शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

सिरोंचा तालुक्यातील 12 गावे करणार रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीला आलेला पूर आणि मेडीगड्डा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेला धोका पाहून १२ गावातील नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान पुरात अडकलेल्या अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये असलेली पूरस्थिती मंगळवारीही कायम होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. पोलीस, महसूल यंत्रणा यांनी सकाळी तात्काळ एसडीआरएफ टीमला घटनास्थळी बोलविले. २५ नागरिकांना स्थानिक युवकांच्या मदतीने सुखरूप बाहेर  काढण्यात आले. नागेपल्लीमधील १७ नागरिकांना बोटीने बाहेर काढले. अहेरीतील मुसळधार पावसामुळे दिना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. बोरी, आलापल्ली, मुक्तापूर येथे रस्ता खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वेलगूर येथील मामा तलाव पावसाच्या पाण्याने फुटला होता, त्यानंतर प्रशासनाने दुरूस्ती केली. मात्र पुन्हा मंगळवारी तलाव फुटला. यामध्ये कुठेही जीवीत हानी झालेली नाही.

या गावकऱ्यांना घर सोडावे लागणार-    सिरोंचा तालुक्यातील ज्या १२ गावांमधील नागरिकांना तूर्त घर सोडण्यास सांगितले आहे त्यात सिरोंचा रै. (छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दीकुंठा, जानमपल्ली, मृदुक्रिष्णापूर, आयपेठा रै, सोमनूर माल (अंशतः), नडीकुडा, कोत्तूर रै, असरअल्ली (अंशतः), अंकिसा, कंबालपेठा टोला (अंशत:) या गावांचा समावेश आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित गावात जाऊन नागरिकांना घरे सोडण्यास सांगितले आहे.

आलापल्लीत ३२५ मिमी पाऊसगेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पर्जन्यमानाबाबत रेड अलर्ट देण्यात आला होता. सोमवारी रात्रीपासून मंगळवारच्या सकाळपर्यंत अहेरी तालुक्यातील आलापल्ली महसूल मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल ३२५ मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली. असा पाऊस यापूर्वी कधीच पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या पावसामुळे आलापल्ली मंगळवारी जलमय झाले होते.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर