शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

आशिया चषक पात्रता मिळवणे महत्त्वाचे नाही तर सलग नऊ विजयांना अर्थ नाही राहणार -  कॉन्स्टेन्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:42 IST

जर आशिया चषक स्पर्धेची पात्रता फेरी पार करण्यात यश आले नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयाला काहीच महत्त्व राहणार नाही, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले.

 मुंबई : जर आशिया चषक स्पर्धेची पात्रता फेरी पार करण्यात यश आले नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयाला काहीच महत्त्व राहणार नाही, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले. शनिवारी मुंबईत झालेल्या मॉरिशसविरुद्धच्या सामन्यात २-१ असा विजय मिळविल्यानंतर कॉन्स्टेन्टाइन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कॉन्स्टेन्टाइन यांनी सांगितले, ‘जर आम्ही आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरलो नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयी कामगिरीला काहीच महत्त्व राहणार नाही. तरी, या ऐतिहासिक कामगिरीचा मला अभिमान आहे. मात्र, जर आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरलो नाही, तर १०, ११ किंवा १२ विजय मिळवण्याला अर्थ काय राहणार?’कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले, ‘काही विक्रम बनले आहेत आणि ते खूप चांगले आहेत. विजय मिळवणे महत्त्वपूर्ण आहेत आणि हे सातत्य कायम राखण्यास आम्ही इच्छुक आहोत. आम्हाला विजय मिळवून पात्रता मिळवावी लागेल.’त्याचवेळी, मॉरिशसविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्रात भारताचा खेळ निराशाजनक झाला. याबाबत कॉन्स्टेन्टाइन म्हणाले, ‘ज्या प्रकारे संघ पहिल्या सत्रात खेळला, ते मला आवडले नाही. प्रतिस्पर्धी संघाला चांगल्या सुरुवातीची संधी दिली गेली तेव्हा मी नाराज होतो. परंतु, भारतीय कर्णधाराने सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळली.

टॅग्स :Indiaभारत