शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोगाचे १८२२ रूग्ण औषधोपचाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच क्षयरोग रूग्णालयामध्ये सदर कार्यक्रम राबविल्या जात आहे. १९९२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा नमूना आढावा घेण्यात आला.

ठळक मुद्देमोफत औषधोपचार : गडचिरोली जिल्ह्यात २००२ पासून सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रूग्णांसाठी सोयीसुविधा व मोफत औषधोपचार दिला जात असला तरी दरवर्षी नवीन क्षयरूण आढळून येतात. गडचिरोली जिल्ह्यात २०१९ या वर्षात १ हजार ८२२ क्षयरूग्ण शोधून काढण्यात आले. हे सर्व रूग्ण आता नियमित औषधोपचाराखाली आहेत.जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच क्षयरोग रूग्णालयामध्ये सदर कार्यक्रम राबविल्या जात आहे. १९९२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा नमूना आढावा घेण्यात आला. १९९७ मध्ये सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. २००५ मध्ये सदर कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात आला. १६ ऑक्टोबर २००२ पासून जिल्ह्यात सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशात दररोज ५ हजारवर लोकांना क्षयरोगाची लागण होते. दर दीड मिनिटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तरूण व कमावत्या वर्गात या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येते. याबाबत जनजागृती अधिक प्रमाणात आहे.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमानुसार २०१५ पर्यंत देशातून क्षयरोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशात दररोज पाच हजार लोकांना लागण होते. दर दीड मिनीटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तरूण व कमावत्या वर्गात या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आढळून येते. क्षयरोग निदानाकरिता उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन जिल्हा क्षयरोग मुक्त करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम यांनी केले आहे.क्षयरोगाची लक्षणे व डॉट्स उपचारपद्धतीदोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा खोकला, संध्याकाळी हलका ताप, वजनात घट होणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त येणे ही लक्षणे दिसून आल्यास क्षयरोगाचा संशयित रूग्ण समजावा, तसेच थुकी दूषित क्षयरोग रूग्णाच्या सहवासात असणारी व्यक्ती, कुपोषित, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारी व्यक्ती, मधुमेह असणारी व्यक्ती, दीर्घकालीन आजारी वृद्ध व्यक्ती आदींना क्षयरोग होण्याची शक्यता असते.क्षयरूग्णांवर योग्य औषधोपचारासाठी डॉट्स उपचार पद्धती वापरली जाते. या पद्धतीत क्षय रूग्णांवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष व देखरेखेखाली प्रमाणिक औषधी दिली जातात. एक दिवसाआड औषध उपचार पद्धतीत बदल होऊन आता दररोज औषधोपचार पद्धती राबविली जात आहे. त्यामुळ रूग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य