शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कन्नमवार जलाशयात ११.४७ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST

तालुक्यात एकमेव धरण असलेल्या कन्नमवार जलाशयाने ऑगस्ट २०२० मध्ये पाण्याची २३०.५७ मीटर पातळी गाठली होती. हे धरण १०० टक्के ...

तालुक्यात एकमेव धरण असलेल्या कन्नमवार जलाशयाने ऑगस्ट २०२० मध्ये पाण्याची २३०.५७ मीटर पातळी गाठली होती. हे धरण १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळेच अंदाजे २८ हजार ८०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी खरीप हंगामात ११ हजार हेक्टर शेतजमिनीला सिंचन सुविधांची सोय झाली. उर्वरित शेतीला मामा व इतर गावतलाव, विहिरी, बोड्या आदींच्या साहाय्याने सिंचन झाले. त्यानंतर जलाशयात ५४ टक्के जलसाठा शिल्लक होता.

रबी धान पिकासाठी जलाशयात शिल्लक असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यातून घोट शाखेअंतर्गत येत असलेल्या जंगमपूर मायनरमधील १५० हेक्टर शेतजमिनीला पाणी दिले. त्यानंतर ७ मे रोजी ११.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

(बॉक्स)

१६९ गावतलावांत १५ टक्के पाणीसाठा

- कुनघाडा लघु तलावात २५.४६ टक्के, अनखोडा लघु तलावात १६.१५, तळोधी मामा तलावात ७.५२, घोट मामा तलावात ३६.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद केल्याने तिथेही पाणीसाठा उपलब्ध असून, जिल्हा परिषद सिंचन उपविभागांतर्गत येत असलेल्या तालुक्यातील १६९ गावतलावांत सरासरी १५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

- तालुक्यातील सर्वच तलावांत काही प्रमाणात जलसाठा उपलब्ध असल्याने जनावरांच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. येत्या जून महिन्यापर्यंत पाणी समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या पाणी संकटातून तालुकावासीयांची सुटका झाली आहे.