही उपाययोजना अशक्य होतात. परिणामी आग विस्तारत जाते असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :forestजंगल