शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गरजेपेक्षा जास्त खाताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर होतील हे गंभीर आजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 13:17 IST

आपल्याला अनेकदा भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. एकदा खाल्लं तर सारखं खातचं राहतो. त्याला ओव्हरइटिंग म्हणतात. आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा अधिक खाल्ल तर वजन वाढतं.

(Image Creadit : freepressjournal.in)

आपल्याला अनेकदा भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. एकदा खाल्लं तर सारखं खातचं राहतो. त्याला ओव्हरइटिंग म्हणतात. आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा अधिक खाल्ल तर वजन वाढतं. त्याचप्रमाणे शरीराशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्हीही गरजेपेक्षा जास्त खात असाल तर लगेच तुमची ही सवय बदला. नाहीतर अनेक आजार आणि समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात गरजेपेक्षा जास्त खाल्यानं शरीराला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याबाबत... 

1. लठ्ठपणा

गरजेपेक्षा जास्त खाल्यानं वजन वाढण्यास सुरुवात होते. वाढलेल्या वजनामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. 

2. अॅलर्जी

जास्त प्रमाणात खाल्यानं अॅलर्जीही होऊ शकते. अंड, दूध, मासे, धान्य यांपासून तयार करण्यात आलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्यानं अॅलर्जी वाढतं. 

3. कोलेस्ट्रॉल वाढतं

आपण खात असलेल्या अनेक पदार्थांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा अधिक असते. असे पदार्थ जास्त खाल्यानं रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. त्यामुळे हृहयाशी निगडीत अनेक आजार होण्याची शक्यता असते. 

4. पिम्पल्स

जास्त खाल्यानं पिम्पल्सची समस्याही उद्भवते. जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाल्यानं पिम्पलसची समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त गायीचं दूध जास्त प्यायल्यानेही हा प्रॉब्लेम उद्भवतो. 

5. अॅसिडिटी

ज्याप्रमाणे काही न खाल्यामुळे जशी अॅसिडिटी होते, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त खाल्यानेही अॅसिडिटी होते. अॅसिडिटी जास्तकरून संत्री, टॉमेटो, चॉकलेट यांसारख्या गोष्टींचं जास्त सेवन केल्यामुळे होते. 

6. किडनी प्रॉब्लेम

जास्त प्रोटीन असणारे खाद्यपदार्थ खाल्याने किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे किडनी स्टोनचा त्रासही होऊ शकतो. यापासून वाचण्यासाठी आहारामध्ये पालकचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

7. विसरण्याची समस्या

सारखं सारखं फॅट्स आणि कॉपर असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ जास्त खाणं टाळणं गरजेचं आहे. 

8. सूज येणं

गरजेपेक्षा जास्त मीठ असलेले आणि गोड पदार्थ खाल्यानं शरीराला सूज येते. त्यामुळे असे पदार्थ खाणं शक्य तेवढं टाळावं. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यdiabetesमधुमेह