शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

सिरोंचा तालुक्यातील 12 गावे करणार रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीला आलेला पूर आणि मेडीगड्डा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेला धोका पाहून १२ गावातील नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान पुरात अडकलेल्या अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये असलेली पूरस्थिती मंगळवारीही कायम होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. पोलीस, महसूल यंत्रणा यांनी सकाळी तात्काळ एसडीआरएफ टीमला घटनास्थळी बोलविले. २५ नागरिकांना स्थानिक युवकांच्या मदतीने सुखरूप बाहेर  काढण्यात आले. नागेपल्लीमधील १७ नागरिकांना बोटीने बाहेर काढले. अहेरीतील मुसळधार पावसामुळे दिना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. बोरी, आलापल्ली, मुक्तापूर येथे रस्ता खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वेलगूर येथील मामा तलाव पावसाच्या पाण्याने फुटला होता, त्यानंतर प्रशासनाने दुरूस्ती केली. मात्र पुन्हा मंगळवारी तलाव फुटला. यामध्ये कुठेही जीवीत हानी झालेली नाही.

या गावकऱ्यांना घर सोडावे लागणार-    सिरोंचा तालुक्यातील ज्या १२ गावांमधील नागरिकांना तूर्त घर सोडण्यास सांगितले आहे त्यात सिरोंचा रै. (छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दीकुंठा, जानमपल्ली, मृदुक्रिष्णापूर, आयपेठा रै, सोमनूर माल (अंशतः), नडीकुडा, कोत्तूर रै, असरअल्ली (अंशतः), अंकिसा, कंबालपेठा टोला (अंशत:) या गावांचा समावेश आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित गावात जाऊन नागरिकांना घरे सोडण्यास सांगितले आहे.

आलापल्लीत ३२५ मिमी पाऊसगेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पर्जन्यमानाबाबत रेड अलर्ट देण्यात आला होता. सोमवारी रात्रीपासून मंगळवारच्या सकाळपर्यंत अहेरी तालुक्यातील आलापल्ली महसूल मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल ३२५ मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली. असा पाऊस यापूर्वी कधीच पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या पावसामुळे आलापल्ली मंगळवारी जलमय झाले होते.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर