शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

भारतीय संघाला ‘एक्पोजर ट्रीप’ची गरज; माजी गोलरक्षक ब्रम्हानंद शंखवाळकर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 19:20 IST

एएफसी चषकात भारतीय फुटबॉल संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय फुटबॉलचा स्तरही उंचावत आहे. परंतु, भारताने केवळ पाकिस्तान, श्रीलंका, मालदिव, बांगलादेश या आशियाई देशांबरोबर खेळून चालणार नाही.

- सचिन कोरडे

पणजी - एएफसी चषकात भारतीयफुटबॉल संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीयफुटबॉलचा स्तरही उंचावत आहे. परंतु, भारताने केवळ पाकिस्तान, श्रीलंका, मालदिव, बांगलादेश या आशियाई देशांबरोबर खेळून चालणार नाही. त्यांना ‘एक्स्पोजर ट्रीप’ची गरज आहे. जपान, कोरिया, कतार आणि युएई अशा देशांसोबत भारतीय संघाचे अधिक सामने व्हायला हवेत, असे मत भारताचे माजी गोलरक्षक तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त ब्रम्हानंद शंखावाळकर यांनी व्यक्त केले.पणजीतील स्पोटर््स अ‍ॅण्ड वेलनेस स्पाच्या उद्घाटन प्रसंगी ब्रम्हानंद प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तेव्हा त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ते म्हणाले भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. खेळाडूंचा स्तरही उंचावला आहे. विदेशातील प्रशिक्षणाचा त्यांना फायदा झालेला आहे. परंतु, भारतीय संघाला दुसºया खंडातील देशांविरुद्ध खेळायला हवे.   आपण केवळ त्याच त्या संघाविरुद्ध खेळून चालणार नाही. त्याचा विरोधी संघांना फायदा होईल, आपणास नाही.भारतीय कर्णधार सुनील छेत्री आणि स्पेनचा लियोनेल मेस्सी या दोघांमध्ये तुलना करणे योग्य नाही. सुनील हा निश्चितपणे गुणवान भारताचा नंबर वन खेळाडू आहे.  त्याचा मी आदर करतो पण मेस्सीसोबत त्याची तुलना करणे योग्य नाही. स्पॅनिश फुटबॉलचा दर्जा आणि स्तर खूप उंचीवर आहे. त्याची भारतीय फुटबॉलसोबत तुलना करणे योग्य होणार नाही. सुनील इंग्लंड, पोतुगाल आणि अमेरिकेच्या ब स्तरावरील क्लबकडून खेळला तर त्याला पाच-सहा गोल नोंदवता येणार नाहीत. त्यांचा स्तर फार वेगळा आहे. आय-लीगचे विलिनीकरण अशक्यआय-लीगचे आयएसलमध्ये विलिनीकरण करण्याची गोष्ट पुढे आली होती. मात्र ती प्रत्यक्षात होणार नाही. आय-लीगचा फार्मेट आणि आयएसलएलच्या वेगळा आहे. आयलीगला प्रेक्षकांची गर्दी कमी असते हे मान्य जरी असले तरी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला विलिनीकरण करणे अशक्य असे आहे. प्रशिक्षकांवर ‘नो कोमेंट’भारतीय प्रशिक्षक स्टेफन कॉस्टटाईन यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा एआयएफएफने अजून मंजूर केलेला नाही. एएफसी चषकात भारतीय संघ बहरिनकडून पराभूत झाला. हा पराभव भारतीय प्रशिक्षकांना पचवता आला नाही. या प्रदर्शनावर नाराज होत कॉस्टटाईन यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर ब्रम्हानंद यांनी बोलणे टाळले.  त्यानी पदावर राहावे किंवा नाही हा निर्णय त्यांचा आहे. असे ब्रम्हानंद म्हणाले.   आयएसलमधील भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय संघात अजूनही संधी मिळत नाही? याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारतीय संघ हा केवळ पाच-सहा जणांचा नसतो. या संघाची निवड फेडरेशनही करीत नाही किंवा मॅनेजमेंटही करीत नाही. प्रशिक्षकावरही ही जबाबदारी असते. तोच संघ निवडतो. त्याच्या नजरेत जो खेळाडू योग्य असेल त्याला संधी मिळते.

टॅग्स :IndiaभारतFootballफुटबॉल