शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१३६ युनिटमधून होणार तेंदू संकलन

By admin | Updated: May 7, 2015 01:16 IST

तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम तोंडावर आला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात हंगामाला सुरूवात होणार आहे.

गडचिरोली : तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम तोंडावर आला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात हंगामाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात 'पेसा' अंतर्गत येत असलेल्या १३८ मधून १२८ व गैरआदिवासी अंतर्गत येत असलेल्या ४३ मधून ९ तेंदू युनिटचा टेंडर काढण्यात आला असून जिल्ह्यातील १३६ तेंदूपत्ता युनिटमधून तेंदू संकलन करण्यात येणार आहे. ३३ ग्रामसभा तेंदू संकलन व विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. गडचिरोली जिल्हा हा ७८ टक्के वनव्याप्त आहे. यामुळे जिल्ह्यात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात तेंदू संकलन केले जातो. १५ ते २0 दिवस चालणाऱ्या या तेंदू हंगामात नागरिकांना चांगला रोजगार मिळतो. तेंदू संकलन करण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मजुर मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र यावर्षी 'पेसा 'कायदा अंतर्गत येत असलेल्या १३८ तेंदू युनिटीसाठी सहा वेळा काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये १२८ तेंदू युनिटचा टेंडर काढण्यात आला. तर गैरआदिवासी अंतर्गत येत असलेल्या ४३ तेंदू युनिटसाठी ७ वेळा काढण्यात टेंडरमध्ये केवळ ९ तेंदू युनिटचा समावेश आहे. १५ मे पासून सुरू होत असलेल्या तेंदू संकलनामध्ये जिल्ह्यातील ३३३ ग्रामसभा तेंदू संकलन करून तेंदूपत्त्याची विक्री करणार आहेत. संकलन करणाऱ्या ग्रामसभामध्ये गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यातील काही ग्रामसभांचा समावेश आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी धानोरा तालुक्यातील आयोजित ग्रामसभेत ९८ ग्रामसभांनी स्वत: तेंदू संकलन तेंदूपत्ता विक्रीचा निर्णय घेतला होता. मात्र यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली वनविभाग व ग्रामसभा यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील केवळ ३३ ग्रामसभा तेंदू संकलन व विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तेंदूपाने खराब होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सुरू होत असलेल्या तेंदू संकलनातून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. गडचिरोली जिल्हा हा उद्योग असल्याने नागरिकांना जास्त प्रमाणात तेंदू संकलनाकडे वळत असतात. १५ ते २0 दिवस चालणाऱ्या या तेंदू संकलनातून एका परिवाराचा चार ते पाच महिन्यांचा उदरनिर्वाह होतो. (शहर प्रतिनिधी)