शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

तीन वर्षात १९ हजार हेक्टर जंगलाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८७ हजार ६०२ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. दुर्गम भागात मोहाची व तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन झाडांच्या भरवशावर दुर्गम भागातील नागरिकांना जवळपास चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. एकूण उत्पन्नात या दोन घटकांचा वाटा जवळपास निम्मा आहे. मार्च महिन्यापासून मोहफूल पडण्यास सुरूवात होतात.

ठळक मुद्देवनविभाग सतर्क : २०१९ मध्ये सर्वाधिक घटना, यावर्षीही फायरलाईनवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलांना आगी लागू नये यासाठी वनविभागामार्फत अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी उन्हाळ्यात आगी लागतातच. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत ४ हजार ७५० आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १८ हजार ६७२ हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी सापडले.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८७ हजार ६०२ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. दुर्गम भागात मोहाची व तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन झाडांच्या भरवशावर दुर्गम भागातील नागरिकांना जवळपास चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. एकूण उत्पन्नात या दोन घटकांचा वाटा जवळपास निम्मा आहे. मार्च महिन्यापासून मोहफूल पडण्यास सुरूवात होतात. मोहफूल पडण्यापूर्वी मोहाच्या झाडाची तसेच इतर झाडांची पाने गळतात. त्यामुळे झाडाखाली मोठ्या प्रमाणात सुकलेल्या पानांचा खच जमा होतो.पालापाचोळ्यामुळे मोहफूल वेचने कठीण होत असल्याने पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावली जाते. मात्र आगीवर कुणाचेही नियंत्रण राहात नाही. पुढे ही आग जंगलात पसरून उग्ररूप धारण करते. तेंदूपत्त्याच्या हंगामाला मे महिन्यात सुरूवात होते. तेंदूपत्त्याची पाने चांगली येण्याच्या उद्देशाने गावकरी किंवा कंत्राटदार जंगलांना आगी लावत असल्याचे दिसून येते. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात ऊन असल्याने आग लवकरच उग्ररूप धारण करते.२०१७ मध्ये आग लागल्याच्या ९३७ घटना घडल्या. त्यामध्ये १ हजार ८२९ हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले. २०१८ मध्ये १ हजार ३४२ आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये २ हजार ६८३ हेक्टर क्षेत्र जळाले तर २०१९ मध्ये सर्वाधिक २ हजार ४७१ घटनांमध्ये १४ हजार १६० हेक्टर क्षेत्रावरील जंगल जळाले आहे.आगीच्या घटनांमुळे जंगल व जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे आगीच्या घटना घडू नये यासाठी वनविभाग सतर्क आहे. ग्रामीण भागात कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. तसेच आगी न लावण्याचे आवाहन केले जात आहेत. फायरलाईन आखली जात आहे.मार्च व एप्रिल महिन्यात लागतात जास्त आगीफेब्रुवारी ते जून या कालावधीत उन्हाळा राहते. तसेच मार्च महिन्यात मोहफूल पडण्यास सुरूवात होते. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोह संकलन करीत असतात. मोहफूल वेचण्यासाठी मोहफुलाच्या झाडाखाली आग लावली जात असल्याने मार्च व एप्रिल महिन्यात सर्वाधिक आगी लागत असल्याचे दिसून येते. २०१७ मध्ये मार्च महिन्यात आग लागण्याच्या ४०९ तर एप्रिल महिन्यात ४९३ घटना घडल्या आहेत. २०१८ मध्ये मार्च महिन्यात ९१८ व एप्रिल महिन्यात ३८०, तर २०१९ मध्ये मार्च महिन्यात १ हजार २९२ आणि एप्रिल महिन्यात ९६० घटना घडल्या आहेत.सॅटेलाईटमुळे कळते वेळीच माहितीजंगलात लागणाऱ्या प्रत्येक आगीची घटना सॅटेलाईटमार्फत फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडियाला कळते. सदर विभाग जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना याची माहिती पोहोचविते. नेमकी कोणत्या बिटमध्ये आग लागली याबाबतचा संदेश पाठविला जाते. सदर संदेश संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षक, वनपाल यांना पाठवून सतर्क केले जाते. त्याचवेळी वनरक्षक त्या ठिकाणी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करते. मात्र गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासीबहुल आहे. तसेच अतिशय घनदाट जंगल आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी आग लागल्याचे माहित झाले तरी त्या ठिकाणी पोहोचणे कठीण होत असल्याने काहीही उपाययोजना अशक्य होतात. परिणामी आग विस्तारत जाते असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :forestजंगल