शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

फिफा विश्वचषक पात्रता: भारतीय संघाकडे मुख्य स्पर्धा पात्रतेची अखेरची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:34 IST

ओमनाविरुद्ध आज ‘करा किंवा मरा’ लढत; प्रशिक्षकांना अनपेक्षित विजयाची अपेक्षा

मस्कत: चारपैकी तीन सामने अनिर्णीत राखून ‘ई’गटातील चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत मंगळवारी बलाढ्य ओमानविरुद्ध ‘करा किंवा मरा’अशा निर्धारासह खेळण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी भारतीय खेळाडू अनपेक्षित विजयाची नोंद करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.गुवाहाटीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात पूर्वार्धात सुनील छेत्री यानो गोल करत भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण अखेरच्या दहा मिनिटात ओमान संघाने दोन गोल नोंदवून अपेक्षांवर पाणी फेरले होते. १४ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध ओमानने ४-१ असा शानदार विजय साजरा केला. भारताने मात्र आशियाई चॅम्पियन कतारविरुद्धची लढत गोलशून्य अशी बरोबरीत सोडविल्यानंतर रँकिंगमध्ये तळाच्या स्थानी असलेल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध बरोबरीवरच समाधान मानले होते. तीन ड्रॉ तसेच एक पराभवामुळे भारतीय संघा तीन गुणांसह चौथ्या, तर ओमान संघ चार सामन्यात नऊ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. अव्वल स्थानी असलेल्या कतारचे दहा गुण आहेत. ओमनविरुद्ध विजय मिळाला नाही तर भारतीय संघ २०२२च्या विश्वचषक पात्रता फेरीतून बाद होईल.भारताला २६ मार्च रोजी कतारविरुद्ध, बांगलादेशवरुद्ध ४ जून आणि अफगाणिस्तानविरुद्ध ९ जून रोजी सामने खेळायचे आहेत. ओमनाविरुद्ध भारताला किमान एक गुण मिळविणे क्रमप्राप्त झाले आहे. यामुळे २०२३ च्या आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसºया टप्यात स्थान मिळविणे सोपे होईल. ही २०२३ च्या आशियाई चषक पात्रता फेरीसाठी देखील संयुक्त पात्रता स्पर्धाही आहे. आठही गटातील तिसºया स्थानावरील संघ तसेच चौथ्या स्थानावरील उत्कृष्ट चार संघ आशियाई चषक पात्रता फेरीया तिसऱ्या टप्प्यात धडक देतील.भारतीय संघ आता केवळ छेत्रीच्या खेळावर विसंबून नाही. प्रशिक्षक स्टिमक म्हणाले,‘ गुवाहाटी येथे ज्या ओमनविरुद्ध आम्ही खेळलो त्यापेक्षा सध्याचा संघ कैकपटींनी सरस वाटतो. यजमान संघ प्रबळ दावेदार वाटतो तर आमच्यासाठी कठीण अशी लढत असेल.’ (वृत्तसंस्था)ओमानविरुद्ध विजय मिळवण्याचे लक्ष्य - सुनील छेत्री‘भारताची नजर बदला घेण्यावर नसून पूर्ण गुण वसूल करण्यावर केंद्रित झाली आहे,’ असे मत भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले. भारताला सप्टेंबरमध्ये गुवाहाटी येथे ओमानविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. छेत्री म्हणाला, ‘आम्ही वचपा काढण्याचा विचार करीत नाही. अखेर गुण महत्त्वाचे ठरतात. आमच्या डोक्यात एकच बाब आहे, मैदानात उतरा व सर्वोत्तम प्रयत्न करुन निकाल मिळवा.’ ओमानचा स्ट्रायकर अल मंधारने पात्रता फेरीच्या चार सामन्यांत यापूर्वीच चार गोल केले आहेत, पण प्रीतम कोटलच्या मते संघ सकारात्मक निकाल मिळवण्यात यशस्वी ठरेल. कोटल म्हणाला,‘केवळ अल मंधारच नाही, अल अलवाई, अल घसानी हे स्ट्रायकर बचाव फळीसाठी धोकादायक ठरू शकतात. ते वेगवान असून वेगाने आपले स्थान बदलतात व लांब अंतरावरुन गोल करू शकतात. त्यांच्या दूरवरच्या फटक्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल.’भारतीय फुटबॉल संघगुरप्रीतसिंग संधू, अमरिंदरसिंग, धीरजसिंग, प्रीतम कोताल, निशु कुमार, राहुल भेके, नरेंदर, आदिल खान, सार्थक गोलुई, सुभाशीष बोस, मंदार राव देसाई, उदांतासिंग, जॅकीचंदसिंग, सेमिनलेन डाऊंगेल, रेनियर फर्नांडिस, विनित राय, सहल अब्दुल समद, प्रणय हलधर, अनिरूद्ध थापा, लालियांजुआला छांगटे, ब्रेंडन फर्नांडिस, आशिक कुरूनियान, सुनील छेत्री, मनवीरसिंग आणि फारुक चौधरी.