शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

१३ नक्षलींचा खात्मा; कमांडर-उपकमांडरचा समावेश, सर्वांवर मिळून होते ६० लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 07:39 IST

दीड तास चाललेल्या चकमकीत १३ नक्षलवादी मारले गेले. याशिवाय ४ ते ५ नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यांतर्गत कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैडी जंगल शिवारात पोलीस पथक व नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार चकमक उडाली. यात १३ नक्षलवाद्यांचा  खात्मा करण्यात आला. त्यात ६ पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये १६ लाखांचे बक्षीस असलेल्या कंपनी-४ च्या विभागीय समिती सदस्यासह इतर जहाल नक्षल्यांचा समावेश आहे. यांच्यावर शासनाने ६० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वांत मोठी चकमक ठरली आहे.

तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने पैडी जंगलात नक्षलवादी एकत्र आले होते. हे समजताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, एएसपी (प्रशासन) समीर शेख, एएसपी (अहेरी उपमुख्यालय) सोमय मुंडे आणि एसडीपीओ (अभियान) भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनात सी-६० पथकाने शोधमोहीम सुरू केली. जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार केला. पोलिसांनी शरण येण्याचे केलेले आवाहन नक्षलवाद्यांनी जुमानले नाही. 

तीन वर्षांतील सर्वात मोठी चकमकयापूर्वी २२ आणि २३ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील कसनसूरच्या जंगलात आणि अहेरी तालुक्यातील नैनर परिसरात झालेल्या दोन चकमकींमध्ये ४० नक्षलवादी मारले गेले होते. ती नक्षलविरोधी अभियानातील देशातील सर्वात मोठी चकमक ठरली होती. त्यानंतर अधूनमधून अनेक चकमकी होऊन नक्षलवादी मारलेही गेले. पण एकावेळी १३ नक्षलवादी मारले जाण्याची ही घटना गेल्या तीन वर्षांतील पहिलीच आहे.

‘त्या’ १६ शहीद जवानांना आदरांजलीया कारवाईनंतर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी २००९ मध्ये याच दिवशी (२१ मे) नक्षलवाद्यांनी हिंसक कारवायात १६ पोलीस जवानांचा बळी घेतल्याच्या घटनेला उजाळा दिला. आता त्यांच्या बलिदानाच्या दिवशीच १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले गेल्याने एकप्रकारे त्या शहीद जवानांसाठी ही आदरांजलीच ठरली असल्याचे ते म्हणाले.

एके-४७, स्टेनगन आणि स्फोटकेही जप्तमृत नक्षलवाद्यांजवळून एके-४७ रायफल, ५ नग एसएलआर, स्टेनगन, ३ नग ३०३ रायफल, २ नग ८ एमएम रायफल, एक पिस्टल आणि बऱ्याच प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली. त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरात येणारे साहित्यही घटनास्थळी मिळाले. सर्व मृतदेह गडचिरोलीत आणून आत्मसमर्पित नक्षल्यांच्या माध्यमातून त्यांची ओळख पटविण्यात आली. 

गृहमंत्री-पालकमंत्र्यांकडून कौतुकनक्षलविरोधी अभियानातील पोलिसांच्या या कारवाईचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोलीला भेट देऊन कौतुक केले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून पोलीस दलाच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस