शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

१०० पाळणाघरे सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 01:25 IST

सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची काळजी घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही.

लोकमत विशेषदिलीप दहेलकर गडचिरोलीसहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची काळजी घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे अशी मुले कुपोषीत होण्याची शक्यता असते. सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची काळजी घेऊन सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली ग्रामपंचायतीमार्फत चालू वर्षात जिल्ह्यात १०० पाळणाघरे सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. यासाठी जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाला २६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा पाळणाघरे सुरू होणार आहेत.राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित करून सहा जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गावांमध्ये पाळणाघरे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. कोणती गावे शासनाच्या निधीतून पाळणाघरे सुरू करणार याबाबत संबंधित ग्रामसभेचा ठराव व प्रस्ताव जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाला सादर करणे आवश्यक आहे. पाळणाघर योजना कार्यान्वित करण्यासाठी महिला ग्रामसभेमध्ये सदर विषय घेण्यात यावा, महिा सदस्य व स्थानिक माता यांच्या संयुक्त बैठकीत पाळणाघराची वेळ व जागा निश्चित करावी, असेही शासनाने म्हटले आहे. पाळणाघरासाठी अंगणवाडीत जागा उपलब्ध नसल्यास ग्रामसभेनी इतर उपयुक्त जागेची निवड करावी, मात्र या ठिकाणी शौचालय, पाण्याची सुविधा व स्वयंपाकाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. पाळणाघराचे काम सांभाळण्यासाठी संबंधित गावातील दोन महिलांची निवड करण्यात येणार आहे. या दोन्ही महिलांना प्रती महिना एक हजार ६०० रूपये मानधन मजुरी म्हणून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये रोजगाराच्या कोणत्याही संधी नसल्याने या गावातील मजूर वर्ग बाहेर जिल्ह्यात बाहेर गावांमध्ये कामासाठी जातो. त्यामुळे दिवसभर अशा मजुरांच्या मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने सदर मुले कुपोषीत होतात. कुपोषण समस्येवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा पाळणाघराची योजना कार्यान्वित करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.ग्रा.पं.कडून थकीत अनुदान परत घेणारपाळणाघर चालविण्यासाठी राज्य शासनाकडून मिळालेला निधी जि.प. प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतींना वितरित केला. मात्र काही ग्रामपंचायती पूर्ण कालावधीत पाळणाघरे चालविली नाहीत. अशा ग्रामपंचायतीकडे जवळपास १० लाखांचे अनुदान थकीत आहे. जुने थकीत अनुदान संबंधित ग्रामपंचायतीकडून जि.प. प्रशासन आता परत घेणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. थकीत अनुदान परत केल्याशिवाय या ग्रा.पं.ना चालू वर्षात पाळणाघरे सुरू करता येणार नाही.दीड महिन्यात एकही प्रस्ताव नाहीनव्याने पाळणाघर सुरू करण्यासाठी जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाने एप्रिल महिन्यापासून ग्रामसभांचे ठराव व प्रस्ताव मागितले आहेत. या संदर्भात गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांना व महिलांना माहिती दिली आहे. मात्र दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही महिला व बालकल्याण विभागाला एकाही ग्रामसभेचा ठराव व प्रस्ताव प्राप्त झाला नाही. केवळ १५ पाळणाघरे पूर्णवेळ कार्यान्वितराज्य शासनाच्या निर्णयानंतर २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात मंजूर ९४ पैकी प्रत्यक्षात ८८ पाळणाघरे सुरू करण्यात आली. कोरची, देसाईगंज, गडचिरोली व मुलचेरा आदी चार तालुक्यांत १५ पाळणाघरे दोन वर्षे पूर्णवेळ चालविण्यात आले होते. इतर गावातील पाळणाघरे अल्पावधीतच बंद पडली.