शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

१३ प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: August 17, 2014 23:09 IST

जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे १४ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र शासनाने केवळ

निधीचा अभाव : विद्यार्थी अपघात अनुदान योजना फसली

दिलीप दहेलकर - गडचिरोलीजि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे १४ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र शासनाने केवळ ७५ हजाराचा निधी शिक्षण विभागाला दिला आहे. त्यामुळे उर्वरित १३ प्रस्ताव प्रलंबित वर्षभरापासून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच देण्याकरीता राज्यातील इयत्ता पहिलीपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात सुरक्षा योजना शासनाने २० आॅगस्ट २००३ पासून राज्यभरात सुरू केली. यामध्ये शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग अशा सर्व प्रशासकीय विभागाच्या अखत्यारितील सर्व मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यामधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सन २००३ पासून सदर योजनेची अंमलबजावणी विमा कंपनीमार्फत करण्यात येत होती. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विम्याचे हप्ते एकत्रीतरित्या विमा कंपन्यांना एकाचवेळी अदा करण्यात येत होते. सदर विमा योजना दिवसातील २४ तासही लागू होती. म्हणजेच विद्यार्थ्याला कधीही अपघात झाला तरी तो विमा हप्त्यासाठी पात्र ठरतो, असे या योजनेच्या शासन निर्णयात नमुद होते. मात्र २००३ पासून या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात झालेला नाही. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच २०१०-११ या वर्षासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने करार केलेला नाही. ही बाब अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नांच्या स्वरूपात मांडण्यात आली. त्यामुळे शासनाने सदर योजना सुधारितपणे राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ११ जुलै २०११ रोजी नवा शासन निर्णय काढून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यात आली. या योजनेनुसार इयत्ता पहिली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे शासन निर्णय नमुद करण्यात आले. या योजनेनुसार कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात होऊन मृत्यूमुखी पडल्यास त्या विद्यार्थ्यांच्या पालकास ७५ हजार रूपयाचे अनुदान तर अपघातात विद्यार्थ्यांचे दोन अवयव निकामी झाल्यास ५० हजार तसेच एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रूपयाचे अनुदान देण्यात येते. या योजनेचे गडचिरोली जिल्ह्यातही अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यानुसार वर्षभरापूर्वी जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे १४ प्रस्ताव सादर करण्यात आले. जिल्हास्तरीय समितीमध्ये चर्चा होऊन या सर्वप्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सानुग्रह अनुदानाच्या मंजुरीसाठी सर्व प्रस्ताव शिक्षण उपसंचालकाकडे पाठविण्यात आले. मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून केवळ ७५ हजार रूपयाचाच निधी शिक्षण विभागाला प्राप्त झाला. त्यामुळे या योजनेतील एका विद्यार्थ्याच्या पालकास ७५ हजार रूपयाचे अनुदान देण्यात आले. १४ प्रस्तावापैकी फक्त एकच प्रस्ताव मार्गी लावण्यात आला. उर्वरित १३ प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून निधीअभावी प्रलंबित असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.