शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षात सिकलसेलचे १२३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:06 IST

पूर्व विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या सिकलसेल आजाराचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातही बरेच आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा आजार अजूनही अपेक्षित प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही.

ठळक मुद्देजनजागृतीवर भर गरजेचा : जिल्ह्यात सद्यस्थितीत २२४९ रुग्ण तर २८ हजार वाहक

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पूर्व विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या सिकलसेल आजाराचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातही बरेच आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा आजार अजूनही अपेक्षित प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही. २००८ ते २०१८ या १० वर्षात गडचिरोली जिल्ह्यात या आजाराने १२३ लोकांचा बळी घेतला आहे. यातील ८ जण यावर्षीच्या ११ महिन्यातील आहेत.दि.११ ते १७ डिसेंबरदरम्यान राज्यभर सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान अनेक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम झाले असले तरी वर्षभर युवा वर्गात या आजाराबाबतची जनजागृती योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे सिकलसेलचे वाहक असणाºया युवक-युवतींमध्ये विवाह होऊन सिकलसेलग्रस्त बाळ जन्माला येत आहे. यावर्षी असे ३९ नवीन सिकलसेल रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. याशिवाय १११३ नवीन वाहक आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिकलसेल वाहकांची संख्या २८ हजार १२५ वर पोहोचली आहे.सिकलसेल आजाराच्या पेशी अनुवंशिक पद्धतीने पुढच्या पिढीत स्थानांतरित होतात. आजाराने ग्रस्त आणि आजाराचे वाहक अशा दोन प्रकारच्या पेशी असणारे लोक आढळतात. यातील रुग्णाला अशक्तपणा येत असल्याने त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. वाहक या प्रकारातील पेशी आढळणाऱ्या व्यक्ती स्वत: आजारी पडत नसली तरी दोन वाहक व्यक्तींमध्ये लग्न झाल्यास (पती-पत्नी) त्यांना होणारे अपत्य या आजाराने ग्रस्त आढळते. हे टाळण्यासाठी आणि आजाराचे वेळीच निदान करण्यासाठी वेळोवेळी रक्तचाचणी केली जाते.आधी सोल्युबिलीटी चाचणी करून त्यात सिकलसेल पॉझिटिव्ह आढळळ्यास इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी करणे गरजेचे असते. परंतू अनेक दिवसांपासून या किटचा पुरवठा न करता सिकलसेल चाचणी व जनजागृतीसाठी राज्यस्तरावरून एचएलएल या कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे.सरकारी यंत्रणेवर सरकारचाच अविश्वासज्या एचएलएल या कंपनीकडे सिकलसेल तपासणीसाठी रक्तनमुने घेण्याचे आणि सर्वत्र जनजागृती करण्याचे काम दिले त्या कंपनीकडे अपुरे मनुष्यबळ आहे. या कंपनीचे स्वयंसेवक रक्तनमुने घेतल्यानंतर स्थानिक स्तरावर तत्काळ निदान होणारी सोल्युबिलीटी चाचणी आधी न करता थेट रक्तनमुने नागपूर येथील आपल्या प्रयोगशाळेत पाठवितात. नंतर त्या नमुन्यांचा अहवाल एकत्रितपणे या कंपनीकडून आरोग्य विभागाला पाठविला जातो. यात अहवाल येण्यास विलंब होतो. वास्तविक जिल्ह्याच्या सरकारी आरोग्य यंत्रणेकडे स्थानिक स्तरावर प्रयोगशाळा आणि मनुष्यबळ असताना त्यांना डावलून खासगी कंपनीकडून केल्या जात असलेल्या या कामावर जास्त विश्वास आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात रक्तपेढींची कमतरतासिकलसेलग्रस्त रुग्णाला वारंवार रक्तपुरवठा करावा लागतो. परंतू जिल्ह्यात तालुकास्तरावर सर्वत्र रक्तपेढींची सुविधा नाही. दुर्गम भागातील रुग्णाला वारंवार रक्त घेण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात येणे शक्य नसल्यामुळे गावातच त्याचा मृत्यू ओढवतो. हे टाळण्यासाठी प्रमुख तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांमध्ये रक्तपेढीची सुविधा देण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य