शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

FIFA Football World Cup 2018 : कोठे गेले भारतीयांचे फुटबॉलप्रेम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:16 IST

विश्वचषकामध्ये तुम्ही का नाही? हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धेपूर्वी मोरोक्को, इजिप्त, मेक्सिकोसारख्या देशांतील पाठिराख्यांनी कैकवेळा विचारला. अतिशय वेदना त्यामुळे झाल्या. शतकभरापेक्षा अधिक फुटबॉल इतिहास, करोडोंचा देश, तसा तेवढा गरीबही नाही, पण आम्ही या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरत नाही. का?

- रणजीत दळवीविश्वचषकामध्ये तुम्ही का नाही? हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धेपूर्वी मोरोक्को, इजिप्त, मेक्सिकोसारख्या देशांतील पाठिराख्यांनी कैकवेळा विचारला. अतिशय वेदना त्यामुळे झाल्या. शतकभरापेक्षा अधिक फुटबॉल इतिहास, करोडोंचा देश, तसा तेवढा गरीबही नाही, पण आम्ही या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरत नाही. का?नुकताच भारतीय संघाला एक अतिशय नाउमेद करणारा मोठा धक्का बसला. त्यांच्या आशियाई खेळांतील सहभागाला लाल बत्ती दाखविण्यात आली. कारण काय, तर म्हणे तुम्ही गेल्या वेळी अव्वल आठमध्ये नव्हता. आता हा ‘अव्वल’ मापदंड ठरविला, ‘अव्वल’ पात्रतेच्या भारतीय आॅलिम्पिक संघटनेने. ज्या संघटनेमध्ये असतात, खेळाच्या दृष्टीने अपात्र व अडाणी असामी, केवळ स्वहित जोपासणारे! खरे तर बऱ्याच वर्षांनी आपला संघ या वेळी आशिया चषकसाठी पात्र ठरला होता. आपण जागतिक क्रमवारीमध्ये १७१ वरून ९६पर्यंत चढलो होतो. तेही आपल्याला ती सुधारण्यासाठी उच्च दर्जाच्या संघांशी खेळण्याची संधी प्राप्त न होता, पण त्यांच्या मार्गात शेवटी अडथळा हा आलाच!अशा स्थितीत सरकार व आॅलिम्पिक संघटनेने थोडा मनाचा मोठेपणा का नाही दाखविला? त्यांना आपल्या खर्चाने हवे तर जा म्हणायचे. आणि हो, गेल्या वर्षी आपण १७ वर्षांखालील विश्वचषक भरविला तो मग कशासाठी? उत्तेजन देण्यासाठीच ना? मात्र, शल्य एका गोष्टीचे बोचते, देशात फुटबॉलवर एवढे लोक प्रेम करतात, पण जे झाले, त्यावर कोठेही कोणीही राग व्यक्त केल्याचे जोरदार निषेध केल्याचे, मोर्चे काढल्याचे दिसले नाही.म्हणून एरवी जोरजोरात वाद घालणाºया आपल्या फुटबॉलप्रेमींना विचारावेसे वाटते, आता का बरे थंड पडलात? की विश्वचषकाच्या ज्वरामुळे तुम्ही भ्रमिष्ट झालात? कोलकाता, मुंबई, बंगळुरू, दिल्ली, किंवा मग उत्तर - पूर्व, केरळ, गोवा, पंजाबमध्ये मेणबत्त्या घेऊनही बाहेर पडणे तुम्हाला शक्य होऊ नये? हल्ली मेणबत्त्या हाती घेतल्या की लक्ष वेधता येते!एकूणच खेळाची दुरवस्था का झाली हे दिसते. गेली दोन दशके या खेळाच्या संघटनेच्या अग्रस्थानी दोन बडे राजकारणी होते, सरकार दरबारी बºयापैकी वजनही असणारे, पण झाले उलट. संघटनेच्या तिजोरीत जमा काही करोडोंची रक्कम यांच्या उठण्या-बसण्यावर खर्च झाल्यावर, विकासाचे काय व्हावे? आपले वजन वापरून क्रिकेटप्रमाणे मूलभूत सुविधा निर्माण करतील, अशी किमान अपेक्षा त्यांच्याकडून होती. त्यामुळे फुटबॉलची प्रतिमाही उंचावली असती.आम्ही १९८३ची विश्वचषक स्पर्धा जिंकेपर्यंत क्रिकेट कुठे होते? त्याच वेळी साध्या क्लब स्पर्धांमध्ये हजारो-ेलाखो फुटबॉलप्रेमी गर्दी करत असत. कोलकात्यात तेव्हा मोहन बागान - ईस्ट बंगाल यांच्यातली स्थानिक साखळी लढत इडन गार्डनवर खेळवावी लागे. उपस्थिती किती म्हणाल... एक लाख!१९९०च्या दशकांमध्ये मोठ्या थाटामाटात राष्ट्रीय साखळी सुरू झाली व २०१३ मध्ये इंडियन सुपर लीग (आयएसएल) ही पैसेवाल्यांचा आश्रय लाभलेली स्पर्धाही मोठ्या आशेने सुरू करण्यात आली. खेळामध्ये मुबलक पैसा येईल व स्थिती हळूहळू सुधारेल, अशी चिन्हे दिसत होती, पण झाले असे की शेकडाभर भारतीय खेळाडूंना आपले आयुष्य अवश्य सुधारता आले. मिळतात हल्ली कोटी - दीड कोटी! पण सुमार विदेशी खेळाडूंसह, काही निवृत्त झालेल्या सिताºयांचेही फावले. अगदी चाळीशीतले खेळाडू ‘झोली भरके’ कमावून गेले. भारतीय फुटबॉलच्या उत्कर्षासाठी, उत्थानासाठी आखलेली योजना तशी तकलादू निघाली. वेळ तशी केव्हाच निघून जात नसते. अजूनही एकमेकाला दोष न देता युद्धपातळीवर प्रयत्न झाले, तर ते हितकारी ठरावे!

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल