शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

१०१ शाळांमध्ये वीज पुरवठाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:26 IST

सिरोंचा तालुक्यातील १०१ शाळांमध्ये अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. त्यामुळे शाळा डिजिटल करण्यास अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकून राहावी, तसेच अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी, या दिशेने शाळांनी जास्तीत जास्त डिजिटल साधनांचा वापर करावा, असा आग्रह शिक्षण विभागाकडून भरला जात आहे.

ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यातील विदारक स्थिती । डिजिटल साधने अनेक वर्षांपासून धूळखात

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील १०१ शाळांमध्ये अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. त्यामुळे शाळा डिजिटल करण्यास अडचण निर्माण होत आहे.विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकून राहावी, तसेच अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी, या दिशेने शाळांनी जास्तीत जास्त डिजिटल साधनांचा वापर करावा, असा आग्रह शिक्षण विभागाकडून भरला जात आहे. शिक्षण विभागाने डिजिटल साधने खरेदी करण्यास सक्तीचे केल्यानंतर शिक्षकांनी लोकवर्गणी व स्वत:कडचे पैसे खर्च करून डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र शाळेत वीज नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत.सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये वीज पोहोचली नाही. त्यामुळे संबंधित गावच्या शाळेला विजेचा पुरवठा उपलब्ध झाला नाही. ज्या गावांमध्ये वीज आहे, अशा गावातील शाळांनी वीज पुरवठा घेतला. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांचे वीज बिल भरण्याबाबत शासन आर्थिक तरतूद करीत नसल्याने वीज बिल भरणे कठीण होते. काही शाळांचा वीज विभागाने वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी खरेदी केलेली साहित्य विजेअभावी पडून आहेत.देशातील प्रत्येक घरी वीज पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. गरीब व्यक्तीला वीज बिलात सूट दिली जाते. तसेच अगदी मोफत वीज पुरवठा सुध्दा केला जातो. मात्र भावी पिढीच्या ज्ञानाचे केंद्र असलेल्या शाळांमध्ये अजूनपर्यंत वीज पोहोचली नसल्याचे भयानक वास्तव सिरोंचा तालुक्यात बघायला मिळते.पेसा ग्रामपंचायतीला तेंदूपत्ता, इतर गौणवनोपज, बांबू विक्री करण्याचे अधिकार दिले आहेत. यातून दरवर्षी लाखो रुपयांची रॉयल्टी उपलब्ध होते. या रॉयल्टीमधील काही रक्कम शाळेच्या विकासासाठी खर्च करणे आवश्यक आहे. मात्र ग्रामसभेचे पदाधिकारी यावर खर्च करीत नाही. रॉयल्टीतून मिळालेली रक्कम केवळ गावात नाल्या व रस्ते बांधकामावरच खर्च केली जाते. गावातून केवळ नाल्या व रस्ते बांधणे हे एकमेव विकासाचे माध्यम नाही. मनुष्यबळ विकसीत होणे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. शाळेला वीज उपलब्ध करून देणे व वीज बिल भरणे ही शासनाची जबाबदारी असली तरी शासन जर जबाबदारी झटकत असेल तर ग्रामसभांनी पुढाकार घेऊन वीज पुरवठा करण्यासाठी व वीज बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेण्याची गरज आहे. शाळेत वीज नसल्याने शिक्षण विभाग सुध्दा डिजिटल साधने खरेदी करून त्यांचा वापर करण्यासाठी शिक्षकांना सक्ती करू शकत नसल्याचे दिसून येत आहे.वीज बिल न भरल्याने लावलेले मीटरही काढलेवीज बिल भरण्यासाठी शाळांना स्वतंत्र निधी उपलब्ध होत नाही. लोकवर्गणी तसेच शिक्षकांकडील पैशातून शाळेचे वीज बिल भरावे लागते. कधीकधी अधिकचे वीज बिल आल्यास बिल भरणे शाळेला शक्य होत नाही. त्यावेळी महावितरण संबंधित शाळेचा वीज पुरवठा खंडीत करते. अशा पध्दतीने अनेक शाळांचा वीज पुरवठा सुध्दा खंडीत झाला आहे. एकीकडे शासन प्रत्येक घरी वीज पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळा विजेविना आहेत. याकडे लोकप्रतिनिधी शासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा करून देण्याची गरज आहे.

टॅग्स :electricityवीज