शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

१८ गावातील विद्यार्थ्यांचा खड्डेमय मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:02 IST

चामोर्शी तालुक्याच्या सुभाषग्राम परिसरातील जवळपास १८ गावांतील १२५ विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी मानव विकास मिशनच्या बसने जातात. मात्र वसंतपूर ते कोपरआलीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देरस्त्याची दुरूस्ती नाही : धोकादायक प्रवासामुळे अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेवटर्कघोट : चामोर्शी तालुक्याच्या सुभाषग्राम परिसरातील जवळपास १८ गावांतील १२५ विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी मानव विकास मिशनच्या बसने जातात. मात्र वसंतपूर ते कोपरआलीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर मार्गावर तीन फूट खोल व नऊ फूट लांबीचा मोठा खड्डा आहे. या खड्ड्यातूनच मानव विकास मिशनची बस दररोज आवागमन करते. त्यामुळे सदर मार्गाने विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. परिणामी या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे.राज्य परिवहन महामंडळाची मानव विकास मिशनची बस सुभाषग्राम ते घोट-मुलचेरा अशी धावते. सदर बस घोट येथे मुक्कामी राहते. पहाटे ५.३० वाजता ठाकूरनगर, नरेंद्रपूर, मलकापूर, तुमडी, सुभाषग्राम, गुंडापल्ली या गावातून जाते. या भागातील १८ गावांतील १२५ वर विद्यार्थी दररोज मानव विकास बसने प्रवास करून शाळा, महाविद्यालयात पोहोचतात. मात्र सदर मार्ग पूर्णत: खड्डेमय झाल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. मात्र संबंधित विभागाचे याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. वसंतपूर-कोपरअल्लीपर्यंत या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा हा संघर्ष अद्यापही कायम आहे. सातत्याने मागणी करूनही संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधींचा याकडे दुर्लक्ष आहे.

आमचे पाल्य शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी जातात. मात्र खड्डेमय मार्गामुळे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी गावकरी व विद्यार्थी मिळून श्रमदानातून मुरूम टाकून सदर मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे मुरूम अधिक दिवस टिकला नाही. गंभीर बाब असूनही प्रशासनाचे रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.- आकुल मंडल, सरपंच,ग्रा.पं.कालीनगर, ता.मुलचेराआमच्या भागातील जवळपास १५ ते १८ गावातील १३० पेक्षा अधिक विद्यार्थी मानव विकास बसने शिक्षणासाठी दररोज प्रवास करीत आहेत. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासनाने तत्काळ या मार्गाची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- तपन सरकार, सरपंच, ग्रा.पं.वसंतपूर, ता.चामोर्शी 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा