शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

१९ टक्के खतांचे नमुने निघाले बोगस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:25 IST

शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असलेल्या खरीप व रबी हंगामातील पीक चांगले यावे यासाठी शेतकरी शेतात मोठे कष्ट घेतात. पण काही खत, बियाणे व कीटकनाशक कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी बोगस माल मारून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरत आहेत.

ठळक मुद्दे३४८ पैकी ६६ नमुने अप्रमाणित : कारवाई केवळ १४ विक्रेत्यांवर, बाकींना केवळ ताकीद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असलेल्या खरीप व रबी हंगामातील पीक चांगले यावे यासाठी शेतकरी शेतात मोठे कष्ट घेतात. पण काही खत, बियाणे व कीटकनाशक कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी बोगस माल मारून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरत आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात कृषी विभागाने घेतलेल्या खतांच्या ३४८ नमुन्यांपैकी तब्बल ६६ नमुने अप्रमाणित निघाले. मात्र त्या सर्व कंपन्या, विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याऐवजी कृषी विभागाने १४ विक्रेत्यांवर कारवाई करीत ३९ नमुन्यांसाठी संबंधितांना केवळ ताकिद देऊन अभय दिले.खतांचे ६६ नमुने (एकूण खतापैकी १९ टक्के) अप्रमाणित, अर्थात बोगस निघाले. त्या खतांमध्ये अपेक्षित गुणांची मात्र कमी आढळली. त्यामुळे ते खत वापरल्यानंतरही त्याचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. परिणामी त्यांना पीकांच्या उत्पन्नात नुकसान सहन करावे लागले. रासायनिक खत विक्री करणाऱ्या १४ विक्रेत्यांविरूद्ध अप्रमाणित बियाणेप्रकरणी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. २२ विक्रेत्यांंचा खतांचासाठा सील करून विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले.गेल्या हंगामात बियाण्यांचे ५१० नमुने काढण्यात आले. त्यापैकी १० नमुने अप्रमाणित आढळले. त्यापैकी ४ नमुने न्यायालयीन खटल्यासाठी पात्र ठरवून ६ जणांना ताकीद देण्यात आली. ४ जणांना विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले. याशिवाय कीटकनाशकांचे १२१ नमुने काढण्यात आले. त्यापैकी ५ नमुने अप्रमाणित आढळले तर २९ जणांना नियमांचे पालन न केल्याबद्दल विविध कारणांसाठी विक्री बंदीचे आदेश देण्यात आले.जिल्ह्यात गेल्या हंगामात एक गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, २० अर्धवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, १५ जिल्हा परिषदेचे अर्धवेळ गुणवत्ता निरीक्षक असे ३५ गुणनियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात असलेल्या बियाण्यांच्या २७९, रासायनिक खत विक्रीच्या ५०० आणि कीटकनाशक विक्रीच्या २३३ परवानाधारक विक्री केंद्रांचे निरीक्षण, तपासणी करण्याची त्यांची जबाबदारी आहे. गेल्यावर्षी जिल्हा पातळीवर १, तालुकास्तरावर १२ अशी एकूण १३ दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली होती.१३ तक्रार निवारण कक्षसन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना योग्य दर्जा व गुणवत्तेचा कृषी माल मिळावा यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावर एक अशी १३ भरारी पथके आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १३ तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी बियाण्यांचे ५९०, रासायनिक खतांचे ३०६ तर कीटकनाशकांचे १२१ नमुने घेण्याचे लक्ष्यांक देण्यात आले आहेत.