शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 11:34 IST

आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे.

मुंबई - आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. एखाद्या खेळाप्रती असलेल्या जनसामान्य आणि खेळाडूंच्या भावना लक्षात घेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल संघाला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पात्रता असूनही अनेक खेळाडूंना किंवा संघांना केवळ नियमांची पुर्तता करू शकत नसल्यामुळे आशियाई स्पर्धेत खेळता येत नव्हते. यापूर्वीही असे अनेक प्रसंग घडले आहेत. आयओएने पाठवलेल्या अंतिम यादीवर क्रीडा मंत्रालय शिक्कामोर्तब करत होते, असे मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. काय आहे पत्रात वाचा...

पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठीचा चमू जाहीर केल्यापासून आयओएवर टीका सुरूच आहे. त्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयओएविरोधात उघडउघड बंड पुकारले आहे. भारताच्या पुरूष व महिला फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूतून डावलल्यानंतर महासंघाने आयओएवर दूरदृष्टी नसलेले आणि अकार्यक्षम, अशी टीका केली होती. त्यावर जागतिक क्रमवारीत भारतीय संघ अव्वल आठमध्ये नसल्याचे कारण देत आयओएने संघ पाठवता येणार नसल्याचा नियम सांगितला होता. पण, क्रीडा मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रानंतर फुटबॉल संघाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा