शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१८ गावातील विद्यार्थ्यांचा खड्डेमय मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:02 IST

चामोर्शी तालुक्याच्या सुभाषग्राम परिसरातील जवळपास १८ गावांतील १२५ विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी मानव विकास मिशनच्या बसने जातात. मात्र वसंतपूर ते कोपरआलीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देरस्त्याची दुरूस्ती नाही : धोकादायक प्रवासामुळे अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेवटर्कघोट : चामोर्शी तालुक्याच्या सुभाषग्राम परिसरातील जवळपास १८ गावांतील १२५ विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी मानव विकास मिशनच्या बसने जातात. मात्र वसंतपूर ते कोपरआलीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर मार्गावर तीन फूट खोल व नऊ फूट लांबीचा मोठा खड्डा आहे. या खड्ड्यातूनच मानव विकास मिशनची बस दररोज आवागमन करते. त्यामुळे सदर मार्गाने विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. परिणामी या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे.राज्य परिवहन महामंडळाची मानव विकास मिशनची बस सुभाषग्राम ते घोट-मुलचेरा अशी धावते. सदर बस घोट येथे मुक्कामी राहते. पहाटे ५.३० वाजता ठाकूरनगर, नरेंद्रपूर, मलकापूर, तुमडी, सुभाषग्राम, गुंडापल्ली या गावातून जाते. या भागातील १८ गावांतील १२५ वर विद्यार्थी दररोज मानव विकास बसने प्रवास करून शाळा, महाविद्यालयात पोहोचतात. मात्र सदर मार्ग पूर्णत: खड्डेमय झाल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. मात्र संबंधित विभागाचे याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. वसंतपूर-कोपरअल्लीपर्यंत या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा हा संघर्ष अद्यापही कायम आहे. सातत्याने मागणी करूनही संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधींचा याकडे दुर्लक्ष आहे.

आमचे पाल्य शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी जातात. मात्र खड्डेमय मार्गामुळे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी गावकरी व विद्यार्थी मिळून श्रमदानातून मुरूम टाकून सदर मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे मुरूम अधिक दिवस टिकला नाही. गंभीर बाब असूनही प्रशासनाचे रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.- आकुल मंडल, सरपंच,ग्रा.पं.कालीनगर, ता.मुलचेराआमच्या भागातील जवळपास १५ ते १८ गावातील १३० पेक्षा अधिक विद्यार्थी मानव विकास बसने शिक्षणासाठी दररोज प्रवास करीत आहेत. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासनाने तत्काळ या मार्गाची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- तपन सरकार, सरपंच, ग्रा.पं.वसंतपूर, ता.चामोर्शी 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा