शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा तालुक्यातील 12 गावे करणार रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीला आलेला पूर आणि मेडीगड्डा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेला धोका पाहून १२ गावातील नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान पुरात अडकलेल्या अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये असलेली पूरस्थिती मंगळवारीही कायम होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. पोलीस, महसूल यंत्रणा यांनी सकाळी तात्काळ एसडीआरएफ टीमला घटनास्थळी बोलविले. २५ नागरिकांना स्थानिक युवकांच्या मदतीने सुखरूप बाहेर  काढण्यात आले. नागेपल्लीमधील १७ नागरिकांना बोटीने बाहेर काढले. अहेरीतील मुसळधार पावसामुळे दिना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. बोरी, आलापल्ली, मुक्तापूर येथे रस्ता खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वेलगूर येथील मामा तलाव पावसाच्या पाण्याने फुटला होता, त्यानंतर प्रशासनाने दुरूस्ती केली. मात्र पुन्हा मंगळवारी तलाव फुटला. यामध्ये कुठेही जीवीत हानी झालेली नाही.

या गावकऱ्यांना घर सोडावे लागणार-    सिरोंचा तालुक्यातील ज्या १२ गावांमधील नागरिकांना तूर्त घर सोडण्यास सांगितले आहे त्यात सिरोंचा रै. (छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दीकुंठा, जानमपल्ली, मृदुक्रिष्णापूर, आयपेठा रै, सोमनूर माल (अंशतः), नडीकुडा, कोत्तूर रै, असरअल्ली (अंशतः), अंकिसा, कंबालपेठा टोला (अंशत:) या गावांचा समावेश आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित गावात जाऊन नागरिकांना घरे सोडण्यास सांगितले आहे.

आलापल्लीत ३२५ मिमी पाऊसगेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पर्जन्यमानाबाबत रेड अलर्ट देण्यात आला होता. सोमवारी रात्रीपासून मंगळवारच्या सकाळपर्यंत अहेरी तालुक्यातील आलापल्ली महसूल मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल ३२५ मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली. असा पाऊस यापूर्वी कधीच पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या पावसामुळे आलापल्ली मंगळवारी जलमय झाले होते.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर