शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

१९ टक्के खतांचे नमुने निघाले बोगस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:25 IST

शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असलेल्या खरीप व रबी हंगामातील पीक चांगले यावे यासाठी शेतकरी शेतात मोठे कष्ट घेतात. पण काही खत, बियाणे व कीटकनाशक कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी बोगस माल मारून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरत आहेत.

ठळक मुद्दे३४८ पैकी ६६ नमुने अप्रमाणित : कारवाई केवळ १४ विक्रेत्यांवर, बाकींना केवळ ताकीद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असलेल्या खरीप व रबी हंगामातील पीक चांगले यावे यासाठी शेतकरी शेतात मोठे कष्ट घेतात. पण काही खत, बियाणे व कीटकनाशक कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी बोगस माल मारून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरत आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात कृषी विभागाने घेतलेल्या खतांच्या ३४८ नमुन्यांपैकी तब्बल ६६ नमुने अप्रमाणित निघाले. मात्र त्या सर्व कंपन्या, विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याऐवजी कृषी विभागाने १४ विक्रेत्यांवर कारवाई करीत ३९ नमुन्यांसाठी संबंधितांना केवळ ताकिद देऊन अभय दिले.खतांचे ६६ नमुने (एकूण खतापैकी १९ टक्के) अप्रमाणित, अर्थात बोगस निघाले. त्या खतांमध्ये अपेक्षित गुणांची मात्र कमी आढळली. त्यामुळे ते खत वापरल्यानंतरही त्याचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. परिणामी त्यांना पीकांच्या उत्पन्नात नुकसान सहन करावे लागले. रासायनिक खत विक्री करणाऱ्या १४ विक्रेत्यांविरूद्ध अप्रमाणित बियाणेप्रकरणी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. २२ विक्रेत्यांंचा खतांचासाठा सील करून विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले.गेल्या हंगामात बियाण्यांचे ५१० नमुने काढण्यात आले. त्यापैकी १० नमुने अप्रमाणित आढळले. त्यापैकी ४ नमुने न्यायालयीन खटल्यासाठी पात्र ठरवून ६ जणांना ताकीद देण्यात आली. ४ जणांना विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले. याशिवाय कीटकनाशकांचे १२१ नमुने काढण्यात आले. त्यापैकी ५ नमुने अप्रमाणित आढळले तर २९ जणांना नियमांचे पालन न केल्याबद्दल विविध कारणांसाठी विक्री बंदीचे आदेश देण्यात आले.जिल्ह्यात गेल्या हंगामात एक गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, २० अर्धवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, १५ जिल्हा परिषदेचे अर्धवेळ गुणवत्ता निरीक्षक असे ३५ गुणनियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात असलेल्या बियाण्यांच्या २७९, रासायनिक खत विक्रीच्या ५०० आणि कीटकनाशक विक्रीच्या २३३ परवानाधारक विक्री केंद्रांचे निरीक्षण, तपासणी करण्याची त्यांची जबाबदारी आहे. गेल्यावर्षी जिल्हा पातळीवर १, तालुकास्तरावर १२ अशी एकूण १३ दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली होती.१३ तक्रार निवारण कक्षसन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना योग्य दर्जा व गुणवत्तेचा कृषी माल मिळावा यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावर एक अशी १३ भरारी पथके आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १३ तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी बियाण्यांचे ५९०, रासायनिक खतांचे ३०६ तर कीटकनाशकांचे १२१ नमुने घेण्याचे लक्ष्यांक देण्यात आले आहेत.