शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

चवीने खाल्ल्या जाणाऱ्या 'या' गोड पदार्थांचा इतिहास माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:47 IST

भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती वेगळी आढळून येते. त्याचप्रमाणे मिठाई किंवा गोड पदार्थांमध्येही विविधता आढळून येते.

भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती वेगळी आढळून येते. त्याचप्रमाणे मिठाई किंवा गोड पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. आपल्या देशातील सण, उत्सव या गोड पदार्थांशिवाय अपूर्ण समजले जातात. सणांच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पण यातीलच काही पदार्थांना शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे. जाणून घेऊयात अशा काही गोष्टींबाबत...

गुलाबजाम

एखाद्या मिठाईच्या दुकानात गेलो की, सर्वांच्याच नजरा प्रामुख्याने एका पदार्थावर खिळतात तो म्हणजे गुलाबजाम. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, जो पदार्थ आपण लहानपणापासून खातो तो पदार्थ मुळात आपला नाहीचं. खरं तर ही मिठाई पर्शिया म्हणजेच आताच्या इराणमधील आहे. याची उत्पत्ती अरबी डेझर्ट लुकमत-ए-काधी म्हणून झाली होती. या पदार्थाने मुघल काळामध्ये प्रसिद्धी मिळवली आणि त्यानंतर याचं नाव गुलाब जामुन असं ठेवण्यात आलं. याचा पर्शियन भाषेमध्ये  गुल म्हणजे फूल आणि अब म्हणजे पाणी असा अर्थ होतो. तसेच याचा आकार भारतातील जामुन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभळासारखा आहे. त्यामुळे त्यापुढे गुलाबजामुन असं जोडण्यात आलं. पुढे याचा उच्चार मराठीत करताना गुलाबजाम असा होऊ लागला.

रसगुल्ला

नरम आणि रसरशीत दिसणारा हा पदार्थ बंगाली पदार्थ म्हणून ओळखला जातो. एखादा कार्यक्रम किंवा सण उत्सवामध्ये अनेकदा रसगुल्ल्याचा समावेश करण्यात येतो. याचं खरं नाव खीरा मोहन असं आहे. असं म्हटलं जातं की, याची सुरुवात ओदीशामध्ये करण्यात आली होती. या पदार्थामागेही अनेकदा एक गोष्ट सांगण्यात येते. असं म्हटलं जातं की, एकदा भगवान जगन्नाथ रथयात्रेसाठी जात असताना आपल्यासोबत पत्नी लक्ष्मीला घेऊन गेले नाहीत. त्यामुळे लक्ष्मी रूसून बसली होती. आपल्या पत्नीची समजूत काढण्यासाठी तिला रसगुल्ला खाऊ घातला होता. त्यामुळे नवव्या दिवशी रसगुल्ल्याचा नैवद्य दाखवण्यात येतो. 

लाडू

लाडू म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो बुंदीचा लाडू असो किंवा इतर कोणताही. महराष्ट्रात तर हा पदार्थ सर्वांच्याच घरी तयार करण्यात येतो. सणांच्या दिवशी किंवा एखाद्या खास समारंभाच्या दिवशी लाडू नक्की बनवण्यात येतात. पण लाडूंचा इतिहासही फार वेगळा आहे. आधी आरोग्य चांगलं राहण्यासाठी किंवा महिलांच्या गरोदरपणात त्यांना पौष्टीक तत्व मिळावीत यासाठी खास लाडू तयार केले जात असत. आजही डिंकाचा लाडू, सुंठाचा लाडू तयार करण्यात येतात. 

संदेश

संदेश बंगालची एक खास मिठाई आहे. नासलेल्या दूधापासून पनीर सारखा एक पदार्थ तयार करण्यात येतो त्यापासून ही मिठाई तयार करण्यात येते. फक्त हा पदार्थ पनीरपेक्षा फार मुलायम असतो. असं म्हटलं जातं की, हा पदार्थ सर्वात आधी पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आला होता. रसगुल्ल्याच्या आधीपासून संदेश पदार्थ बंगालमध्ये लोकप्रिय आहे. आधीच्या काळात नासलेलं दूध वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये साखर टाकून खाल्लं जात असे. तेव्हापासूनच संदेश या पदार्थ तयार करण्यास सुरुवात झाली.