शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

Football: भारतापुढे कुवेतचे अवघड आव्हान, अखेरच्या साखळी लढतीत खरी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 06:17 IST

Football: अखेरच्या साखळी सामन्याआधीच सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताला मंगळवारी कुवेतच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

बंगळुरू : अखेरच्या साखळी सामन्याआधीच सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताला मंगळवारी कुवेतच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. भारताप्रमाणेच कुवेतनेही दोन विजयांसह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. 

या सामन्यातील विजेता अ गटातील अव्वल स्थान पटकावेल. त्याचवेळी, दिवसातील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ असा रंगेल. दोन्ही संघ दोन पराभवांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने हा सामना औपचारिकतेचा ठरेल. तरीही, स्पर्धेतील अखेरचा सामना जिंकून विजयी निरोप घेण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण ताकदीने खेळतील. भारताने सलामीला पाकिस्तानला ४-० असे नमवल्यानंतर नेपाळला २-० असे नमवले होते. गेल्या आठ सामन्यांत भारताविरुद्ध एकाही गोलची नोंद झालेली नसून कुवेतला भारतीय बचाव फळी भेदण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, याची जाणीव आहे. 

तरीही, कुवेतचा आक्रमक खेळ पाहता त्यांच्याविरुद्ध भारताला आपला स्तर उंचवावा लागेल. मध्यरक्षक आणि आघाडीची फळी यांना योग्य ताळमेळ राखून खेळावे लागेल. भारतीय संघ अजूनही गोल करण्याबाबत सुनील छेत्रीवर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार हॅटट्रिक केल्यानंतर नेपाळविरुद्धही पहिला गोल केला होता. 

कुवेतचे पारडे जडभारताविरुद्ध कुवेतचे पारडे वरचढ आहे. कुवेतने आतापर्यंत भारताविरुद्ध दोन सामने जिंकले असून भारताने कुवेतला एकदा नमवले आहे. कुवेतने या स्पर्धेत नेपाळला ३-१ असे नमवल्यानंतर पाकिस्तानला ४-० असे नमवले होते. उपांत्य सामन्याआधी मानसिकरीत्या मजबूत होण्यासाठी दोन्ही संघ विजयाच्या निर्धारानेच मैदानात उतरतील. भारत-कुवेत २०१० सालानंतर पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळतील.   

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत