शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१४ ग्रामपंचायतींचा होणार सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:08 IST

जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामपातळीवर वनराई बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० बंधाऱ्यांचे काम उत्कृष्टरित्या करून जलसंधारणाचे काम करतील, अशा जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार देऊन प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा व तालुकास्तरीय पुरस्कार मिळणार : श्रमदान व लोकसहभागातून बंधारा बांधकाम चळवळ

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामपातळीवर वनराई बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० बंधाऱ्यांचे काम उत्कृष्टरित्या करून जलसंधारणाचे काम करतील, अशा जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार देऊन प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.प्रशासन व नरेगा विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात २५ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत वनराई बंधारा निर्मितीची चळवळ उभारण्यात आली. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्यासह जि.प.च्या इतर पदाधिकाºयांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच जिल्ह्यात वनराई बंधारा निर्मितीची चळवळ उभारण्यात आली. जमिनीतील पाणी जमिनीत मुरावे, पाणीपातळी वाढावी, सिंचन क्षेत्र वाढावे तसेच टंचाईमुक्त गडचिरोली जिल्हा व्हावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला. सिमेंटची रिकामी बॅग, माती, वाळू व दगड यांच्या सहाय्याने जिल्हाभरात मागील आठवड्यापर्यंत जवळपास दोन हजार वनराई बंधारे बांधण्यात आले. जिल्हाभरात तब्बल २ हजार ७९३ बंधारे बांधकामाचे उद्दिष्ट प्रशासनाने दिले आहे. त्यानुसार आरमोरी तालुक्यात सर्वाधिक ४००, त्याखालोखाल धानोरा तालुक्यात ३१०, देसाईगंज ३०० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याशिवाय इतरही तालुक्यांना १००, १५० ते २०० बंधारे बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वनराई बंधाऱ्याचे बांधकाम श्रमदान करून लोकसहभागातून केले जात आहे. याचा आढावाही तालुका व जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने घेतला जात आहे.प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार आतापर्यंत चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक २८०, कोरची तालुक्यात २०६, धानोरा तालुक्यात २०२, सिरोंचा तालुक्यात २०१, आरमोरी तालुक्यात १९२ बंधाऱ्याचे काम झाले आहे. याशिवाय देसाईगंज तालुक्यात १८५, गडचिरोली १८५, एटापल्ली ९५, मुलचेरा ९०, कुरखेडा ७०, अहेरी तालुक्यात ५२ बंधाऱ्याचे काम झाले आहे. सिरोंचा व भामरागड तालुका या कामात माघारला आहे.असे मिळणार रोख पुरस्कारज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० वनराई बंधारे तयार करणार, अशा ग्रामपंचायती तालुकास्तरीय पुरस्कार स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. यापैकी प्रत्येक तालुक्यातून एका ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. प्रती ग्रामपंचायतीला २० हजार रूपयांचा तालुकास्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झालेल्या ग्रामपंचायतीमधून जिल्हास्तरावर दोन ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. एका ग्रा.पं.ला प्रथम व दुसऱ्या ग्रा.पं.ला द्वितीय पुरस्कार दिला जाणार आहे. प्रथम पुरस्कार रोख ६० हजार रूपये व द्वितीय पुरस्कार ४० हजार रूपयांचा असणार आहे.तालुकास्तरावरून तपासणीस प्रारंभकोणत्या ग्रामपंचायतीने किती व कशाप्रकारचे वनराई बंधारे बांधले याबाबतची प्रत्यक्ष तपासणी तालुकास्तरीय देखरेख, अंमलबजावणी व तपासणी समितीमार्फत २० आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. या समितीमध्ये संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, शाखा/कनिष्ठ अभियंता आदींचा समावेश आहे.तालुकास्तरावरील तपासणी व मूल्यमापनाचे काम पूर्ण झाल्यावर जिल्हास्तरीय समितीकडून बंधारा कामाची तपासणी करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय समितीमध्ये जि.प.चे उपमुख्य कार्यकारी (ग्रा.पं.), उपमुख्य कार्यकारी (नरेगा), कृषी विकास अधिकारी (जि.प) व पंचायत विस्तार अधिकारी (जिल्हा परिषद) आदींचा समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत