शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाला ‘एक्पोजर ट्रीप’ची गरज; माजी गोलरक्षक ब्रम्हानंद शंखवाळकर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 19:20 IST

एएफसी चषकात भारतीय फुटबॉल संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय फुटबॉलचा स्तरही उंचावत आहे. परंतु, भारताने केवळ पाकिस्तान, श्रीलंका, मालदिव, बांगलादेश या आशियाई देशांबरोबर खेळून चालणार नाही.

- सचिन कोरडे

पणजी - एएफसी चषकात भारतीयफुटबॉल संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीयफुटबॉलचा स्तरही उंचावत आहे. परंतु, भारताने केवळ पाकिस्तान, श्रीलंका, मालदिव, बांगलादेश या आशियाई देशांबरोबर खेळून चालणार नाही. त्यांना ‘एक्स्पोजर ट्रीप’ची गरज आहे. जपान, कोरिया, कतार आणि युएई अशा देशांसोबत भारतीय संघाचे अधिक सामने व्हायला हवेत, असे मत भारताचे माजी गोलरक्षक तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त ब्रम्हानंद शंखावाळकर यांनी व्यक्त केले.पणजीतील स्पोटर््स अ‍ॅण्ड वेलनेस स्पाच्या उद्घाटन प्रसंगी ब्रम्हानंद प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तेव्हा त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ते म्हणाले भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. खेळाडूंचा स्तरही उंचावला आहे. विदेशातील प्रशिक्षणाचा त्यांना फायदा झालेला आहे. परंतु, भारतीय संघाला दुसºया खंडातील देशांविरुद्ध खेळायला हवे.   आपण केवळ त्याच त्या संघाविरुद्ध खेळून चालणार नाही. त्याचा विरोधी संघांना फायदा होईल, आपणास नाही.भारतीय कर्णधार सुनील छेत्री आणि स्पेनचा लियोनेल मेस्सी या दोघांमध्ये तुलना करणे योग्य नाही. सुनील हा निश्चितपणे गुणवान भारताचा नंबर वन खेळाडू आहे.  त्याचा मी आदर करतो पण मेस्सीसोबत त्याची तुलना करणे योग्य नाही. स्पॅनिश फुटबॉलचा दर्जा आणि स्तर खूप उंचीवर आहे. त्याची भारतीय फुटबॉलसोबत तुलना करणे योग्य होणार नाही. सुनील इंग्लंड, पोतुगाल आणि अमेरिकेच्या ब स्तरावरील क्लबकडून खेळला तर त्याला पाच-सहा गोल नोंदवता येणार नाहीत. त्यांचा स्तर फार वेगळा आहे. आय-लीगचे विलिनीकरण अशक्यआय-लीगचे आयएसलमध्ये विलिनीकरण करण्याची गोष्ट पुढे आली होती. मात्र ती प्रत्यक्षात होणार नाही. आय-लीगचा फार्मेट आणि आयएसलएलच्या वेगळा आहे. आयलीगला प्रेक्षकांची गर्दी कमी असते हे मान्य जरी असले तरी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला विलिनीकरण करणे अशक्य असे आहे. प्रशिक्षकांवर ‘नो कोमेंट’भारतीय प्रशिक्षक स्टेफन कॉस्टटाईन यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा एआयएफएफने अजून मंजूर केलेला नाही. एएफसी चषकात भारतीय संघ बहरिनकडून पराभूत झाला. हा पराभव भारतीय प्रशिक्षकांना पचवता आला नाही. या प्रदर्शनावर नाराज होत कॉस्टटाईन यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर ब्रम्हानंद यांनी बोलणे टाळले.  त्यानी पदावर राहावे किंवा नाही हा निर्णय त्यांचा आहे. असे ब्रम्हानंद म्हणाले.   आयएसलमधील भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय संघात अजूनही संधी मिळत नाही? याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारतीय संघ हा केवळ पाच-सहा जणांचा नसतो. या संघाची निवड फेडरेशनही करीत नाही किंवा मॅनेजमेंटही करीत नाही. प्रशिक्षकावरही ही जबाबदारी असते. तोच संघ निवडतो. त्याच्या नजरेत जो खेळाडू योग्य असेल त्याला संधी मिळते.

टॅग्स :IndiaभारतFootballफुटबॉल