शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

इच्छा असूनही पाणीपुरी खाणं टाळत असाल तर 'हे' नक्की वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 12:24 IST

पाणीपूरी म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. असं क्वचितचं कुणी असेल ज्याला पाणीपूरी अजिबात आवडत नाही. अनेकदा रस्त्यावरून जाताना एखादा पाणीपुरीचा ठेला दिसला तर तोंडाला पाणी सुटतं. अनेकदा तर आपसूकच आपली पावलं त्या ठेल्याकडे वळतात.

पाणीपूरी म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. असं क्वचितचं कुणी असेल ज्याला पाणीपूरी अजिबात आवडत नाही. अनेकदा रस्त्यावरून जाताना एखादा पाणीपुरीचा ठेला दिसला तर तोंडाला पाणी सुटतं. अनेकदा तर आपसूकच आपली पावलं त्या ठेल्याकडे वळतात. पण गेल्या अनेक दिवसांपासून याच पाणीपुरीविरोधात मोहिम राबवण्यात येत आहे. वडोदरामध्ये पावसाळ्यात पाणीपूरी बॅन केली असून गुजरातमध्येही बॅन करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याआधीही पाणीपुरीच्या ठेलेवाल्यांचे अनेक आक्षेपार्ह्य व्हिडीओ समोर आले होते. तेव्हापासून लोकांच्या मनात पाणीपुरीबाबत व्दिधा मनस्थिती पाहायला मिळते. पण हा पदार्थ तुम्ही घरी तयार करूनही खाऊ सकता. आज आपण जाणून घेऊयात पाणीपुरीचे आरोग्यवर्धक फायदे...

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पाणीपुरी हा उत्तम पर्याय आहे. फक्त रव्याच्या पुऱ्या न खाता कोणत्याही पीठाच्या पुऱ्यांचा वापर करा. तसेच जलजीरा आणि मीठ असलेल्या पाण्याशिवाय पुदीना, लिंबू, हिंग आणि कैरी घालून तयार कलेलं पाणी वापरा त्यामुळे तुमचं वाढतं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

माऊथ अल्सरपासून सुटका

पाणीपुरीचं पाणी तयार करताना त्यामध्ये जलजीरा आणि पूदीन्यासारख्या गोष्टी वापरल्या जातात. जलजीऱ्यातील तिखट आणि पूदीन्यातील आंबट गुणधर्म माऊथ अल्सर दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

अॅसिडिटी दूर करण्यासाठी 

पाणीपुरी तयार केली असेल तर त्यावेळी रव्याच्या पुऱ्यांचा वापर न करता कोणत्याही पीठाच्या पूऱ्यांचा वापर करावा. त्याचबरोबर पाणीपुरीसाठी पाणी तयार करताना जलजीऱ्यासोबतच पुदीना, कैरी, काळं मीठ. काळीमीरी, जीऱ्याची पूड आणि साध मीठं घालून पाणी तयार करावं. या सर्व पदार्थांमुळे अॅसिडिटी काही वेळातच दूर होण्यास मदत होईल. 

मूड रिफ्रेश होतो

रोजच्या धावपळीतून शरीर थकून जातं. त्याचसोबत आपला मूडही खराब होतो. तसेच बऱ्याचदा बाहेर फिरताना गरम होतं. अशावेळी मूड रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी थंड पिण्याची अथवा खाण्याची इच्छा होते. अशावेळी पाणीपुरी हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पाणीपुरीचं पाणी तयार करताना त्यामध्ये जलजीरा, सैंधव मीठ आणि पुदीन्याचा वापर करतात. यांमुळे मुड रिफ्रेश होण्यास मदत होते. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य