शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

१३६ युनिटमधून होणार तेंदू संकलन

By admin | Updated: May 7, 2015 01:16 IST

तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम तोंडावर आला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात हंगामाला सुरूवात होणार आहे.

गडचिरोली : तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम तोंडावर आला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात हंगामाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात 'पेसा' अंतर्गत येत असलेल्या १३८ मधून १२८ व गैरआदिवासी अंतर्गत येत असलेल्या ४३ मधून ९ तेंदू युनिटचा टेंडर काढण्यात आला असून जिल्ह्यातील १३६ तेंदूपत्ता युनिटमधून तेंदू संकलन करण्यात येणार आहे. ३३ ग्रामसभा तेंदू संकलन व विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. गडचिरोली जिल्हा हा ७८ टक्के वनव्याप्त आहे. यामुळे जिल्ह्यात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात तेंदू संकलन केले जातो. १५ ते २0 दिवस चालणाऱ्या या तेंदू हंगामात नागरिकांना चांगला रोजगार मिळतो. तेंदू संकलन करण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मजुर मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र यावर्षी 'पेसा 'कायदा अंतर्गत येत असलेल्या १३८ तेंदू युनिटीसाठी सहा वेळा काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये १२८ तेंदू युनिटचा टेंडर काढण्यात आला. तर गैरआदिवासी अंतर्गत येत असलेल्या ४३ तेंदू युनिटसाठी ७ वेळा काढण्यात टेंडरमध्ये केवळ ९ तेंदू युनिटचा समावेश आहे. १५ मे पासून सुरू होत असलेल्या तेंदू संकलनामध्ये जिल्ह्यातील ३३३ ग्रामसभा तेंदू संकलन करून तेंदूपत्त्याची विक्री करणार आहेत. संकलन करणाऱ्या ग्रामसभामध्ये गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यातील काही ग्रामसभांचा समावेश आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी धानोरा तालुक्यातील आयोजित ग्रामसभेत ९८ ग्रामसभांनी स्वत: तेंदू संकलन तेंदूपत्ता विक्रीचा निर्णय घेतला होता. मात्र यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली वनविभाग व ग्रामसभा यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील केवळ ३३ ग्रामसभा तेंदू संकलन व विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तेंदूपाने खराब होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सुरू होत असलेल्या तेंदू संकलनातून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. गडचिरोली जिल्हा हा उद्योग असल्याने नागरिकांना जास्त प्रमाणात तेंदू संकलनाकडे वळत असतात. १५ ते २0 दिवस चालणाऱ्या या तेंदू संकलनातून एका परिवाराचा चार ते पाच महिन्यांचा उदरनिर्वाह होतो. (शहर प्रतिनिधी)