शहरं
Join us  
Trending Stories
1
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
2
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
3
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
6
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
7
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
8
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
9
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
10
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
11
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
12
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
13
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
14
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
15
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
16
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
17
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
18
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
19
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
20
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा

Fifa World Cup 2018 : भारत विश्व स्पर्धेत नाही याचेच दु:ख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:15 IST

फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता जगभर शिगेला पोहचली आहे. सर्वच क्रीडाप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ वाचकांसाठी लिहिताहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजीत दळवी थेट मॉस्कोहून....

- रणजीत दळवीपाऊस काही पिच्छा सोडण्यास तयार नाही. मुंबईहून मॉस्कोला निघताना मुसळधार पावसामुळे एअरबस लॅण्ड होऊ न शकल्याने पहाटे चारच्या फ्लाइटने चक्क सहा तास उशीराने टेक आॅफ केले. यामुळे पुढची कनेक्टींग फ्लाइटही चुकली. साधारणपणे २६ तासांच्या प्रवासानंतर मॉस्को गाठले आणि तेथेही पावसानेच स्वागत केले. रात्रीदहा वाजताही उजेड होता, जणूकाही सातच वाजले होते. मात्रऐन उन्हाळ्यातही गारठा चांगलाच होता.टॅक्सीचालकाने आमची स्थिती पाहिली आणि हीटर सुरु केला. त्याने लगेच विचारले, ‘फुटबॉल? वर्ल्डकप?’ यावर मी हातवारे करत त्याला उत्तर दिले. येथे इंग्रजी जवळजवळ बोललेच जात नाही. त्यामुळे हातवारे, भावमुद्रा हीच काय ती संपर्क साधण्याची भाषा. खेळाडू, रेफ्री, दूरदर्शनवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत समालोचन असा माझा आजवरचा प्रवास. मुंबई फुटबॉलच्या अव्वल साखळीत रेफ्री म्हणून दशकभराचा अनुभव आहे. पण एक शल्य सतत वाटते. विश्वचषक स्पर्धेत माझा भारत देश नाही.होय, १९४८ लंडन, १९५२ हेलसिंकी, १९५६ मेलबर्न आणि १०६० रोम या आॅलिम्पिकमध्ये खेळलेला माझा भारत. १९५१ दिल्ली, १९६२ जकार्ता आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेता माझा भारत. कोलकात्यामध्ये १९८०-९० च्या दशकात मोहन बागान, इस्ट बंगाल, मॉहमेडन स्पोर्टिंग यांच्यातील लढतींना लाखाच्या आसपास गर्दी खेचणारा माझा भारत. गोवा - मुंबई केरळ येथे फुटबॉलसाठी प्रचंड गर्दी करणारा माझा भारत. कोलकात्यात फुटबॉलमध्ये दंगली घडणारा भारत. आज त्या खेळाला आम्ही विसरलो. मुंबईत चार देशांची स्पर्धा भरते आणि आपला शंभरावा सामना खेळणारा कर्णधार सुनील छेत्री ही लढत पाहण्यासाठी या, अशी आर्जव एका व्हिडिओ द्वारे करतो, हे आपल्याला भूषणावह आहे?मुंबईचा फुटबॉल वाढला, पण दर्जा मात्र खालावला. १९८०-९० च्या दशकातील येथल्या प्रशासकांचे वाद, संघटनात्मक सुंदोपसुंदीने अनेकांची कारकिर्द संपुष्टात आली. माझ्यासारख्या डझनभर रेफ्रींनाही याची झळ पोहचली. फिफा रेफ्री होऊन विश्वचषकात काम करणे ही प्रेरणा आमचे गुरु, फिफा रेफ्री आणि देशातील एकमेव फिफा रेफ्रीज इन्स्ट्रक्टर अ‍ॅलेक्स वाझ यांनीदिली होती. पण त्यांनाही या विकोपाला गेलेल्या वादाचा फटका बसला.एका अंतिम लढतीत खेळाडूने हल्ला केल्यानंतर मी त्याला रेड कार्ड दाखविले. पुढे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. अनेकवेळा प्रशासकांनी त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहूनही आम्हाला संरक्षण दिले नाही. जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. शेवटी ठरविले, बस्स,आता पुरे! माझ्यासारखे अनेकजण आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, रेफ्री ज्यांनी निराश होऊन खेळाला ‘रामराम’ केला. नाराजी - राग त्या खेळावर नाही. रोष आहे, तो भारतीय फुटबॉल व्यवस्थेवर. ती जर ठीक असती, तर ‘माझा भारत’ विश्वचषकामध्ये दिसला असता. तो नाही याचे अतीव दु:ख आहे, ते देशातील करोडो फुटबॉलप्रेमींना!

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलIndiaभारत