शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
4
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
5
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
6
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
7
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
8
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
9
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
10
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
11
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
12
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
13
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
14
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
15
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
16
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
17
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
18
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
19
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
20
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup 2018 : भारत विश्व स्पर्धेत नाही याचेच दु:ख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:15 IST

फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता जगभर शिगेला पोहचली आहे. सर्वच क्रीडाप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ वाचकांसाठी लिहिताहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजीत दळवी थेट मॉस्कोहून....

- रणजीत दळवीपाऊस काही पिच्छा सोडण्यास तयार नाही. मुंबईहून मॉस्कोला निघताना मुसळधार पावसामुळे एअरबस लॅण्ड होऊ न शकल्याने पहाटे चारच्या फ्लाइटने चक्क सहा तास उशीराने टेक आॅफ केले. यामुळे पुढची कनेक्टींग फ्लाइटही चुकली. साधारणपणे २६ तासांच्या प्रवासानंतर मॉस्को गाठले आणि तेथेही पावसानेच स्वागत केले. रात्रीदहा वाजताही उजेड होता, जणूकाही सातच वाजले होते. मात्रऐन उन्हाळ्यातही गारठा चांगलाच होता.टॅक्सीचालकाने आमची स्थिती पाहिली आणि हीटर सुरु केला. त्याने लगेच विचारले, ‘फुटबॉल? वर्ल्डकप?’ यावर मी हातवारे करत त्याला उत्तर दिले. येथे इंग्रजी जवळजवळ बोललेच जात नाही. त्यामुळे हातवारे, भावमुद्रा हीच काय ती संपर्क साधण्याची भाषा. खेळाडू, रेफ्री, दूरदर्शनवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत समालोचन असा माझा आजवरचा प्रवास. मुंबई फुटबॉलच्या अव्वल साखळीत रेफ्री म्हणून दशकभराचा अनुभव आहे. पण एक शल्य सतत वाटते. विश्वचषक स्पर्धेत माझा भारत देश नाही.होय, १९४८ लंडन, १९५२ हेलसिंकी, १९५६ मेलबर्न आणि १०६० रोम या आॅलिम्पिकमध्ये खेळलेला माझा भारत. १९५१ दिल्ली, १९६२ जकार्ता आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेता माझा भारत. कोलकात्यामध्ये १९८०-९० च्या दशकात मोहन बागान, इस्ट बंगाल, मॉहमेडन स्पोर्टिंग यांच्यातील लढतींना लाखाच्या आसपास गर्दी खेचणारा माझा भारत. गोवा - मुंबई केरळ येथे फुटबॉलसाठी प्रचंड गर्दी करणारा माझा भारत. कोलकात्यात फुटबॉलमध्ये दंगली घडणारा भारत. आज त्या खेळाला आम्ही विसरलो. मुंबईत चार देशांची स्पर्धा भरते आणि आपला शंभरावा सामना खेळणारा कर्णधार सुनील छेत्री ही लढत पाहण्यासाठी या, अशी आर्जव एका व्हिडिओ द्वारे करतो, हे आपल्याला भूषणावह आहे?मुंबईचा फुटबॉल वाढला, पण दर्जा मात्र खालावला. १९८०-९० च्या दशकातील येथल्या प्रशासकांचे वाद, संघटनात्मक सुंदोपसुंदीने अनेकांची कारकिर्द संपुष्टात आली. माझ्यासारख्या डझनभर रेफ्रींनाही याची झळ पोहचली. फिफा रेफ्री होऊन विश्वचषकात काम करणे ही प्रेरणा आमचे गुरु, फिफा रेफ्री आणि देशातील एकमेव फिफा रेफ्रीज इन्स्ट्रक्टर अ‍ॅलेक्स वाझ यांनीदिली होती. पण त्यांनाही या विकोपाला गेलेल्या वादाचा फटका बसला.एका अंतिम लढतीत खेळाडूने हल्ला केल्यानंतर मी त्याला रेड कार्ड दाखविले. पुढे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. अनेकवेळा प्रशासकांनी त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहूनही आम्हाला संरक्षण दिले नाही. जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. शेवटी ठरविले, बस्स,आता पुरे! माझ्यासारखे अनेकजण आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, रेफ्री ज्यांनी निराश होऊन खेळाला ‘रामराम’ केला. नाराजी - राग त्या खेळावर नाही. रोष आहे, तो भारतीय फुटबॉल व्यवस्थेवर. ती जर ठीक असती, तर ‘माझा भारत’ विश्वचषकामध्ये दिसला असता. तो नाही याचे अतीव दु:ख आहे, ते देशातील करोडो फुटबॉलप्रेमींना!

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलIndiaभारत