शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup 2018 : भारत विश्व स्पर्धेत नाही याचेच दु:ख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:15 IST

फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता जगभर शिगेला पोहचली आहे. सर्वच क्रीडाप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ वाचकांसाठी लिहिताहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजीत दळवी थेट मॉस्कोहून....

- रणजीत दळवीपाऊस काही पिच्छा सोडण्यास तयार नाही. मुंबईहून मॉस्कोला निघताना मुसळधार पावसामुळे एअरबस लॅण्ड होऊ न शकल्याने पहाटे चारच्या फ्लाइटने चक्क सहा तास उशीराने टेक आॅफ केले. यामुळे पुढची कनेक्टींग फ्लाइटही चुकली. साधारणपणे २६ तासांच्या प्रवासानंतर मॉस्को गाठले आणि तेथेही पावसानेच स्वागत केले. रात्रीदहा वाजताही उजेड होता, जणूकाही सातच वाजले होते. मात्रऐन उन्हाळ्यातही गारठा चांगलाच होता.टॅक्सीचालकाने आमची स्थिती पाहिली आणि हीटर सुरु केला. त्याने लगेच विचारले, ‘फुटबॉल? वर्ल्डकप?’ यावर मी हातवारे करत त्याला उत्तर दिले. येथे इंग्रजी जवळजवळ बोललेच जात नाही. त्यामुळे हातवारे, भावमुद्रा हीच काय ती संपर्क साधण्याची भाषा. खेळाडू, रेफ्री, दूरदर्शनवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत समालोचन असा माझा आजवरचा प्रवास. मुंबई फुटबॉलच्या अव्वल साखळीत रेफ्री म्हणून दशकभराचा अनुभव आहे. पण एक शल्य सतत वाटते. विश्वचषक स्पर्धेत माझा भारत देश नाही.होय, १९४८ लंडन, १९५२ हेलसिंकी, १९५६ मेलबर्न आणि १०६० रोम या आॅलिम्पिकमध्ये खेळलेला माझा भारत. १९५१ दिल्ली, १९६२ जकार्ता आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेता माझा भारत. कोलकात्यामध्ये १९८०-९० च्या दशकात मोहन बागान, इस्ट बंगाल, मॉहमेडन स्पोर्टिंग यांच्यातील लढतींना लाखाच्या आसपास गर्दी खेचणारा माझा भारत. गोवा - मुंबई केरळ येथे फुटबॉलसाठी प्रचंड गर्दी करणारा माझा भारत. कोलकात्यात फुटबॉलमध्ये दंगली घडणारा भारत. आज त्या खेळाला आम्ही विसरलो. मुंबईत चार देशांची स्पर्धा भरते आणि आपला शंभरावा सामना खेळणारा कर्णधार सुनील छेत्री ही लढत पाहण्यासाठी या, अशी आर्जव एका व्हिडिओ द्वारे करतो, हे आपल्याला भूषणावह आहे?मुंबईचा फुटबॉल वाढला, पण दर्जा मात्र खालावला. १९८०-९० च्या दशकातील येथल्या प्रशासकांचे वाद, संघटनात्मक सुंदोपसुंदीने अनेकांची कारकिर्द संपुष्टात आली. माझ्यासारख्या डझनभर रेफ्रींनाही याची झळ पोहचली. फिफा रेफ्री होऊन विश्वचषकात काम करणे ही प्रेरणा आमचे गुरु, फिफा रेफ्री आणि देशातील एकमेव फिफा रेफ्रीज इन्स्ट्रक्टर अ‍ॅलेक्स वाझ यांनीदिली होती. पण त्यांनाही या विकोपाला गेलेल्या वादाचा फटका बसला.एका अंतिम लढतीत खेळाडूने हल्ला केल्यानंतर मी त्याला रेड कार्ड दाखविले. पुढे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. अनेकवेळा प्रशासकांनी त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहूनही आम्हाला संरक्षण दिले नाही. जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. शेवटी ठरविले, बस्स,आता पुरे! माझ्यासारखे अनेकजण आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, रेफ्री ज्यांनी निराश होऊन खेळाला ‘रामराम’ केला. नाराजी - राग त्या खेळावर नाही. रोष आहे, तो भारतीय फुटबॉल व्यवस्थेवर. ती जर ठीक असती, तर ‘माझा भारत’ विश्वचषकामध्ये दिसला असता. तो नाही याचे अतीव दु:ख आहे, ते देशातील करोडो फुटबॉलप्रेमींना!

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलIndiaभारत