शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

१४७ दलित वस्त्या प्रकाशमान

By admin | Updated: February 3, 2015 22:54 IST

राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी दलित वस्त्यांमध्ये एलएडी बेस सौर पथदिवे स्थापित करण्याची योजना

सौर पथदिव्यांद्वारे : उर्वरित ४२५ वस्त्या २०१७ पर्यंतदिलीप दहेलकर - गडचिरोलीराज्य शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी दलित वस्त्यांमध्ये एलएडी बेस सौर पथदिवे स्थापित करण्याची योजना सन २०१३-१४ या वर्षांपासून जिल्ह्यात राबविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुक्यात ग्रामीण भागात एकूण ५७२ दलित वस्त्या आहेत. यापैकी दोन वर्षात जि.प.च्या समाज कल्याण विभागातर्फे १४७ रस्त्यांमध्ये सौरदिवे स्थापित करण्यात आले. यामुळे या वस्त्या प्रकाशमान झाल्या आहेत.दलित वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावे व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांच्या विकासासाठी शासनाने अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधींचा निधी खर्च केल्या जातो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यातून दलित वस्तीत नाली, रस्ता व समाज मंदिराचे बांधकाम केल्या जाते. या विकास कामासोबतच शहरी भागातील दलित वस्ती वगळता आता ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाने ३० जानेवारी २०१४ च्या शासन निर्णयान्वये २०१३-१४ ते २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता दलित वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्याची योजना कार्यान्वित केली. सदर योजनेला दोन वर्षाचा कालावधी उलटला आहे. आतापर्यंत जि.प. समाज कल्याण विभागातर्फे एकूण ५७२ दलित वस्त्यांपैकी १४७ वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. उर्वरित ४२५ दलित वस्त्यांमध्ये २०१७ मार्च अखेरपर्यंत सौर पथदिवे स्थापित करण्यात येणार आहेत.असे उजाडले सौर पथदिवेसन २०१३-१४ मध्ये ५० दलित वस्त्यांमध्ये ५४४ सौर पथदिवे लावण्यात आले. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील चार गावातील वस्त्यांमध्ये ४०, अहेरी तालुक्यातील सहा गावातील दलित वस्त्यांमध्ये ६०, चामोर्शी तालुक्यातील १० गावातील दलित वस्त्यांमध्ये १०८, कुरखेडा तालुक्यातील तीन गावातील दलित वस्त्यांमध्ये ३४, देसाईगंज तालुक्यातील आठ गावातील दलित वस्त्यांमध्ये ९२, मुलचेरा तालुक्यातील चार गावातील दलित वस्त्यांमध्ये ९२, आरमोरी तालुक्यातील तीन गावातील रस्त्यांमध्ये ३८ व सिरोंचा तालुक्यातील १२ गावातील दलित वस्त्यांमध्ये १२६ सौर पथदिवे लावण्यात आले. सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे पाच तालुक्यातील ९७ गावातील दलित वस्त्यांमध्ये ६९९ सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. यामध्ये भामरागड तालुक्यातील चार गावातील दलित वस्त्यांमध्ये ३४, एटापल्ली तालुक्यातील १४ गावातील दलित वस्त्यांमध्ये ८४, कोरची तालुक्यातील २५ गावातील दलित वस्त्यांमध्ये १३६, अहेरी तालुक्यातील २६ गावातील दलित वस्त्यांमध्ये २१६, सिरोंचा तालुक्यातील २८ गावातील दलित वस्त्यांमध्ये २२९ सौर पथदिवे लावण्यात आले आहेत.