शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

१० टक्के वृक्ष करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:40 IST

चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १० लाख ४४ हजार २३६ वृक्षांची लागवड करण्यात आली होती.

ठळक मुद्दे१० लाख वृक्ष जीवंत : आॅक्टोबर महिन्यात वन विभागातर्फे सर्वेक्षण

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १० लाख ४४ हजार २३६ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. वन विभागाने आॅक्टोबर महिन्यात सर्व्हेक्षण केले असता, सुमारे ९७ हजार १४२ वृक्ष करपली तर ९ लाख ४७ हजार ९४ वृक्ष जीवंत आढळली आहेत. करपलेल्या वृक्षांची टक्केवारी ९.३१ एवढी आहे.विद्यमान शासनाने दरवर्षी कोट्यवधी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जुलै २०१६ मध्ये राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होत. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १५ लाख ४८ हजार ८२९ वृक्षांची लागवड झाली. २०१७ मध्ये राज्यात चार कोटी वृक्ष लागवड झाली. गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १० लाख ४४ हजार २३६ वृक्ष लावण्यात आले.वन विभागाकडे सर्वाधिक जागा व मनुष्यबळ उपलब्ध असल्याने दरवर्षीच वन विभागाला अधिकचे उद्दिष्ट दिले जाते. इतर यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कमी केले तर त्याचा भार वन विभागावर पडतो. त्यामुळे उद्दिष्टामध्ये आणखी वाढ होते.गडचिरोली जिल्ह्यात वनजमिनीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याला अधिकचे उद्दिष्ट दिले जाते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वन विभागाच्या कर्मचाºयांची संख्या सुध्दा गडचिरोली जिल्ह्यात अधिक आहे.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुध्दा अधिक आहे. त्यामुळे जमिनीमध्ये उन्हाळ्यातही ओलावा राहत असल्याने पाणी न देताच वृक्ष जीवंत राहतात. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील जीवंत वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.इतर यंत्रणांचे वृक्ष लागवडीनंतर भुईसपाटवृक्ष लागवडी सप्ताहादरम्यान वन विभागाबरोबरच इतर प्रशासकीय यंत्रणा वृक्षांची लागवड करतात. वृक्ष लागवड होऊन त्याचा फोटो वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर सदर झाडाकडे दुर्लक्ष केले जाते. ज्या यंत्रणांनी झाडे लावली आहेत. त्यापैकी किती झाडे जीवंत आहेत. याची माहिती भरण्यासाठी शासनाने स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. मात्र या सॉफ्टवेअरमध्ये एकही यंत्रणा जीवंत वृक्षांची माहिती भरत नाही. त्यामुळे नेमकी किती वृक्ष जीवंत आहेत, हे कळत नाही. ग्रामपंचायत दरवर्षी त्याच खड्ड्यामध्ये दुसºया वृक्षाची लागवड करते. यावरून किती झाडे जीवंत राहतात. याचा अंदाज येण्यास मदत होते. रस्त्याच्या सभोवतालची झाडे कुंपणाशिवाय जीवंत राहू शकत नाही. याची कल्पना ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. मात्र कठडे करण्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करते. एकंदरीतच इतर यंत्रणांनी लावलेल्या झाडांपैकी निम्मी सुध्दा झाडे जीवंत नसल्याचे दिसून येते. लावलेले वृक्ष जगविण्याची सक्ती करून वन विभागाप्रमाणेच आढावा घेण्याची मागणी होत आहे.मागील वर्षीचे १३ लाख वृक्ष जीवंत२०१६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात वन विभागामार्फत १५ लाख ४८ हजार ८२९ वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यापैकी १२ लाख ५४ हजार ९८१ वृक्ष अजुनही जीवंत आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८१.०२ एवढे आहे. आलापल्ली वन विभागाने ७ लाख ५० हजार ८७ वृक्ष लावले होते. त्यापैकी ५ लाख ३४ हजार ३४३ वृक्ष जीवंत आहेत. भामरागड वन विभागातील ५ हजार ७०० वृक्षांपैकी २ हजार ९५१ वृक्ष जीवंत आहेत. सिरोंचा वन विभागातील २६ हजार ७१४ वृक्षांपैकी २३ हजार ३५९, गडचिरोलीतील २ लाख ११ हजार ४०० वृक्षांपैकी १ लाख ८१ हजार १४१, देसाईगंज वन विभागातील ५ लाख ५४ हजार ९२८ वृक्षांपैकी ५ लाख १३ हजार १८७ वृक्ष जीवंत आहेत.