शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

लागवडीसाठी १६ लाख रोपटे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागालाच उचलावी लागते. त्यादृष्टीने या दोन्ही विभागाने यावर्षी नियोजन केले आहे.

ठळक मुद्देनागरिकांना सुविधा : वन आणि सामाजिक वनीकरण विभागाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीच्या पावसाळ्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व इतर प्रशासकीय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या वृक्षांची लागवडीसाठी वनविभाग सज्ज झाला आहे. शासनाचे विविध विभाग व सामान्य नागरिकांना रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे आहे. या दोन विभागामार्फत नागरिक व प्रशासकीय यंत्रणांना यावर्षी सुमारे १५ लाख ७९ हजार रोपटे उपलब्ध होऊ शकणार आहेत.राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागालाच उचलावी लागते. त्यादृष्टीने या दोन्ही विभागाने यावर्षी नियोजन केले आहे.गडचिरोली वनवृत्तांतर्गत येत असलेल्या पाचही वन विभागांनी रोपटे लावले आहेत. सद्य:स्थितीत आलापल्ली वन विभागाकडे १७.२१ लाख, भामरागड वन विभागात ६७ हजार, गडचिरोली वन विभागात ३.४८ लाख, सिरोंचा ४.३५ लाख, देसाईगंज १.७९ लाख असे एकूण २७ लाख ५० हजार रोपटे उपलब्ध आहेत. त्यापैकी वन विभाग १४ लाख २१ हजार वृक्ष लागवड करणार आहे. यातून शिल्लक असलेले १३ लाख २९ हजार रोपटे इतर यंत्रणांना उपलब्ध होणार आहेत.सामाजिक वनीकरण विभागाकडेही ३ लाख ५० हजार रोपटे आहेत. त्यापैकी सामाजिक वनीकरण विभाग स्वत: १ लाख रोपटे लावणार आहेत. तर अडीच लाख रोपटे इतर यंत्रणांना उपलब्ध होणार आहेत.नाममात्र किंमत आकारणारनागरिक, सामाजिक संस्था, प्रशासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवड करून ते जगवावे हा मुख्य उद्देश वृक्ष लागवडीमागे आहे. त्यामुळे नागरिकांना नाममात्र किंमतीत रोपटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वृक्ष लागवड योजनेची जागृती व्हावी यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत. तरीही नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी स्वत:हून वृक्ष लागवड करण्याची गरज आहे.जुन्या मृत रोपट्यांच्या जागी नवीन लावणारजिल्ह्यात नव्याने रोपटे लावण्यासाठी आता पुरेशी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे जुने रोपटे जिवंत नसल्यास त्याच जागी नवीन रोपट्यांची लावगड करण्यावर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग