शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

क्षयरोगाचे १८२२ रूग्ण औषधोपचाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच क्षयरोग रूग्णालयामध्ये सदर कार्यक्रम राबविल्या जात आहे. १९९२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा नमूना आढावा घेण्यात आला.

ठळक मुद्देमोफत औषधोपचार : गडचिरोली जिल्ह्यात २००२ पासून सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रूग्णांसाठी सोयीसुविधा व मोफत औषधोपचार दिला जात असला तरी दरवर्षी नवीन क्षयरूण आढळून येतात. गडचिरोली जिल्ह्यात २०१९ या वर्षात १ हजार ८२२ क्षयरूग्ण शोधून काढण्यात आले. हे सर्व रूग्ण आता नियमित औषधोपचाराखाली आहेत.जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच क्षयरोग रूग्णालयामध्ये सदर कार्यक्रम राबविल्या जात आहे. १९९२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा नमूना आढावा घेण्यात आला. १९९७ मध्ये सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. २००५ मध्ये सदर कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात आला. १६ ऑक्टोबर २००२ पासून जिल्ह्यात सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशात दररोज ५ हजारवर लोकांना क्षयरोगाची लागण होते. दर दीड मिनिटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तरूण व कमावत्या वर्गात या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येते. याबाबत जनजागृती अधिक प्रमाणात आहे.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमानुसार २०१५ पर्यंत देशातून क्षयरोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशात दररोज पाच हजार लोकांना लागण होते. दर दीड मिनीटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तरूण व कमावत्या वर्गात या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आढळून येते. क्षयरोग निदानाकरिता उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन जिल्हा क्षयरोग मुक्त करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम यांनी केले आहे.क्षयरोगाची लक्षणे व डॉट्स उपचारपद्धतीदोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा खोकला, संध्याकाळी हलका ताप, वजनात घट होणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त येणे ही लक्षणे दिसून आल्यास क्षयरोगाचा संशयित रूग्ण समजावा, तसेच थुकी दूषित क्षयरोग रूग्णाच्या सहवासात असणारी व्यक्ती, कुपोषित, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारी व्यक्ती, मधुमेह असणारी व्यक्ती, दीर्घकालीन आजारी वृद्ध व्यक्ती आदींना क्षयरोग होण्याची शक्यता असते.क्षयरूग्णांवर योग्य औषधोपचारासाठी डॉट्स उपचार पद्धती वापरली जाते. या पद्धतीत क्षय रूग्णांवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष व देखरेखेखाली प्रमाणिक औषधी दिली जातात. एक दिवसाआड औषध उपचार पद्धतीत बदल होऊन आता दररोज औषधोपचार पद्धती राबविली जात आहे. त्यामुळ रूग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य