शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

फिफा विश्वचषक पात्रता: भारतीय संघाकडे मुख्य स्पर्धा पात्रतेची अखेरची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:34 IST

ओमनाविरुद्ध आज ‘करा किंवा मरा’ लढत; प्रशिक्षकांना अनपेक्षित विजयाची अपेक्षा

मस्कत: चारपैकी तीन सामने अनिर्णीत राखून ‘ई’गटातील चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत मंगळवारी बलाढ्य ओमानविरुद्ध ‘करा किंवा मरा’अशा निर्धारासह खेळण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी भारतीय खेळाडू अनपेक्षित विजयाची नोंद करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.गुवाहाटीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात पूर्वार्धात सुनील छेत्री यानो गोल करत भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण अखेरच्या दहा मिनिटात ओमान संघाने दोन गोल नोंदवून अपेक्षांवर पाणी फेरले होते. १४ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध ओमानने ४-१ असा शानदार विजय साजरा केला. भारताने मात्र आशियाई चॅम्पियन कतारविरुद्धची लढत गोलशून्य अशी बरोबरीत सोडविल्यानंतर रँकिंगमध्ये तळाच्या स्थानी असलेल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध बरोबरीवरच समाधान मानले होते. तीन ड्रॉ तसेच एक पराभवामुळे भारतीय संघा तीन गुणांसह चौथ्या, तर ओमान संघ चार सामन्यात नऊ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. अव्वल स्थानी असलेल्या कतारचे दहा गुण आहेत. ओमनविरुद्ध विजय मिळाला नाही तर भारतीय संघ २०२२च्या विश्वचषक पात्रता फेरीतून बाद होईल.भारताला २६ मार्च रोजी कतारविरुद्ध, बांगलादेशवरुद्ध ४ जून आणि अफगाणिस्तानविरुद्ध ९ जून रोजी सामने खेळायचे आहेत. ओमनाविरुद्ध भारताला किमान एक गुण मिळविणे क्रमप्राप्त झाले आहे. यामुळे २०२३ च्या आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसºया टप्यात स्थान मिळविणे सोपे होईल. ही २०२३ च्या आशियाई चषक पात्रता फेरीसाठी देखील संयुक्त पात्रता स्पर्धाही आहे. आठही गटातील तिसºया स्थानावरील संघ तसेच चौथ्या स्थानावरील उत्कृष्ट चार संघ आशियाई चषक पात्रता फेरीया तिसऱ्या टप्प्यात धडक देतील.भारतीय संघ आता केवळ छेत्रीच्या खेळावर विसंबून नाही. प्रशिक्षक स्टिमक म्हणाले,‘ गुवाहाटी येथे ज्या ओमनविरुद्ध आम्ही खेळलो त्यापेक्षा सध्याचा संघ कैकपटींनी सरस वाटतो. यजमान संघ प्रबळ दावेदार वाटतो तर आमच्यासाठी कठीण अशी लढत असेल.’ (वृत्तसंस्था)ओमानविरुद्ध विजय मिळवण्याचे लक्ष्य - सुनील छेत्री‘भारताची नजर बदला घेण्यावर नसून पूर्ण गुण वसूल करण्यावर केंद्रित झाली आहे,’ असे मत भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले. भारताला सप्टेंबरमध्ये गुवाहाटी येथे ओमानविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. छेत्री म्हणाला, ‘आम्ही वचपा काढण्याचा विचार करीत नाही. अखेर गुण महत्त्वाचे ठरतात. आमच्या डोक्यात एकच बाब आहे, मैदानात उतरा व सर्वोत्तम प्रयत्न करुन निकाल मिळवा.’ ओमानचा स्ट्रायकर अल मंधारने पात्रता फेरीच्या चार सामन्यांत यापूर्वीच चार गोल केले आहेत, पण प्रीतम कोटलच्या मते संघ सकारात्मक निकाल मिळवण्यात यशस्वी ठरेल. कोटल म्हणाला,‘केवळ अल मंधारच नाही, अल अलवाई, अल घसानी हे स्ट्रायकर बचाव फळीसाठी धोकादायक ठरू शकतात. ते वेगवान असून वेगाने आपले स्थान बदलतात व लांब अंतरावरुन गोल करू शकतात. त्यांच्या दूरवरच्या फटक्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल.’भारतीय फुटबॉल संघगुरप्रीतसिंग संधू, अमरिंदरसिंग, धीरजसिंग, प्रीतम कोताल, निशु कुमार, राहुल भेके, नरेंदर, आदिल खान, सार्थक गोलुई, सुभाशीष बोस, मंदार राव देसाई, उदांतासिंग, जॅकीचंदसिंग, सेमिनलेन डाऊंगेल, रेनियर फर्नांडिस, विनित राय, सहल अब्दुल समद, प्रणय हलधर, अनिरूद्ध थापा, लालियांजुआला छांगटे, ब्रेंडन फर्नांडिस, आशिक कुरूनियान, सुनील छेत्री, मनवीरसिंग आणि फारुक चौधरी.