शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

१० वर्षात सिकलसेलचे १२३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:06 IST

पूर्व विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या सिकलसेल आजाराचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातही बरेच आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा आजार अजूनही अपेक्षित प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही.

ठळक मुद्देजनजागृतीवर भर गरजेचा : जिल्ह्यात सद्यस्थितीत २२४९ रुग्ण तर २८ हजार वाहक

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पूर्व विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या सिकलसेल आजाराचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातही बरेच आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा आजार अजूनही अपेक्षित प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही. २००८ ते २०१८ या १० वर्षात गडचिरोली जिल्ह्यात या आजाराने १२३ लोकांचा बळी घेतला आहे. यातील ८ जण यावर्षीच्या ११ महिन्यातील आहेत.दि.११ ते १७ डिसेंबरदरम्यान राज्यभर सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान अनेक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम झाले असले तरी वर्षभर युवा वर्गात या आजाराबाबतची जनजागृती योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे सिकलसेलचे वाहक असणाºया युवक-युवतींमध्ये विवाह होऊन सिकलसेलग्रस्त बाळ जन्माला येत आहे. यावर्षी असे ३९ नवीन सिकलसेल रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. याशिवाय १११३ नवीन वाहक आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिकलसेल वाहकांची संख्या २८ हजार १२५ वर पोहोचली आहे.सिकलसेल आजाराच्या पेशी अनुवंशिक पद्धतीने पुढच्या पिढीत स्थानांतरित होतात. आजाराने ग्रस्त आणि आजाराचे वाहक अशा दोन प्रकारच्या पेशी असणारे लोक आढळतात. यातील रुग्णाला अशक्तपणा येत असल्याने त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. वाहक या प्रकारातील पेशी आढळणाऱ्या व्यक्ती स्वत: आजारी पडत नसली तरी दोन वाहक व्यक्तींमध्ये लग्न झाल्यास (पती-पत्नी) त्यांना होणारे अपत्य या आजाराने ग्रस्त आढळते. हे टाळण्यासाठी आणि आजाराचे वेळीच निदान करण्यासाठी वेळोवेळी रक्तचाचणी केली जाते.आधी सोल्युबिलीटी चाचणी करून त्यात सिकलसेल पॉझिटिव्ह आढळळ्यास इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी करणे गरजेचे असते. परंतू अनेक दिवसांपासून या किटचा पुरवठा न करता सिकलसेल चाचणी व जनजागृतीसाठी राज्यस्तरावरून एचएलएल या कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे.सरकारी यंत्रणेवर सरकारचाच अविश्वासज्या एचएलएल या कंपनीकडे सिकलसेल तपासणीसाठी रक्तनमुने घेण्याचे आणि सर्वत्र जनजागृती करण्याचे काम दिले त्या कंपनीकडे अपुरे मनुष्यबळ आहे. या कंपनीचे स्वयंसेवक रक्तनमुने घेतल्यानंतर स्थानिक स्तरावर तत्काळ निदान होणारी सोल्युबिलीटी चाचणी आधी न करता थेट रक्तनमुने नागपूर येथील आपल्या प्रयोगशाळेत पाठवितात. नंतर त्या नमुन्यांचा अहवाल एकत्रितपणे या कंपनीकडून आरोग्य विभागाला पाठविला जातो. यात अहवाल येण्यास विलंब होतो. वास्तविक जिल्ह्याच्या सरकारी आरोग्य यंत्रणेकडे स्थानिक स्तरावर प्रयोगशाळा आणि मनुष्यबळ असताना त्यांना डावलून खासगी कंपनीकडून केल्या जात असलेल्या या कामावर जास्त विश्वास आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात रक्तपेढींची कमतरतासिकलसेलग्रस्त रुग्णाला वारंवार रक्तपुरवठा करावा लागतो. परंतू जिल्ह्यात तालुकास्तरावर सर्वत्र रक्तपेढींची सुविधा नाही. दुर्गम भागातील रुग्णाला वारंवार रक्त घेण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात येणे शक्य नसल्यामुळे गावातच त्याचा मृत्यू ओढवतो. हे टाळण्यासाठी प्रमुख तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांमध्ये रक्तपेढीची सुविधा देण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य