शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

१० मुलांना शिळ्या अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2015 02:44 IST

तालुक्यातील डोंगरतमाशी येथे शिळे अन्न खाल्ल्याने १० मुलांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी सकाळी

आरमोरी : तालुक्यातील डोंगरतमाशी येथे शिळे अन्न खाल्ल्याने १० मुलांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. प्रकृती ढासळलेल्या १० मुलांना आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वच मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथे रविवारला भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमानिमित्त सार्वजनिक भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. गावकऱ्यांचे जेवन आटोपल्यानंतर उरलेले अन्न मंदिरात ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उरलेले शिळे अन्न गावातील लहान मुलांना देण्यात आले. सदर अन्न खाल्ल्यानंतर १० मुलांना उलट्याचा त्रास जाणवू लागला.विषबाधा झालेल्या १० मुलांमध्ये सोहम गजानन कांबळे (४), विपूर वामन तुमराम (५), तन्मय भावेश कांबळे (४), प्रशांत पोटनाके (१४), मंथन रामदास पेंदाम (६), निखिल विजय जुमनाके (७), साहिल विजय जुमनाके (१०), विवेक एकनाथ तुमराम (६), सानिया अशोक मडावी (९), किशोर माणिक मसराम (१६) सर्व रा. डोंगरतमाशी यांचा समावेश आहे. त्यानंतर गावातील नागरिकांनी प्रकृती ढासळलेल्या १० मुलांना सुरूवातीला वैरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथून आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या सर्व मुलांवर रूग्णालयात उपचार सुरू असून सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पाच वर्षांपूर्वी वैरागडनजीकच्या लोहारा जि.प. शाळेतील मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली होती. या प्रकरणी या शाळेच्या मुख्याध्यापकावर जि.प. प्रशासनाने कारवाई केली होती. (वार्ताहर)