शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

१३ प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: August 17, 2014 23:09 IST

जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे १४ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र शासनाने केवळ

निधीचा अभाव : विद्यार्थी अपघात अनुदान योजना फसली

दिलीप दहेलकर - गडचिरोलीजि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे १४ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र शासनाने केवळ ७५ हजाराचा निधी शिक्षण विभागाला दिला आहे. त्यामुळे उर्वरित १३ प्रस्ताव प्रलंबित वर्षभरापासून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच देण्याकरीता राज्यातील इयत्ता पहिलीपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात सुरक्षा योजना शासनाने २० आॅगस्ट २००३ पासून राज्यभरात सुरू केली. यामध्ये शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग अशा सर्व प्रशासकीय विभागाच्या अखत्यारितील सर्व मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यामधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सन २००३ पासून सदर योजनेची अंमलबजावणी विमा कंपनीमार्फत करण्यात येत होती. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विम्याचे हप्ते एकत्रीतरित्या विमा कंपन्यांना एकाचवेळी अदा करण्यात येत होते. सदर विमा योजना दिवसातील २४ तासही लागू होती. म्हणजेच विद्यार्थ्याला कधीही अपघात झाला तरी तो विमा हप्त्यासाठी पात्र ठरतो, असे या योजनेच्या शासन निर्णयात नमुद होते. मात्र २००३ पासून या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात झालेला नाही. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच २०१०-११ या वर्षासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने करार केलेला नाही. ही बाब अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नांच्या स्वरूपात मांडण्यात आली. त्यामुळे शासनाने सदर योजना सुधारितपणे राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ११ जुलै २०११ रोजी नवा शासन निर्णय काढून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यात आली. या योजनेनुसार इयत्ता पहिली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे शासन निर्णय नमुद करण्यात आले. या योजनेनुसार कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात होऊन मृत्यूमुखी पडल्यास त्या विद्यार्थ्यांच्या पालकास ७५ हजार रूपयाचे अनुदान तर अपघातात विद्यार्थ्यांचे दोन अवयव निकामी झाल्यास ५० हजार तसेच एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रूपयाचे अनुदान देण्यात येते. या योजनेचे गडचिरोली जिल्ह्यातही अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यानुसार वर्षभरापूर्वी जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे १४ प्रस्ताव सादर करण्यात आले. जिल्हास्तरीय समितीमध्ये चर्चा होऊन या सर्वप्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सानुग्रह अनुदानाच्या मंजुरीसाठी सर्व प्रस्ताव शिक्षण उपसंचालकाकडे पाठविण्यात आले. मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून केवळ ७५ हजार रूपयाचाच निधी शिक्षण विभागाला प्राप्त झाला. त्यामुळे या योजनेतील एका विद्यार्थ्याच्या पालकास ७५ हजार रूपयाचे अनुदान देण्यात आले. १४ प्रस्तावापैकी फक्त एकच प्रस्ताव मार्गी लावण्यात आला. उर्वरित १३ प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून निधीअभावी प्रलंबित असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.