शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

लागवडीसाठी १६ लाख रोपटे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागालाच उचलावी लागते. त्यादृष्टीने या दोन्ही विभागाने यावर्षी नियोजन केले आहे.

ठळक मुद्देनागरिकांना सुविधा : वन आणि सामाजिक वनीकरण विभागाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीच्या पावसाळ्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व इतर प्रशासकीय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या वृक्षांची लागवडीसाठी वनविभाग सज्ज झाला आहे. शासनाचे विविध विभाग व सामान्य नागरिकांना रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे आहे. या दोन विभागामार्फत नागरिक व प्रशासकीय यंत्रणांना यावर्षी सुमारे १५ लाख ७९ हजार रोपटे उपलब्ध होऊ शकणार आहेत.राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागालाच उचलावी लागते. त्यादृष्टीने या दोन्ही विभागाने यावर्षी नियोजन केले आहे.गडचिरोली वनवृत्तांतर्गत येत असलेल्या पाचही वन विभागांनी रोपटे लावले आहेत. सद्य:स्थितीत आलापल्ली वन विभागाकडे १७.२१ लाख, भामरागड वन विभागात ६७ हजार, गडचिरोली वन विभागात ३.४८ लाख, सिरोंचा ४.३५ लाख, देसाईगंज १.७९ लाख असे एकूण २७ लाख ५० हजार रोपटे उपलब्ध आहेत. त्यापैकी वन विभाग १४ लाख २१ हजार वृक्ष लागवड करणार आहे. यातून शिल्लक असलेले १३ लाख २९ हजार रोपटे इतर यंत्रणांना उपलब्ध होणार आहेत.सामाजिक वनीकरण विभागाकडेही ३ लाख ५० हजार रोपटे आहेत. त्यापैकी सामाजिक वनीकरण विभाग स्वत: १ लाख रोपटे लावणार आहेत. तर अडीच लाख रोपटे इतर यंत्रणांना उपलब्ध होणार आहेत.नाममात्र किंमत आकारणारनागरिक, सामाजिक संस्था, प्रशासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवड करून ते जगवावे हा मुख्य उद्देश वृक्ष लागवडीमागे आहे. त्यामुळे नागरिकांना नाममात्र किंमतीत रोपटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वृक्ष लागवड योजनेची जागृती व्हावी यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत. तरीही नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी स्वत:हून वृक्ष लागवड करण्याची गरज आहे.जुन्या मृत रोपट्यांच्या जागी नवीन लावणारजिल्ह्यात नव्याने रोपटे लावण्यासाठी आता पुरेशी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे जुने रोपटे जिवंत नसल्यास त्याच जागी नवीन रोपट्यांची लावगड करण्यावर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग