लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रूग्णांसाठी सोयीसुविधा व मोफत औषधोपचार दिला जात असला तरी दरवर्षी नवीन क्षयरूण आढळून येतात. गडचिरोली जिल्ह्यात २०१९ या वर्षात १ हजार ८२२ क्षयरूग्ण शोधून काढण्यात आले. हे सर्व रूग्ण आता नियमित औषधोपचाराखाली आहेत.जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच क्षयरोग रूग्णालयामध्ये सदर कार्यक्रम राबविल्या जात आहे. १९९२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा नमूना आढावा घेण्यात आला. १९९७ मध्ये सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. २००५ मध्ये सदर कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात आला. १६ ऑक्टोबर २००२ पासून जिल्ह्यात सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशात दररोज ५ हजारवर लोकांना क्षयरोगाची लागण होते. दर दीड मिनिटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तरूण व कमावत्या वर्गात या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येते. याबाबत जनजागृती अधिक प्रमाणात आहे.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमानुसार २०१५ पर्यंत देशातून क्षयरोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशात दररोज पाच हजार लोकांना लागण होते. दर दीड मिनीटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तरूण व कमावत्या वर्गात या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आढळून येते. क्षयरोग निदानाकरिता उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन जिल्हा क्षयरोग मुक्त करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम यांनी केले आहे.क्षयरोगाची लक्षणे व डॉट्स उपचारपद्धतीदोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा खोकला, संध्याकाळी हलका ताप, वजनात घट होणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त येणे ही लक्षणे दिसून आल्यास क्षयरोगाचा संशयित रूग्ण समजावा, तसेच थुकी दूषित क्षयरोग रूग्णाच्या सहवासात असणारी व्यक्ती, कुपोषित, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारी व्यक्ती, मधुमेह असणारी व्यक्ती, दीर्घकालीन आजारी वृद्ध व्यक्ती आदींना क्षयरोग होण्याची शक्यता असते.क्षयरूग्णांवर योग्य औषधोपचारासाठी डॉट्स उपचार पद्धती वापरली जाते. या पद्धतीत क्षय रूग्णांवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष व देखरेखेखाली प्रमाणिक औषधी दिली जातात. एक दिवसाआड औषध उपचार पद्धतीत बदल होऊन आता दररोज औषधोपचार पद्धती राबविली जात आहे. त्यामुळ रूग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत आहेत.
क्षयरोगाचे १८२२ रूग्ण औषधोपचाराखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST
जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच क्षयरोग रूग्णालयामध्ये सदर कार्यक्रम राबविल्या जात आहे. १९९२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा नमूना आढावा घेण्यात आला.
क्षयरोगाचे १८२२ रूग्ण औषधोपचाराखाली
ठळक मुद्देमोफत औषधोपचार : गडचिरोली जिल्ह्यात २००२ पासून सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम